शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

मनपाचे कोट्यवधी रुपयांवर पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 00:59 IST

नाशिक : केंद्र सरकारने जीएसटी लागू केल्यानंतर महसूल विभागाच्या अखत्यारित असलेला करमणूक शुल्क वसुलीचा विषय महापालिकेकडे देण्यात आला. तथापि, त्याविषयी आधी प्रशासन अनभिज्ञ होते आणि नंतर शुल्काबाबतचे अधिकृत दर आणि अन्य माहिती राज्य शासनाकडे मागूनही मिळत नसल्याने महापालिकेला कोट्यवधी रुपयांवर पाणी सोडावे लागले आहे.

ठळक मुद्देकरमणूक शुल्क : वर्षभरापासून वसुली ठप्पशासन अनभिज्ञ असल्याने आर्थिक नुकसान

संजय पाठक ।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : केंद्र सरकारने जीएसटी लागू केल्यानंतर महसूल विभागाच्या अखत्यारित असलेला करमणूक शुल्क वसुलीचा विषय महापालिकेकडे देण्यात आला. तथापि, त्याविषयी आधी प्रशासन अनभिज्ञ होते आणि नंतर शुल्काबाबतचे अधिकृत दर आणि अन्य माहिती राज्य शासनाकडे मागूनही मिळत नसल्याने महापालिकेला कोट्यवधी रुपयांवर पाणी सोडावे लागले आहे.केंद्र सरकारने गेल्या वर्षी १ जुलै रोजी वस्तू सेवा कर म्हणजेच जीएसटी लागू केला. त्यामुळे महापालिका वसूल करीत असलेला एलबीटी संपुष्टात आला. राज्यातील महापालिकांना शासनाकडून वाटा मिळणार असल्याने त्याविषयी अडचण नसली तरी या संस्थांसमोरील वाढती आव्हाने लक्षात घेऊन काही कर वसुलीचे अधिकार महापालिकेला देण्यात आले. त्यात करमणूक शुल्काचाही समावेश होता. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यात केबलचालक, डीटीएचधारक तसेच सिनेमा, नाटक यांच्याकडून करमणूक शुल्क महसूल विभागाकडून संकलित केले जात होते. इतकेच नव्हे तर हॉटेल्समधील मनोरंजन कार्यक्रम इतकेच नव्हे तर व्हिडीओकोच प्रवासी बसमधील व्हिडीओच्या माध्यमातून मनोरंजन होत असल्याने त्याबद्दलही करमणूक शुल्क वसूल केले जात होते. ही जबाबदारी महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. तथापि, महापालिका याविषयावर पूर्णत: अनभिज्ञ होती.करमणूक शुल्काच्या वसुलीचा अधिकार महापालिकेला असून, अद्याप वसुलीच होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालिकेची धावपळ उडाली, परंतु करमणूक शुल्काचे नियमावली दर, तसेच कोणाकडून किती वसुली याबाबत महापालिकेकडे काहीच माहिती नाही तर दुसरीकडे शासनानेदेखील याबाबत कोणतीही माहिती महापालिकांना कळवलेली नाही. त्यामुळे नाशिक महापालिकेने सुमारे सहा महिन्यांपूर्वीच शासनाला पत्र पाठवले आणि करमणूक शुल्क वसुलीबाबत केवळ जीएसटीच्या अध्यादेशातच तसा उल्लेख असून प्रत्यक्षात मात्र याबाबत नियमावली आणि अन्य माहिती उपलब्ध होत नसल्याने त्याबाबत मार्गदर्शन करावे, असे नमूद केले होते. मात्र, शासनाकडूनही याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे अद्यापही महापालिकेकडून कोणत्याही प्रकारची वसुली होत नाही.करवसुलीचा घोळसध्या महसूल विभाग आणि महापालिका अशा दोघांकडूनही करमणूक कर वसूल होत नसल्याने शहर करमणूक करमुक्त झाले आहे. अनेक केबलचालकांना वसुलीबाबत माहिती नसून त्यांनी जीएसटीमुळे सर्वच कर संपुष्टात आल्याने करमणूक शुल्क लागू नसल्याचा दावा केला आहे. एकीकडे पालिका उत्पन्नवाढीसाठी सर्वसामान्यांवर करवाढ करीत आहे; मात्र दुसरीकडे हक्काचे उत्पन्न गमावत असल्याचे दिसत आहे.