शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया

By admin | Updated: April 24, 2016 10:11 IST

गुरुकृपानगर परिसरात तब्बल १८ दिवसांनी नळाला पाणी आले. पण मुख्य जलवाहिनी अनेक ठिकाणी फुटलेली असल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले.

 नांदगाव : शासकीय स्तरावर पाणी वाचविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारांनी नागरिकांना आवाहन केले जात असले व दंडात्मक कारवाईची तरतूद असली तरी, नांदगाव नगरपालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदोष यंत्रणेतून वाहून जाणाऱ्या पाण्यासाठी त्यांच्यावर कोणी कारवाई करावी? याबाबत गुरुकृपानगरातील नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन केले आहे.गुरुकृपानगर परिसरात तब्बल १८ दिवसांनी नळाला पाणी आले. पण मुख्य जलवाहिनी अनेक ठिकाणी फुटलेली असल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. काही ठिकाणी गरजेपोटी नागरिकांनी रांग लावून वाया जाणारे पाणी उपसून भरले. विशेष म्हणजे नदीतून जाणारी जलवाहिनी वारंवार फुटते म्हणून, नवीन सुरक्षित वाहिनी नदीच्या पुलावरून टाकण्यात आली. तर तीदेखील फुटल्याने बरेचसे पाणी नदीत वाहून गेले.जेटीके इंग्लिश मीडियम स्कूलच्या पाठीमागे फुटलेल्या वाहिनीतून वाहणाऱ्या पाण्याच्या ओहोळात लहान मुलांनी पाण्यात खेळण्याचा आनंद घेतला तर तिथून ४० ते ५० फूट अंतरावर जमिनीतून पाणी वर येत होते. त्यापुढे पुढच्या ४० ते ५० फुटांवर गळतीमधले पाणी भांड्याकुंड्यांनी भरले गेले. त्याहीपुढे पाणी गळतच होते.एरवी पाण्याच्या अडचणींसाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कोर्टात, चेंडू टोलविणाऱ्या नगरपालिकेस अद्याप गुरुकृपा नगरातील पाणीपुरवठ्याचे सूत्र सापडलेले नाही. शहरात ३५०० कनेक्शन्स आहेत. एकूण ३९ भाग आहेत. येथे केवळ १९० नळ कनेक्शन्स आहेत आणि पाणीपुरवठ्याचे आठ भाग आहेत. त्यांना १८ ते २० तास पाणीपुरवठा करावा लागतो. या वेळात कितीतरी पाणी वाहून जाते. कोणाच्या बगिच्याला तर कोणाला गाड्या धुण्यासाठी मनमुराद पाणी उपलब्ध होते. लातूर येथे तीव्र पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या प्रशासनास तहानलेल्या नागरिकांना नियंत्रित करण्यासाठी १४४ कलम लागू करावे लागले. पण पाण्याची कृत्रिम टंचाई, योजना राबविणाऱ्यांच्या चुकांमुळे निर्माण होत असेल तर कोणते कलम लावावे याची चर्चा शहरातील नागरिक करत आहेत. (वार्ताहर)