शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांपासून पाण्यासाठी याचना : नांदगाव सदोमधील महिलांचा एकाकी संघर्ष उंबरे झिजवूनही जिल्हा परिषदेला फुटेना पाझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:24 IST

नाशिक : पाणीपुरवठा योजना मंजूर असताना पाण्याचा थेंबही गावात पोहचत नसल्याने गेल्या चार वर्षांपासून जिल्हा परिषदेचा उंबरठा झिजविणाºया महिलांना सातत्याने तारीख पे तारीख मिळत आहे

ठळक मुद्देचार वर्षांपासून पाण्याची प्रतीक्षागावातील विहिरी आताच आटल्या

नाशिक : पाणीपुरवठा योजना मंजूर असताना पाण्याचा थेंबही गावात पोहचत नसल्याने गेल्या चार वर्षांपासून जिल्हा परिषदेचा उंबरठा झिजविणाºया महिलांना सातत्याने तारीख पे तारीख मिळत आहे पण त्यांच्या गावाला पाणी मात्र मिळत नाही. जिल्हा परिषदेत आल्यावर या महिलांना पिण्यासाठी पाणीही विचारले जात नाही तेव्हा गावात पाणी पोहचण्यासाठीचे प्रामाणिक प्रयत्न होतील तरी का अशा प्रश्नांकित चेहºयाने या महिला कार्यालयाबाहेर पडल्या. इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो या सुमारे पाच हजार लोकवस्तीच्या गावाला गेल्या चार वर्षांपासून पाण्याची प्रतीक्षा आहे. पूर्वीच्या पाणीपुरवठा समितीने काय केले आणि त्यामुळे पाण्याचा प्रश्न कसा निर्माण झाला या तांत्रिक बाबी असल्या तरी गावाला आज पाणी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. गावातील विहिरी आताच आटल्या आहेत. पुढे उन्हाळ्याचे दिवस येतील तेव्हा पाण्याची भीषणता अधिक प्रकर्षाने समोर येईल, तेव्हा करायचे काय? दर उन्हाळ्यात हाच विचार करून गावातील वत्सलाबाई भागडे, अंजनाबाई भागडे, विद्या चव्हाण, लक्ष्मीबाई जगताप, मंजुळाबाई भागडे, कमलबाई जगताप, नंदाबाई भागडे, पुष्पा अडोळ, सावित्रीबाई कडू, मथुराबाई अडावळ, संगीता भागडे या बारा महिला पाण्याचे मागणे घेऊन जिल्हा परिषदेचा उंबरठा झिजवत आहे. परंतु प्रत्येकवेळी त्यांना पुढची तारीख किंवा आश्वासन देऊन परत पाठविले जात आहे. ग्रामीण, आदिवासी भागातील या महिला गेल्या चार वर्षांपासून पाण्यासाठी झगडत आहेत. गावात सद्यस्थितीत पाण्याचा थेंबही नाही किंबहुना पाण्याची यंत्रणाच अस्तित्वात नसल्याने गावातील लोकांना पाण्याचा टॅँकर मागवावा लागतो. पाण्यासाठी चारशे-पाचशे रुपये मोजावे लागतात. ज्याला ते शक्य होते तो टॅँकर मागवून आपली गरज भागवून घेतो. परंतु सर्वांनाच ते शक्य होत नाही. पाण्यासाठीची वणवण म्हणूनही थांबत नाही. गावाचा हाच पाणीप्रश्न घेऊन गावातील बारा महिल्या एकत्र आल्या आहेत. त्यांनी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला वारंवार विनवणी केली, याचना केली मात्र त्यांना जुजबी उत्तरे देऊन समजूत काढली जाते. यातील सर्वच महिल्या या साठीच्या पुढील आहेत. त्यामुळे त्या प्रशासनाशी झगडा करून आपल्या मागण्या मांडू शकत नाहीत तरीही त्यांनी हार मानलेली नाही. गावाच्या पाण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून त्या केवळ आश्वासन घेऊन परतात आणि अपेक्षाभंग झाला की पुन्हा जिल्हा परिषदेत येतात. प्रशासनाचे अधिकारी त्यांना दाद लागू देईनात किंबहुना त्यांना दुर्लक्षित केले जात आहे. ही बाब त्यांनाही ज्ञात आहे परंतु कितीही अवमान झाला तरीही पाण्यासाठी जिल्हा परिषदेत येतच राहायचे हा त्यांचा निर्धार त्यांना नाउमेद होऊ देत नाही. प्रशासनाकडून अपेक्षा करणे तसेही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असते, परंतु ज्यांच्या भरवशावर या महिला जिल्हा परिषदेत येतात ते सदस्यही केवळ फोनवर आश्वासन देऊन त्यांना ताटकळत ठेवतात. मंगळवारी (दि.१६) आलेला अनुभव या महिलांसाठी वेगळा नव्हताच. या वयोवृद्ध महिलांना प्रशासनाकडून दाद मिळाली नाही आणि लोकप्रतिनिधींकडूनही. पाणीपुरवठा विभागाकडून टेंडरप्रक्रिया सुरू असल्याचे कारण पुढे केले जात आहे. परंतु ही प्रक्रिया पूर्णत्वास कधी येणार हे मात्र सांगितले जात नाही. त्यासाठी तारीख पे तारीख दिली जात आहे. मागील ठेकेदाराने काम सोडून दिले. नवा ठेकेदार ते काम करील याचीही शाश्वती नाही. मग विश्वास ठेवावा कुणावर हा प्रश्न या महिलांच्या चेहºयावर तरळतो. लोकप्रतिनिधींच्या भरवशावर जिल्हा परिषदेत आलेल्या या थकल्या, भागल्या महिलांना मात्र त्यांची चातकाप्रमाणे वाट पाहून परतावे लागते. चार वर्षांत असे कितीतरी अनुभव या महिलांनी पचविले आहेत.माणुसकीची माफक अपेक्षापाण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेत येणाºया या सर्व महिलांचे वय ५५ ते ६०च्या पुढे आहे. दूरवरून येथे आल्यानंतर त्यांना सन्मानाने बसण्यासाठी जागा आणि आपुलकीने पाणी विचारणाºया दोन शब्दांची अपेक्षा असते. प्रशासनाचे सरकारी उत्तर ऐकून परतलेल्या या महिलांना दिलासा देणारे शब्दही आधार देणारे ठरू शकतील. यापैकी कोणताही सुखद अनुभव या महिलांना नसला तरी पाणीपुरवठा विभाग, लोकप्रतिनिधी आणि सीईओ यांनी एकदा या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले तर आमचा प्रश्न नक्कीच सुटू शकेल, इतकी विदारकता या प्रश्नात आहे. त्यामुळे प्रश्न सुटू शकतो. गरज आहे ती या प्रश्नाकडे आणि प्रामाणिक प्रयत्नांकडे माणुसकीने पाहण्याची. जाता जाता या महिला असा साधा उपाय सांगून जातात.