शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

जीव वाचविण्यासाठी भटकंती

By admin | Updated: September 5, 2015 00:23 IST

महिलेवर भुताटकीचा संशय : गावबंदीसह घरावर हल्ला, तोडफोड

सटाणा : भुताटकी करत असल्याच्या संशयावरून गावातून बहिष्कृत केलेल्या कुटुंबाला जीव वाचविण्यासाठी तब्बल २१ दिवसांपासून रानोमाळ भटकंती करत लपत फिरण्याची वेळ आली आहे. बागलाण तालुक्यातील मानूर खैराडपाडा येथील पंडित बहिरम या आदिवासी कुटुंबावर हा हृदयद्रावक प्रसंग गुदरला आहे.बागलाण तालुक्यातील मानूर खैराडपाडा येथील जिवतूबाई व पंडित बहिरम हे आपल्या मंगळ्या, रमेश व तुळशी या मुलांबरोबर राहत. दीड बिघे जमीन कसून उदरनिर्वाह करत असताना या कुटुंबावर सोमानामक भोंदूबाबाने अंगात आल्यानंतर जिवतूबाई भुताळीण असल्याचे सांगितल्याने गावकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केल्याने त्यांच्यावर रानोमाळ भटकण्याची वेळ आली आहे. गेल्या आॅगस्ट महिन्यात पंडित यांच्या घराजवळच राहणारा त्यांचा धाकटा भाऊ पंढरीनाथ याची मुलगी संगीता (१०) ही तापाने फणफणली होती. तिला दवाखान्यात भरती करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान संगीताचे आई-वडील तिला घरी घेऊन आले. ताप उतरत नसल्यामुळे कळवण तालुक्यातील भोती (जयदर) येथील सोमा महाराज या जादूटोणा करणाऱ्या बाबाला मानूर खैराडपाडा येथे पाचारण करण्यात आले. १३ आॅगस्टच्या रात्री संगीतावर सोमाने अघोरी विद्येचा वापर सुरू केला. मात्र उपचाराभावी ताप थेट मेंदूत गेल्याने संगीताची प्राणज्योत मालवली. तरीही सोमाचे तंत्रमंत्र सुरूच होते. सकाळी ८ वाजेच्या सुमारास अचानक सोमाच्या अंगात आले. त्याने तुमच्या घरात जिवतूबाई ही भुताळीण आहे. तिने आतापर्यंत अकरा जणांना खाल्ले असून, आता संगीताचा बळीही तिने घेतला असल्याचे सांगितल्याने संगीताच्या मृतदेहाजवळच सख्ख्या भावासह गावकरी जिवतूबाई, पंडित दांपत्यावर तुटून पडले. बचावासाठी सदर दांपत्य तिन्ही मुलांसह घरात लपून बसले. मात्र गावकऱ्यांनी घरावर दगडफेक करून कुऱ्हाडीने दरवाजा तोडून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु कुटुंबीयांनी घराच्या मागील दरवाजाने जंगलात पळ काढून आपला जीव वाचवला. (वार्ताहर)