शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

ममदापूर परिसरात जोरदार पावसाची प्रतीक्षा

By admin | Updated: September 7, 2014 00:12 IST

ममदापूर परिसरात जोरदार पावसाची प्रतीक्षा

ममदापूर : येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागातील ममदापूर, राजापूर, खरवंडी, रहाडी, देवदरी या परिसरातील शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. परिसरातील विहिरींना अद्याप पाणी उतरलेले नाही. यामुळे शेतकरी चिंतित आहेत. यावर्षी तब्बल एक महिना उशिराने चालू झालेला पाऊस जेमतेम बरसला. त्यावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, मात्र पिके वाढीच्या स्थितीत असताना पावसाने दडी मारल्याने पिके वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मागील वर्षी गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक कणाच मोडकळीस आला. त्यात काढणीला आलेला कांदा सडला, गहू, हरभरा आदि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या संकटावर मात करीत परिसरातील शेतकऱ्यांनी कर्ज काढून यावेळी पिके उभी केली; परंतु पावसाचे प्रमाण अल्प असल्यामुळे पिकांचे अपेक्षित उत्पन्न मिळणार नाही. पावसाळ्याचे साडेतीन महिने उलटूनदेखील विहिरींना पाणी नसल्याने पोळ कांदा लेट होत असून, कमी दिवसांत येणारे पिक उशिरा होत आहे. गारपिटीमध्ये कांद्याचे बियाणे पूर्णपणे नष्ट झाले. दहा ते बारा हजार रुपये पायलीने कांदा बियाने घेऊन शेतात टाकले रोप लावणीयोग्य झाले मात्र पाणी नसल्याने शेतकऱ्यांना काहीही करता येत नाही. विहिरींना पाणी आले तरच कांद्याची लागवड करता येणे शक्य आहे. अन्यथा रोप वाया जाण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)