शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
2
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
3
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
4
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
5
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
6
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
7
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
9
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
10
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
11
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
12
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
13
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
14
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
15
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
16
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
17
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
18
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
19
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
20
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   

बहुपक्षीय लोकशाहीला मतदारांची पसंती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:13 IST

नाशिक : भारतात बहुपक्षीय लोकशाही टिकली पाहिजे, या भावनेतून मतदारांनी पाच राज्यांच्या निवडणुकीत कौल दिला, असे ठाम मत ज्येष्ठ ...

नाशिक : भारतात बहुपक्षीय लोकशाही टिकली पाहिजे, या भावनेतून मतदारांनी पाच राज्यांच्या निवडणुकीत कौल दिला, असे ठाम मत ज्येष्ठ पत्रकार ॲड. सुरेश भटेवरा यांनी व्यक्त केले.

डिजिटल वसंत व्याख्यानमालेत ते बोलत होते, स्व. उत्तमराव ढिकले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, पाँडिचेरी विधानसभा निवडणूक निकालांचे विश्लेषण’ या विषयावर भटेवरा यांनी सातवे पुष्प गुंफले. भारतीय लोकशाहीवर, सहिष्णुतेवर, धर्मनिरपेक्षतेवर त्यांच्यासाठी सारेच काही संपले नाही, हे या निवडणूक निकालाने दाखवून दिले आहे. बंगाल जिंकायचाच म्हणून मोदी, शहा, नड्डा यांनी सर्वस्व पणाला लावले. सरकारी यंत्रणा, केंद्रीय मंत्र्यांची फौज, इतकेच काय तर निवडणूक आयोगानेही आज्ञाधारक मुलाप्रमाणे काम केले; पण प्रादेशिक अस्मिता बंगालमध्ये सरस ठरली, असेही भटेवरा यांनी स्पष्ट केले. भाजपला काँग्रेसमुक्त भारत नाही, तर विरोधकमुक्त भारत करायचा आहे. भाजपची ही सत्तालोलुपता वाढत चालली असून, पर पक्षातील उमेदवारांबद्दल त्यांचे प्रेम उतू जाणारे आहे. स्थानिक नेतृत्वाला संधी देण्याची ताकद मोदी-शहा यांच्याकडे नाही. त्यांच्या दिखाऊ प्रचारास मतदार भुलले नाहीत. याचा अर्थ लोकांमध्ये राजकीय शहाणपण पुन्हा दिसायला लागले, असा या निवडणूक निकालांचा खरा अन्वयार्थ असल्याचे भटेवरा यांनी सांगितले. आसाम, तामिळनाडू आदी राज्यांचा निवडणुकीतून हेच प्रकर्षाने दिसून आले. स्पर्धात्मक राजकारणाची ही सुरुवात असून, समानतेचे वातावरण निर्माण होत असल्याने ही शुभसूचक घटना आहे. या निवडणुकीत अँटी इन्कम्बन्सी दिसून आली नाही. काँग्रेससह डाव्यांनीही एकाधिकारशाहीच्या विरोधात भूमिका घेतली आणि त्यामुळे भाजपच्या वारूला लगाम बसल्याचे भटेवरा म्हणाले. याप्रसंगी मविप्रचे चिटणीस डॉ. सुनील ढिकले उपस्थित होते. व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले, तर संगीता बाफना यांनी आभार मानले.

फोटो

०७भटेवरा