शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

बहुपक्षीय लोकशाहीला मतदारांची पसंती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:13 IST

नाशिक : भारतात बहुपक्षीय लोकशाही टिकली पाहिजे, या भावनेतून मतदारांनी पाच राज्यांच्या निवडणुकीत कौल दिला, असे ठाम मत ज्येष्ठ ...

नाशिक : भारतात बहुपक्षीय लोकशाही टिकली पाहिजे, या भावनेतून मतदारांनी पाच राज्यांच्या निवडणुकीत कौल दिला, असे ठाम मत ज्येष्ठ पत्रकार ॲड. सुरेश भटेवरा यांनी व्यक्त केले.

डिजिटल वसंत व्याख्यानमालेत ते बोलत होते, स्व. उत्तमराव ढिकले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, पाँडिचेरी विधानसभा निवडणूक निकालांचे विश्लेषण’ या विषयावर भटेवरा यांनी सातवे पुष्प गुंफले. भारतीय लोकशाहीवर, सहिष्णुतेवर, धर्मनिरपेक्षतेवर त्यांच्यासाठी सारेच काही संपले नाही, हे या निवडणूक निकालाने दाखवून दिले आहे. बंगाल जिंकायचाच म्हणून मोदी, शहा, नड्डा यांनी सर्वस्व पणाला लावले. सरकारी यंत्रणा, केंद्रीय मंत्र्यांची फौज, इतकेच काय तर निवडणूक आयोगानेही आज्ञाधारक मुलाप्रमाणे काम केले; पण प्रादेशिक अस्मिता बंगालमध्ये सरस ठरली, असेही भटेवरा यांनी स्पष्ट केले. भाजपला काँग्रेसमुक्त भारत नाही, तर विरोधकमुक्त भारत करायचा आहे. भाजपची ही सत्तालोलुपता वाढत चालली असून, पर पक्षातील उमेदवारांबद्दल त्यांचे प्रेम उतू जाणारे आहे. स्थानिक नेतृत्वाला संधी देण्याची ताकद मोदी-शहा यांच्याकडे नाही. त्यांच्या दिखाऊ प्रचारास मतदार भुलले नाहीत. याचा अर्थ लोकांमध्ये राजकीय शहाणपण पुन्हा दिसायला लागले, असा या निवडणूक निकालांचा खरा अन्वयार्थ असल्याचे भटेवरा यांनी सांगितले. आसाम, तामिळनाडू आदी राज्यांचा निवडणुकीतून हेच प्रकर्षाने दिसून आले. स्पर्धात्मक राजकारणाची ही सुरुवात असून, समानतेचे वातावरण निर्माण होत असल्याने ही शुभसूचक घटना आहे. या निवडणुकीत अँटी इन्कम्बन्सी दिसून आली नाही. काँग्रेससह डाव्यांनीही एकाधिकारशाहीच्या विरोधात भूमिका घेतली आणि त्यामुळे भाजपच्या वारूला लगाम बसल्याचे भटेवरा म्हणाले. याप्रसंगी मविप्रचे चिटणीस डॉ. सुनील ढिकले उपस्थित होते. व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले, तर संगीता बाफना यांनी आभार मानले.

फोटो

०७भटेवरा