शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

स्मारकाला दिल्या जाणाऱ्या भेटी दलित व्होट बॅँकेसाठीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 00:27 IST

इंदू मिल येथील आंबेडकर स्मारकाला दिल्या जाणाºया भेटी या दलित व्होट बॅँकेसाठी असल्याचा आरोप करीत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केला. मुंबईतील नाइट लाइफमुळे गुन्हेगारीत वाढ होण्याचा धोका अधिक आहे. गुन्हेगारी टोळ्यांचे यामुळे फावणार असून, शिवाय महिलांची सुरक्षितता धोक्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देआठवले : नाइटलाइफमुळे महिला सुरक्षेला धोका

नाशिक : इंदू मिल येथील आंबेडकर स्मारकाला दिल्या जाणाºया भेटी या दलित व्होट बॅँकेसाठी असल्याचा आरोप करीत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केला. मुंबईतील नाइट लाइफमुळे गुन्हेगारीत वाढ होण्याचा धोका अधिक आहे. गुन्हेगारी टोळ्यांचे यामुळे फावणार असून, शिवाय महिलांची सुरक्षितता धोक्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.परिषदेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर टीकाही केली. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शरद पवार यांनी मुंबईतील इंदू मिल येथील आंबेडकर स्मारकाची पाहणी केली. त्यावर आठवले यांनी दलित व्होट बॅँकेच्या दृष्टीने स्मारकाची पाहणी अनेक जण करत असल्याची टीका केली. जोपर्यंत आपण पंतप्रधान मोदींसोबत आहे, तोपर्यंत आमची मते पवारांना मिळणार नाही, असा चिमटादेखील त्यांनी काढला. साडेबारा एकरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाचे भूमिपजून झाले होते. चबुतºयासह साडेतीनशे फुटांचा पुतळा त्या ठिकाणी उभारला जाणार आहे. भूमिगत काम सुरू असल्याने ते काम दिसून येत नाही. मी लवकरच स्मारकाला भेट देणार आहे. स्मारकाचा निधी वाडिया हॉस्पिटलला देणे मला मान्य नाही, असे सांगत प्रकाश आंबेडकरांची भूमिका मान्य नसल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारने गरिबांसाठी असलेल्या वाडिया हॉस्पिटलला स्वतंत्र निधी द्यावा, अशी सूचना त्यांनी केली.नाइटलाइफविषयी त्यांनी रात्री सर्व आस्थापना सुरू ठेवणे हे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने अडचणीचे ठरणार असल्याचे सांगितले. मातोरी येथील फार्महाउस येथे काही दिवसांपूर्वी दोन युवकांवर झालेल्या अत्याचार व गैरकृत्याबाबत विचारले असता पोलीस गुन्हेगारांवर कारवाई करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.नागरिकत्व कायदा हा कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. कायदा समजून घेण्याची गरज आहे. विरोधकांना पाच वर्षे मोदींच्या विरोधात बोलण्यासाठी मुद्दा नव्हता. आता विरोधक हा मुद्दा पुढे करत आहेत. या कायद्याबाबत सूचना असल्यास त्या पाठवाव्यात असे आठवलेंनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले