शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
2
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
3
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
4
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
5
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
6
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
7
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
8
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
9
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
10
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
11
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
12
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
13
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; स्वत:च रचलेला हत्येचा भयंकर कट अन्...
14
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
15
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?
16
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
17
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
18
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
19
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
20
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे

ग्रामस्थांचा दारू अड्ड्यावर हल्लाबोल

By admin | Updated: May 6, 2017 00:56 IST

कंधाणे : ग्रामसभेच्या ठरावाला सर्वच विभागांनी केराची टोपली दाखविल्याने अखेर ग्रामस्थांनीच धडक देत हा दारू अड्डा उद्ध्वस्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्ककंधाणे : ग्रामसभेच्या ठरावाला सर्वच विभागांनी केराची टोपली दाखविल्याने अखेर ग्रामस्थांनीच धडक देत हा दारू अड्डा उद्ध्वस्त केला. या घटनेनंतर पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील कारवाई केली. बागलाण तालुक्यातील कंधाणे येथील गावठी दारूचा व्यवसाय बंद करण्याचा एकमुखी ठराव ग्रामसभेत करून तसे सटाणा पोलीस स्टेशन, तहसीलदार, राज्य उत्पादन विभागाला कळवूनही या अवैध गावठी दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. पण गेल्या चार ते पाच दिवसांपासून संबंधितांकडून वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले गेल्याने येथील तरुणांनी एकत्र येत अवैध सुरू असलेल्या गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करत संबंधित विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. सुरुवातीला दाद न देणारे पोलीस प्रशासन नागरिकांच्या दबावापुढे झुकले व घटनास्थळी भेट देत संबंधितांवर गुन्हे नोंदविण्याचे आश्वासन देऊन त्यांनी तेथून काढता पाय घेतला.येथे आदिवासी वस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अवैध गावठी दारूचा व्यवसाय चालतो. या व्यवसायातून महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल होते. या दारूमुळे अनेक नागरिक व्यसनाच्या आहारी गेले आहेत. यात वापरण्यात येणारे रासायनिक घटक मानवी शरीरास अत्यंत घातक असून, त्यामुळे बऱ्यास नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर काहींना जीवघेण्या व्याधी लागल्या आहेत. या व्यवसाय परिसरात नेहमी तळीरामांची वर्दळ राहत असल्याने परिसरातील नागरिकांना याचा उपद्रव सहन करावा लागत होता. गावात दि. १ मेच्या ग्रामसभेत गावतील अवैध गावठी दारूबंदीसाठी ठराव करण्यात येऊन, त्यासाठी कमिटीची स्थापना करण्यात आली. याबाबतचा तपशील संबंधित विभागाला देऊन मदतीची मागणी करण्यात आली. ग्रामसभेत एकमुखी ठराव झाला. तरीही संबंधित व्यवसायिकांनी आपली मुजोरी कायम ठेवत सर्रास व्यवसाय चालूच ठेवला. संबंधित पोलिसांना याबाबत माहिती दिली तरीही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. शेवटी ‘गाव करी ते राव काय करी’ या म्हणीप्रमाणे येथील तरुणांनी सकाळी एकत्र येत संबंधित ठिकाणी छापा टाकत गावठी दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य उद्ध्वस्त केले. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस प्रशासनाला विनंती केली. सुरुवातीला फोनवर दाद न देणाऱ्या पोलीस प्रशासनाने नागरिक आंदोलनाच्या तयारीत असताना घटनास्थळी दाखल होत गुन्हे नोंदविण्याचे आश्वासन दिले व नागरिकांचा रोष शांत केला.