शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
2
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
3
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
4
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
5
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
6
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
7
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
8
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
9
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
10
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
11
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
12
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
13
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
14
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
15
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
18
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
19
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
20
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

ग्रामस्थांचा दारू अड्ड्यावर हल्लाबोल

By admin | Updated: May 6, 2017 00:56 IST

कंधाणे : ग्रामसभेच्या ठरावाला सर्वच विभागांनी केराची टोपली दाखविल्याने अखेर ग्रामस्थांनीच धडक देत हा दारू अड्डा उद्ध्वस्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्ककंधाणे : ग्रामसभेच्या ठरावाला सर्वच विभागांनी केराची टोपली दाखविल्याने अखेर ग्रामस्थांनीच धडक देत हा दारू अड्डा उद्ध्वस्त केला. या घटनेनंतर पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील कारवाई केली. बागलाण तालुक्यातील कंधाणे येथील गावठी दारूचा व्यवसाय बंद करण्याचा एकमुखी ठराव ग्रामसभेत करून तसे सटाणा पोलीस स्टेशन, तहसीलदार, राज्य उत्पादन विभागाला कळवूनही या अवैध गावठी दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. पण गेल्या चार ते पाच दिवसांपासून संबंधितांकडून वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले गेल्याने येथील तरुणांनी एकत्र येत अवैध सुरू असलेल्या गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करत संबंधित विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. सुरुवातीला दाद न देणारे पोलीस प्रशासन नागरिकांच्या दबावापुढे झुकले व घटनास्थळी भेट देत संबंधितांवर गुन्हे नोंदविण्याचे आश्वासन देऊन त्यांनी तेथून काढता पाय घेतला.येथे आदिवासी वस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अवैध गावठी दारूचा व्यवसाय चालतो. या व्यवसायातून महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल होते. या दारूमुळे अनेक नागरिक व्यसनाच्या आहारी गेले आहेत. यात वापरण्यात येणारे रासायनिक घटक मानवी शरीरास अत्यंत घातक असून, त्यामुळे बऱ्यास नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर काहींना जीवघेण्या व्याधी लागल्या आहेत. या व्यवसाय परिसरात नेहमी तळीरामांची वर्दळ राहत असल्याने परिसरातील नागरिकांना याचा उपद्रव सहन करावा लागत होता. गावात दि. १ मेच्या ग्रामसभेत गावतील अवैध गावठी दारूबंदीसाठी ठराव करण्यात येऊन, त्यासाठी कमिटीची स्थापना करण्यात आली. याबाबतचा तपशील संबंधित विभागाला देऊन मदतीची मागणी करण्यात आली. ग्रामसभेत एकमुखी ठराव झाला. तरीही संबंधित व्यवसायिकांनी आपली मुजोरी कायम ठेवत सर्रास व्यवसाय चालूच ठेवला. संबंधित पोलिसांना याबाबत माहिती दिली तरीही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. शेवटी ‘गाव करी ते राव काय करी’ या म्हणीप्रमाणे येथील तरुणांनी सकाळी एकत्र येत संबंधित ठिकाणी छापा टाकत गावठी दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य उद्ध्वस्त केले. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस प्रशासनाला विनंती केली. सुरुवातीला फोनवर दाद न देणाऱ्या पोलीस प्रशासनाने नागरिक आंदोलनाच्या तयारीत असताना घटनास्थळी दाखल होत गुन्हे नोंदविण्याचे आश्वासन दिले व नागरिकांचा रोष शांत केला.