शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

ग्रामस्थांचा दारू अड्ड्यावर हल्लाबोल

By admin | Updated: May 6, 2017 00:56 IST

कंधाणे : ग्रामसभेच्या ठरावाला सर्वच विभागांनी केराची टोपली दाखविल्याने अखेर ग्रामस्थांनीच धडक देत हा दारू अड्डा उद्ध्वस्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्ककंधाणे : ग्रामसभेच्या ठरावाला सर्वच विभागांनी केराची टोपली दाखविल्याने अखेर ग्रामस्थांनीच धडक देत हा दारू अड्डा उद्ध्वस्त केला. या घटनेनंतर पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील कारवाई केली. बागलाण तालुक्यातील कंधाणे येथील गावठी दारूचा व्यवसाय बंद करण्याचा एकमुखी ठराव ग्रामसभेत करून तसे सटाणा पोलीस स्टेशन, तहसीलदार, राज्य उत्पादन विभागाला कळवूनही या अवैध गावठी दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. पण गेल्या चार ते पाच दिवसांपासून संबंधितांकडून वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले गेल्याने येथील तरुणांनी एकत्र येत अवैध सुरू असलेल्या गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करत संबंधित विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. सुरुवातीला दाद न देणारे पोलीस प्रशासन नागरिकांच्या दबावापुढे झुकले व घटनास्थळी भेट देत संबंधितांवर गुन्हे नोंदविण्याचे आश्वासन देऊन त्यांनी तेथून काढता पाय घेतला.येथे आदिवासी वस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अवैध गावठी दारूचा व्यवसाय चालतो. या व्यवसायातून महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल होते. या दारूमुळे अनेक नागरिक व्यसनाच्या आहारी गेले आहेत. यात वापरण्यात येणारे रासायनिक घटक मानवी शरीरास अत्यंत घातक असून, त्यामुळे बऱ्यास नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर काहींना जीवघेण्या व्याधी लागल्या आहेत. या व्यवसाय परिसरात नेहमी तळीरामांची वर्दळ राहत असल्याने परिसरातील नागरिकांना याचा उपद्रव सहन करावा लागत होता. गावात दि. १ मेच्या ग्रामसभेत गावतील अवैध गावठी दारूबंदीसाठी ठराव करण्यात येऊन, त्यासाठी कमिटीची स्थापना करण्यात आली. याबाबतचा तपशील संबंधित विभागाला देऊन मदतीची मागणी करण्यात आली. ग्रामसभेत एकमुखी ठराव झाला. तरीही संबंधित व्यवसायिकांनी आपली मुजोरी कायम ठेवत सर्रास व्यवसाय चालूच ठेवला. संबंधित पोलिसांना याबाबत माहिती दिली तरीही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. शेवटी ‘गाव करी ते राव काय करी’ या म्हणीप्रमाणे येथील तरुणांनी सकाळी एकत्र येत संबंधित ठिकाणी छापा टाकत गावठी दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य उद्ध्वस्त केले. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस प्रशासनाला विनंती केली. सुरुवातीला फोनवर दाद न देणाऱ्या पोलीस प्रशासनाने नागरिक आंदोलनाच्या तयारीत असताना घटनास्थळी दाखल होत गुन्हे नोंदविण्याचे आश्वासन दिले व नागरिकांचा रोष शांत केला.