शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

जंगलातील पाण्याचे श्रोत आटल्याने ेबिबट्या पाण्याच्या शोधार्थ गावाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 18:15 IST

पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस परिसरातील कसाड शिवारात बिबट्याचा उपद्रव वाढला असून काल रात्री बिबट्याने गिरणा नदी काठालगत असलेल्या कसाड मळा शिवारातील शेतकरी समाधान आहेर या शेतकºयाच्या घरालगत असलेल्या खळ्यातुन शेळी चा फडशा पाडून उसाच्या शेतात नेऊन फस्त केल्याची घटना मंगळवारी रात्री घडल्याने गिरणा नदीकाठ लागून असलेल्या पिळकोस ग्रामस्थांनी बिबट्याचा मोठा धसका घेतला आहे. वनविभागाने बिबट्याला पिंजरा लाऊन जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ठळक मुद्देपिळकोस : शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले अनुभवाचे बोल

पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस परिसरातील कसाड शिवारात बिबट्याचा उपद्रव वाढला असून काल रात्री बिबट्याने गिरणा नदी काठालगत असलेल्या कसाड मळा शिवारातील शेतकरी समाधान आहेर या शेतकºयाच्या घरालगत असलेल्या खळ्यातुन शेळी चा फडशा पाडून उसाच्या शेतात नेऊन फस्त केल्याची घटना मंगळवारी रात्री घडल्याने गिरणा नदीकाठ लागून असलेल्या पिळकोस ग्रामस्थांनी बिबट्याचा मोठा धसका घेतला आहे. वनविभागाने बिबट्याला पिंजरा लाऊन जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.परिसरात बिबट्या येण्याचे प्रमाण हे दहा वर्षापासून वाढले असून आजवर या जंगलात पाणी मुबलक असल्याने बिबट्या हा पिळकोस येथील मेंगदर, फांगदर डोंगरातील जंगलात आढळून येत होता. परंतु यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने जंगलातील पाण्याचे श्रोत पूर्णपणे आटल्यामुळे बिबट्या हा पाण्याच्या शोधार्थ नदीकाठालाकडे आल्याचे यावेळी शेतकºयांकडून सांगण्यात आले. नदीकाठ परिसरात रात्रीच्या वेळेस परिसर हा बिबट्याच्या डर्काळ्यांनी दणाणून निघत असून शेतकरी, पशुपालक व शिवारातील वास्तव्यास असलेले ग्रामस्थ बिबट्याच्या दहशतीमुळे आपले पशुधन वाचण्यासाठी रात्र जागून काढत आहेत.पिळकोस येथील गिरणाकाठच्या कसाड शिवारातील परिसरातील बिबट्या जेरबंद करणे अत्यंत गरजेचे झाले असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.कळवण तालुक्यातील मोकभनिग, विसापूर, पांढरीपाडा, भादवण, पिळ्कोस, गांगवन, धनगरपाडा हि गावे चौरंगनाथ किल्ला व देवडोंगाराच्या पायथ्याजवळील गावे असून या गावांना बिबट्याचा उपद्रव सहन करावा लागत आहे. बिबट्यामुळे परिसरातील शेकडो पशुधनाचा आजवर फडशा पडला असून शेतकरी व पशुपालक यांचे मोठ्या प्रमाणावर पशुधनाचे नुकसान झाले आहे. तरी संबंधित विभागाने परीसरात पिंजरा लावावा व परीसारतील बिबट्यांना जेरबंद करावे अशी मागणी पशुपालक व शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.गावातील बहुतेक आदिवाशी बांधव हे वडिलोपार्जित शेळीपालन व्यवसाय करतात तर गावातील सर्व शेतकºयांकडे गाई, म्हशी, बैल, शेळ्या आदी जनावरे आहेत. बिबट्या कसाड परिसरात आढळून आल्याने गावातील शेळीपालन करणारे आदिवासी बांधव व शेतकरी धास्तावले असून वनविभागाने पशुधनाचा विचार करता त्वरित पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे व ग्रामस्थांना दिलासा द्यावा.- सुनील मोतीराम जाधव,शेतकरी व पशुपालक, पिळकोस.