शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

खळ्यांवर कांदा विक्रीला शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:15 IST

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता नियंत्रण मिळविण्यासाठी गेल्या सहा दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील खरेदी-विक्रीचे व्यवहार दहा दिवसांसाठी पूर्णतः ...

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता नियंत्रण मिळविण्यासाठी गेल्या सहा दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील खरेदी-विक्रीचे व्यवहार दहा दिवसांसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात आले आहेत; परंतु बहुतांशी शेतकऱ्यांचा कांदा माल उघड्यावर असून शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान होऊ नये म्हणून जिल्हा उपनिबंधकांच्या सल्ल्यानुसार येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून पर्यायी व्यवस्था म्हणून सोमवारपासून बाजार समितीचे कामकाज सुरू करण्यात आले. मात्र, हे कामकाज पूर्ववत बाजार समितीच्या आवारात खुल्या पद्धतीने लिलाव न करता ज्या शेतकऱ्यांना आपला कांदा विक्री करावयाचा असेल त्यांनी संबंधित परवानाधारक कांदा व्यापाऱ्यांच्या खळ्यांवर जाऊन व्यापारी व संबंधित कांदा विक्रेता शेतकरी यांच्या समन्वयाने कांद्याचे दर ठरणार होते. शिवाय ज्या शेतकऱ्यांना बाजारभाव पटला नाही त्यांना अन्य दुसऱ्या व्यापाऱ्यांकडे कांदा माल घेऊन जाण्याची मुभा देण्यात आली होती; परंतु हे लिलाव त्या-त्या कांदा व्यापाऱ्यांच्या खळ्यांतच होणार असल्याने कोणता व्यापारी किती भाव देतो याबाबत कांदा उत्पादक शेतकरी संभ्रमावस्थेत सापडला आहे. त्यामुळे बाजार समितीने सुरू केलेल्या भाव भरून देण्याच्या प्रक्रियेला कांदा विक्रेते शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असून, एका दिवसात पंधराशे ते दोन हजार वाहनांची आवक होणाऱ्या बाजार समितीत अवघ्या चाळीस ते पन्नास वाहनांची आवक झाली होती. त्यामुळे कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून खुल्या पद्धतीने लिलाव प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी कांदा विक्रेत्या शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनी केली आहे.

इन्फो

बाजारभावात घसरण

खुल्या पद्धतीने लिलाव सुरू होते तेव्हा उन्हाळी कांद्याचे दर जास्तीत जास्त १७०० रुपयांपर्यंत होते. त्याच प्रकारच्या कांद्यांना भाव भरून देण्याच्या प्रक्रियेदरम्यान १३०० ते १४०० रुपयांपर्यंत व्यापाऱ्यांकडून मागणी करण्यात आल्याचे कांदा विक्रीस आलेल्या शेतकऱ्यांनी बोलून दाखविले.

कोट....

व्यापाऱ्यांच्या खळ्यांवर कांदा विक्रीस आणला असता त्या कांद्यास एका खळ्यातील व्यापारी १००० रुपये, दुसऱ्या खळ्यातील व्यापारी १०५० रुपये, तर तिसऱ्या खळ्यातील व्यापारी ११०० रुपये दर ठरवतो. त्यामुळे कांदा विक्रीविषयी संभ्रम निर्माण होत असल्याने खुल्या पद्धतीने लिलाव सुरू करावेत.

- संभाजी देवरे, शेतकरी, उमराणे

कोट.....

निर्यातक्षम कांदा मालाला मागणी आहे; परंतु खळ्यात पाहिजे त्या प्रमाणात कांदा उपलब्ध होत नाही. खुल्या पद्धतीने लिलाव सुरू झाल्यास बाजारात प्रतवारीनुसार जास्त दराने बोली लावुून कांदा खरेदी करून मागणी पूर्ण करता येते.

- संतोष बाफणा, कांदा व्यापारी

फोटो- १७ उमराणे-१

खरेदीसाठी इच्छुक असतानाही कांंदा विक्रीसाठी वाहने न आल्याने व्यापाऱ्यांच्या खळ्यांवर असलेला शुकशुकाट.

===Photopath===

170521\17nsk_22_17052021_13.jpg

===Caption===

फोटो- १७ उमराणे-१ खरेदीसाठी इच्छुक असतांनाही कांंदा विक्रीसाठी वाहने न आल्याने व्यापाऱ्यांच्या खळ्यांवर असलेला शुकशुकाट.