शहरं
Join us  
Trending Stories
1
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
2
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
3
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
4
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
5
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
6
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
7
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
8
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
9
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
10
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
11
SA20 : सलामीच्या सामन्यात MI फ्रँचायझी संघाकडून हिटमॅन रोहितच्या जोडीदाराचा शतकी धमाका, पण...
12
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
13
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
14
Tarot Card: येत्या आठवड्यात वर्ष बदलतेय, त्याबरोबर भाग्यही बदलणार? वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
15
भाजपा नेत्याच्या कारने ५ जणांना चिरडलं; जमावाने पकडलं, मात्र पोलिसांच्या तावडीतून आरोपी फरार
16
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावात भाजपा-शिंदेसेनेची युती अधांतरी, कार्यकर्त्यांत संभ्रम; गिरीश महाजनांना साकडं
17
आपल्या मुलांसाठी LIC च्या 'या' स्कीममध्ये करू शकता गुंतवणूक; जबरदस्त रिटर्नसह मिळेल इन्शुरन्स, पटापट पाहा डिटेल्स
18
भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
19
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
20
Post Office Investment Scheme: दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

वीरगावी शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 23:40 IST

वीरगाव : प्रलंबित केळझर चारी क्र . आठच्या कामास तत्काळ सुरुवात करावी यासाठी लाभक्षेत्रातील शेकडो शेतकºयांनी शहादा-शिर्डी राष्ट्रीय महामार्ग वीरगाव (ता. बागलाण) येथे सुमारे एक तास अडवून ठिय्या आंदोलन केले.

ठळक मुद्देठिय्या : केळझर चारीचे काम १९९९ पासून प्रलंबित 

वीरगाव : प्रलंबित केळझर चारी क्र . आठच्या कामास तत्काळ सुरुवात करावी यासाठी लाभक्षेत्रातील शेकडो शेतकºयांनी शहादा-शिर्डी राष्ट्रीय महामार्ग वीरगाव (ता. बागलाण) येथे सुमारे एक तास अडवून ठिय्या आंदोलन केले.जोपर्यंत काम चालू होत नाही तोपर्यंत महामार्गावरून हलणार नाही, अशी भूमिका यावेळी आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला होता; मात्र यावेळी खासदार सुभाष भामरे यांच्या वतीने डॉ. शेषराव पाटील यांनी लघु पाटबंधारे विभागाच्या संबंधित अधिकारी वर्गासमवेत आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन या कामात असलेल्या तांत्रिक अडचणी तत्काळ दूर करण्याचे आश्वासन दिले.तसेच ३० सप्टेंबरच्या आत कोणत्याही परिस्थितीत चारीच्या कामास सुरुवात करण्याबाबतचे ठोस लेखी आश्वासन शेतकरीवर्गाला दिल्यानंतर अखेर आंदोलन मागे घेण्यात आले. सन १९९९ साली युती शासनाच्या कालावधीत डोंगरेज ते मुळाणे या ११ किमी लांबीच्या चारी क्र . आठच्या कामास सुधारित मान्यता प्राप्त झाली आहे.या चारीसाठी सुमारे अडीच कोटींचा निधी मंजूर होऊन यातून या चारीचे सुमारे साठ टक्के कामही मार्गी लागले आहे; मात्र गत दहा ते बारा वर्षांच्या कालावधीत उर्वरित कामासाठी शासन पातळीवरून भरीव निधीच उपलब्ध होत नसल्याने हे काम सद्यस्थितीत प्रलंबित अवस्थेत पडून आहे.सदर काम तत्काळ चालूव्हावे यासाठी या गावातील शेतकरीवर्गाने अनेक वेळा एकत्र येत कृती समितीच्या माध्यमातून प्रशासनास वारंवार निवेदनही दिले आहेत; मात्र यानंतरही ढिम्म प्रशासन तसूभरही हालत नसल्याने या गावातील जनतेने अखेर स्वातंत्र्यदिनी रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला.पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सटाणा पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाआंदोलनात वीरगाव, डोंगरेज, भंडारपाडे, वनोली, तरसाळी, औंदाणे, कौतिकपाडे, भाक्षी, मुळाणे, चौगाव, रातीर, सुराणे, देवळाणे, वायगाव या गावातील शेकडोंच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी राष्ट्रीय महामार्गावर या शेकडो आंदोलनकर्त्यांनी ठिय्या दिल्याने प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. सुमारे एक तास आंदोलनकर्त्यांनी हा महामार्ग अडवून धरल्याने महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या. कोणत्याही परिस्थितीत चारीचे काम चालू झालेच पाहिजे, काम चालू होईपर्यंत रस्त्यावरून हलणार नाही, काम चालू करण्याचे लेखी आश्वासन मिळावे, आमदार व खासदार यांनी आंदोलनस्थळी येऊन या कामात असलेल्या अडीअडचणी व प्रगती जनतेला सांगावी यासाठी आंदोलनकर्ते अडून बसल्याने व या कालावधीत प्रचंड घोषणाबाजी करण्यात आल्याने हे आंदोलन चिघळण्याची स्थिती निर्माण झाली होती. यातच या आंदोलनकर्त्यांना आश्वासन देण्यासाठी तब्बल एक तास कोणताही शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी सामोरे न गेल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या माध्यमातून संबंधित अधिकारीवर्गाच्या उपस्थितीत याप्रश्नी ठोस आश्वासन मिळाल्याने आता ३० सप्टेंबरपर्यंत हे काम चालू होण्याची आम्ही वाट पाहणार आहोत. कोणत्याही परिस्थितीत हे काम चालू होणारच, असा शब्द शेषराव पाटील यांनी जनतेला दिला आहे. तो शब्द ते नक्की पाळतील, असा आम्हाला विश्वास आहे.- नंदकिशोर शेवाळे, अध्यक्ष, चारी क्र . ८ कृती समिती