शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वरुणराजाच्या वक्रदृष्टीने बळीराजा चिंतातुर !

By admin | Updated: June 27, 2014 00:14 IST

वरुणराजाच्या वक्रदृष्टीने बळीराजा चिंतातुर !

 

विक्रम देवरे

दरेगावअरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे पावसाचे आगमन लांबले आहे. त्यामुळे चांदवड तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत असून पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, डाळींबबागांचे संकट व उशिरा झालेल्या खरिपाच्या पेरण्या यासारख्या चक्रव्यूहाने बळीराजा चिंताग्रस्त आहे. तालुक्यातील पूर्व भाग सातत्याने दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. सिंचनाची कोणतीही सोय नसल्यामुळे केवळ निसर्गावर अवलंबून असणारे येथील शेती व शेतीपूरक व्यवसाय दृष्टचक्रात सापडले आहे. जनावरांचा चारा संपुष्टात आला असून, चारा आणायचा कोठून हा प्रश्न आहे. दरेगाव परिसरात डाळींबबागा भरपूर आहेत. मात्र गतवर्षीही अत्यल्प पाणी यावर्षी मान्सूनचे लांबलेले आगमन यामुळे डाळिंबाचे भवितव्य धोक्यात आले असून, पाणीपुरवठ्यासाठी कोणतीही यंत्रणा नसणाऱ्या बहुतांश शेतकऱ्यांनी डाळींबबाग तोडून टाकल्या आहेत, तर काही शेतकऱ्यांनी जळालेल्या बागा पाऊस येईल या आशेने छाटणी करून ठेवलेल्या आहेत. या भागात बोटावर मोजण्याइतके शेतकऱ्यांकडे असणाऱ्या शेततळ्यातील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. काहंी शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात डाळींब बहार धरून ठेवलेला आहे. त्यासाठी गेल्या दोन-चार महिन्यांपासून दूरवरून टॅँकरद्वारे पाणी विकत आणणारे शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल झाले असून, अनेकांना ऐन मध्यावर आलेले पीक धरावे की सोडावे, अशी परिस्थिती आहे. एकतर कांदा बियाण्याची टंचाई आहे. त्यातच थोडेफार बियाणे आहे त्याची रोपे तयार करण्याइतपतसुद्धा पाणी नाही. टमाटा या पिकाची हीच परिस्थिती आहे. पाऊस नसल्याने अद्यापही पेरणीपूर्व मशागती जमिनीच्या झालेल्या नाही. तसेच खरिपासाठी लागणाऱ्या बी-बियाणे खरेदीही थांबली आहे. (वार्ताहर)