शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
5
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
6
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
7
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
8
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
9
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
10
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
11
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
12
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
13
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
14
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
15
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
16
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
17
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
18
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
19
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
20
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...

‘राहू-केतू’च्या वक्रदृष्टीवर पितृपक्षात ‘उतारा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:16 IST

मुळात शासकीय सेवेत शुभ-अशुभ असे कधी नसतेच, असते ते फक्त कर्तव्य व जबाबदारीचे पालन. त्यामुळे नवीन सेवेत दाखल झालेल्यांना ...

मुळात शासकीय सेवेत शुभ-अशुभ असे कधी नसतेच, असते ते फक्त कर्तव्य व जबाबदारीचे पालन. त्यामुळे नवीन सेवेत दाखल झालेल्यांना कर्तव्य व जबाबदारीचे पालन करताना पितृपक्ष हा शुभ कार्यासाठीच असतो याची जाणीव करून देण्याची वेळ येणार नाही, असे मानावयास हरकत नाही. असो. खरे तर अनुकंपा तत्त्वावरील या उमेदवारांवरील नोकरीचे ‘विघ्न’ गणेशोत्सवाच्या काळातच दूर होणे अपेक्षित होते; परंतु तत्पूर्वीच जिल्हा परिषदेवर अगोदर अनुसूचित जमाती कल्याण समिती व त्यानंतर पंचायत राज समितीच्या ‘राहू-केतू’ची वक्रदृष्टी पडली व महिनाभर प्रशासनाला ‘अंधश्रद्धे’च्या जोखडात जखडून ठेवले. अनेक ग्रह-ताऱ्यांची समजूत काढताना जी काही प्रशासनाची दमछाक झाली ते पाहता, पुण्यकर्माची तशीही आवश्यकता असल्याची अंधश्रद्धा जोपासणाऱ्यांसाठी अनुकंपा कर्मचाऱ्यांचे पुण्य पदरात पडले आहे. अर्थात श्रद्धा-अंधश्रद्धा ही देखील प्रत्येकाची खासगी भावना आहे. त्यामुळे वाऱ्याच्या व दिशेच्या प्रेमात पडून आपल्या खुर्च्या-टेबलाची दिशा गुपचूप बदलून घेण्याची अंधश्रद्धा बाळगणाऱ्यांसाठी पितृपक्षाचा हा काळ तसाही अशुभच. मात्र, प्रशासनाने या साऱ्या गोष्टींना मूठमाती देत आपले ‘पुण्य’कर्म कायम ठेवले आहे. गेल्या वर्षीही प्रशासनाने तब्बल शंभराहून अधिक अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांना सेवेत सामावून घेतले. एकाच दिवशी उमेदवारांची शैक्षणिक गुणवत्तेवर निवड व रिक्त जागांवर समुपदेशनाने नियुक्ती देऊन उमेदवारांची व प्रशासनाची सोय या निमित्ताने पाहिली गेली. पारदर्शीपणे राबविण्यात आलेल्या या प्रक्रियेबाबत अजून तरी कोणतीही तक्रार वा ओरड झालेली नाही. तशी होणार नाही, याची खात्री उपरोक्त पद्धतीच्या वापराने होईल असे वाटत असले तरी, अशी तक्रार भविष्यात झालीच तर अनुकंपावरील नेमणुकीला पितृपक्षाचा ‘बोल’ लावण्यास तुम्ही-आम्ही मोकळेच.

- श्याम बागूल