शहरं
Join us  
Trending Stories
1
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
2
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
3
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
4
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
5
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार
6
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
7
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
8
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
9
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
10
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
11
भलीमोठी स्क्रीन, अल्ट्रा एचडी डिस्प्ले; सोनी कंपनीच्या टीव्हीवर थेट ५० हजारांची सूट!
12
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: ५ मिनिटांत होणारे गणेश स्तोत्र म्हणा, शाश्वत कृपा-लाभ मिळवा!
13
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
14
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
15
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
16
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
17
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
18
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
19
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?

भाजपच्या लक्षणीय यशात शहरी मतदारच निर्णायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 01:39 IST

फक्त शहरी भागापुरता असलेला पक्ष असे वारंवार म्हटल्या गेलेल्या भाजपने मात्र यंदा शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातदेखील उत्तम कामगिरी केल्याने चार जागा तर त्यांनी राखल्याच परंतु बागलाणची जागा बोनस मिळाली आहे. d

फक्त शहरी भागापुरता असलेला पक्ष असे वारंवार म्हटल्या गेलेल्या भाजपने मात्र यंदा शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातदेखील उत्तम कामगिरी केल्याने चार जागा तर त्यांनी राखल्याच परंतु बागलाणची जागा बोनस मिळाली आहे. भाजपच्या स्थापनेनंतर नाशिक जिल्ह्यात प्रथमच पाच जागा जिंकण्याचा विक्रम यंदा झाला आहे. अर्थात ग्रामीण भागापेक्षा अटीतटीच्या लढतीतदेखील शहरी भागातील मतदारच निर्णायक ठरला.युतीच्या जागावाटपात भाजपने एकूण सहा जागा लढविल्या होत्या. यात नाशिक शहरात तीन, तर ग्रामीण भागात देवळा-चांदवड, बागलाण आणि मालेगाव मध्य अशा सहा जागा लढवल्या होत्या. यात मालेगाव मध्य मध्ये लता वारुळे यांची उमेदवारी औपचारिकताच होती. बाकी मात्र सर्वच ठिकाणी तुल्यबळ उमेदवार दिले असली तरी निवडणुकीत मोठी आव्हाने उभी होती. नाशिक पूर्वमध्ये भाजपने आमदार बाळासाहेब सानप यांची उमेदवारी नाकारल्याने त्यांनी राष्टÑवादीत प्रवेश केला. त्यामुळे भाजपातील छुपी फूट मोठे आव्हान होते. सानप हे भाजपचे दीड दोन वर्षांपूर्वी पालकमंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय होते. त्यामुळे पालकमंत्र्यांची या जागेसाठी प्रतिष्ठा पणाला लागली होती. सानप यांना छुपी रसद अनेक ठिकाणाहून मिळत होती त्यातच मित्रपक्ष शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सानप यांची भेट घेतल्याने वेगळेच चित्र निर्माण झाले मात्र असे असतानाही राहुल ढिकले यांचा विजय अवघड असताना तो मिळाला. नाशिक पश्चिम मतदारसंघात सीमा हिरे यांना मात्र शिवसेनेचे मोठे आव्हान होते. मित्रपक्ष शिवसेनेनेच बंडखोर उभा करून पुरस्कृत केले. त्याचबरोबर राष्टÑवादी, मनसे आणि माकपा यांचेदेखील आव्हान होते. मात्र त्यालादेखील पुरून उरत भाजपने विजयाचा मार्ग सुकर केला. नाशिक मध्य मतदारसंघात तसे आमदार देवयानी फरांदे यांना आव्हान नाही असे मानले गेले तरीही कॉँग्रेस आणि मनसेने ते निर्माण केले. परंतु त्यानंतरदेखील त्या विजयीच झाल्या. शहरी भागातील अटीतटीच्या एकूण लढतीत पालकमंत्री गिरीश महाजन यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली.नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कांदा निर्यातबंदी आणि अन्य काही विषयांचे मोठे आव्हान होते. बागलाणसारखा अनुसूचित जमातींसारख्या मतदारसंघात आदिवासी आरक्षण हा मुद्दा महत्त्वाचा होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच येथे सभा घेऊन कांदा निर्यातबंंदी हटविण्याचे आश्वासन दिले त्याचबरोबर आदिवासी आरक्षणाला धक्का पोहोचणार नाही, असे आश्वासन दिल्याने या भागातील मते मात्र भाजपला मिळाली. चांदवड मतदारसंघात डॉ. राहुल आहेर यांना मंत्रिपदाचे संभाव्य उमेदवार जाहीर सभेत घोषित करणे हेदेखील वातावरण अनुकूल करण्यास उपयुक्तठरले.

टॅग्स :Electionनिवडणूक