शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
2
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
3
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
4
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
5
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
6
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
7
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
8
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
9
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
10
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
11
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
12
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
13
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
14
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
15
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
16
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
17
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
18
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
19
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
20
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप

भाजपच्या लक्षणीय यशात शहरी मतदारच निर्णायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 01:39 IST

फक्त शहरी भागापुरता असलेला पक्ष असे वारंवार म्हटल्या गेलेल्या भाजपने मात्र यंदा शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातदेखील उत्तम कामगिरी केल्याने चार जागा तर त्यांनी राखल्याच परंतु बागलाणची जागा बोनस मिळाली आहे. d

फक्त शहरी भागापुरता असलेला पक्ष असे वारंवार म्हटल्या गेलेल्या भाजपने मात्र यंदा शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातदेखील उत्तम कामगिरी केल्याने चार जागा तर त्यांनी राखल्याच परंतु बागलाणची जागा बोनस मिळाली आहे. भाजपच्या स्थापनेनंतर नाशिक जिल्ह्यात प्रथमच पाच जागा जिंकण्याचा विक्रम यंदा झाला आहे. अर्थात ग्रामीण भागापेक्षा अटीतटीच्या लढतीतदेखील शहरी भागातील मतदारच निर्णायक ठरला.युतीच्या जागावाटपात भाजपने एकूण सहा जागा लढविल्या होत्या. यात नाशिक शहरात तीन, तर ग्रामीण भागात देवळा-चांदवड, बागलाण आणि मालेगाव मध्य अशा सहा जागा लढवल्या होत्या. यात मालेगाव मध्य मध्ये लता वारुळे यांची उमेदवारी औपचारिकताच होती. बाकी मात्र सर्वच ठिकाणी तुल्यबळ उमेदवार दिले असली तरी निवडणुकीत मोठी आव्हाने उभी होती. नाशिक पूर्वमध्ये भाजपने आमदार बाळासाहेब सानप यांची उमेदवारी नाकारल्याने त्यांनी राष्टÑवादीत प्रवेश केला. त्यामुळे भाजपातील छुपी फूट मोठे आव्हान होते. सानप हे भाजपचे दीड दोन वर्षांपूर्वी पालकमंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय होते. त्यामुळे पालकमंत्र्यांची या जागेसाठी प्रतिष्ठा पणाला लागली होती. सानप यांना छुपी रसद अनेक ठिकाणाहून मिळत होती त्यातच मित्रपक्ष शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सानप यांची भेट घेतल्याने वेगळेच चित्र निर्माण झाले मात्र असे असतानाही राहुल ढिकले यांचा विजय अवघड असताना तो मिळाला. नाशिक पश्चिम मतदारसंघात सीमा हिरे यांना मात्र शिवसेनेचे मोठे आव्हान होते. मित्रपक्ष शिवसेनेनेच बंडखोर उभा करून पुरस्कृत केले. त्याचबरोबर राष्टÑवादी, मनसे आणि माकपा यांचेदेखील आव्हान होते. मात्र त्यालादेखील पुरून उरत भाजपने विजयाचा मार्ग सुकर केला. नाशिक मध्य मतदारसंघात तसे आमदार देवयानी फरांदे यांना आव्हान नाही असे मानले गेले तरीही कॉँग्रेस आणि मनसेने ते निर्माण केले. परंतु त्यानंतरदेखील त्या विजयीच झाल्या. शहरी भागातील अटीतटीच्या एकूण लढतीत पालकमंत्री गिरीश महाजन यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली.नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कांदा निर्यातबंदी आणि अन्य काही विषयांचे मोठे आव्हान होते. बागलाणसारखा अनुसूचित जमातींसारख्या मतदारसंघात आदिवासी आरक्षण हा मुद्दा महत्त्वाचा होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच येथे सभा घेऊन कांदा निर्यातबंंदी हटविण्याचे आश्वासन दिले त्याचबरोबर आदिवासी आरक्षणाला धक्का पोहोचणार नाही, असे आश्वासन दिल्याने या भागातील मते मात्र भाजपला मिळाली. चांदवड मतदारसंघात डॉ. राहुल आहेर यांना मंत्रिपदाचे संभाव्य उमेदवार जाहीर सभेत घोषित करणे हेदेखील वातावरण अनुकूल करण्यास उपयुक्तठरले.

टॅग्स :Electionनिवडणूक