शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

अवकाळी पावसाने प्रचाराचे नियोजन कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:35 IST

नाशिक: जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतीच्या प्रचारासाठी अवघे दोन दिवस उरले असून, प्रचाराची रणधुमाळी अधिकच रंगणार असल्याचे एकूणच चित्र आहे. ...

नाशिक: जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतीच्या प्रचारासाठी अवघे दोन दिवस उरले असून, प्रचाराची रणधुमाळी अधिकच रंगणार असल्याचे एकूणच चित्र आहे. अवकाळी पावसामुळे प्रचारात खंड पडल्याने उमेदवारांना आता उर्वरित दोन दिवसांत प्रचारात आघाडी घ्यावी लागणार असल्याने उमेदवार, तसेच त्यांच्या समर्थकांकडून प्रचाराचे फेरनियोजन केले जात आहे. येत्या १३ तारखेला सायंकाळी प्रचाराची सांगता होणार आहे.

जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ११ हजार १०५ उमेदवार आपले नशीब आजमवीत आहेत. निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार यंदा उमेदवारांना प्रचाराचा वेळ तसाही कमी मिळणार असल्याने, उमेदवारांनी माघारीच्या दिवसापासूनच प्रचाराला सुरुवात केली होती, परंतु पावसाचा व्यत्यय आल्याने उमेदवारांच्या मनसुब्यांवरही पाणी फिरले आहे. प्रचाराचे नियाेजन पावसामुळे कोलमडल्यामुळे कमी वेळेत उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. येत्या १३ तारखेला सायंकाळी प्रचाराची सांगता होणार असल्याने, उमेदवारांच्या हाती आता केवळ दोनच दिवस उरले आहेत.

निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अनेक राजकीय नेते, तसेच स्थानिक पुढाऱ्यांकडून प्रयत्न करण्यात आल्याने जवळपास दीड हजार प्रभागांमध्ये उमेदवार बिनविरोध आलेले आहेत, तर काही ठिकाणी ऐन वेळी उमेदवाराने अर्ज कायम ठेवल्याने दोन ते चार जागांसाठीच मतदान होत आहे. त्यामुळे या जागांमधील चुरशीची लढत महत्वाची ठरणार आहे. या निवडणुकांमध्ये आपापल्या मतदारसंघातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांकडे आमदारांनीही लक्ष घातल्याने आगामी दिवसात निवडणुकीतील चुरस अधिक बघायला मिळू शकते.

येत्या १३ सारखेला सायंकाळी प्रचाराची अधिकृत सांगता होणार असून, त्यानंतर स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासनाकडून देखरेख केली जाणार आहे. मतदानाच्या पूर्वीच्या दोन दिवसांतील घडोमोडीवर लक्ष केंद्रित करण्यासाठीचा कार्यक्रमही आखण्यात आला आहे. प्रचाराची सांगता झाल्यानंतर, १४ तारखेला निवडणूक कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रांवर पोहोचणार आहेत. १५ तारखेला प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होणार आहे.

--इन्फो--

प्रशासकीय तयारी पूर्णत्वाकडे

प्रचाराची सांगता झाल्यानंतर, १४ तारखेला निवडणूक कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रांवर पोहोचणार आहे. जिल्ह्यातील एकूण १,९३३ मतदान केंद्रांवर होणाऱ्या निवडणुकीसाठी अंदाजे १० हजार इतके कर्मचारी नियुक्त करावे लागणार आहेत. जिल्ह्यातील २,१३२ प्रभागामंध्ये ५,८९५ जागांसाठी निवडणुकीतील चुरस वाढली आहे. यापैकी १,६२७ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या असून, त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा मात्र झालेली नाही.