शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

टंकलेखनाची टकटक सुरूच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 00:55 IST

नोव्हेंबरनंतर टाइपराइटरची टकटक कायमस्वरूपी बंद होणार असल्याचे बोलले जात असताना टाइपरायटरला पुन्हा एकदा जीवदान मिळाले आहे. आता मॅन्युअल टाइपरायटरचा अभ्यासक्रम सुरू ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला

नाशिक : नोव्हेंबरनंतर टाइपराइटरची टकटक कायमस्वरूपी बंद होणार असल्याचे बोलले जात असताना टाइपरायटरला पुन्हा एकदा जीवदान मिळाले आहे. आता मॅन्युअल टाइपरायटरचा अभ्यासक्रम सुरू ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला असून, संबंधित संस्थांनी आपल्याकडील संस्थांनी टाइपिंग बंद करू नये अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, अनेक टाइपरायटर संघटनांनी अभ्यासक्रम बंद न करण्याची मागणी शासनाकडे केली होती. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्वाधिक लाभ होणार आहे.राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कामकाजात संगणकाचा वापर तसेच शासनाच्या सर्व विभागांमध्ये ई-गर्व्हर्नन्स, ई-आॅफिस पद्धत अवलंबिण्याचे शासनाने धोरण स्वीकारलेले आहे. त्यामुळे २०१३ मध्ये संगणक टंकलेखनाची संकल्पना प्राधान्याने समोर आल्यामुळे मॅन्युअल टाइपरायटरच्या अस्तित्वाचाही प्रश्न निर्माण झाला. मात्र हा अभ्यासक्रम एकदम बंद न करता २०१५ पर्यंत टप्प्याटप्याने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तथापि त्यानंतरही शुद्धीपत्रक काढून मॅन्युअल टंकलेखन अभ्यासक्रमास २०१६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. दि. १३ जुलै २०१६ ला पुन्हा एकदा शुद्धीपत्रक काढण्यात आले आणि मॅन्युअल टंकलेखन अभ्यासक्रमास ३१ मे २०१७ मध्ये मुदतवाढ देण्यात आली.दि. १६ नोव्हेंबर च्या शासन निर्णयान्वये राज्यातील शाासनमान्य लघुलेखन टंकलेखन वाणिज्य संस्थांमध्ये संगणक टंकलेखनासोबत दि. ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत मॅन्युअल टंकलेखन अभ्यासक्रम सुरू ठेवण्यास शासनाने मंजुरी दिली. मात्र त्यानंतर सदर अभ्यासक्रम बंद करू नये यासाठी सातत्याने काही संघटनांनी शासनाकडे मागणी केल्यानुसार शासनमान्य लघुलेखन टंकलेखन संस्थांमध्ये मॅन्युअल टंकलेखन अभ्यासक्रम सुरू ठेवण्यास मुदतवाढ देण्यात आली. पुढील कालावधीचा उल्लेख शासनाने दिला नसला तरी निदान आणखी काही वर्षे तरी टंकलेखनाची टकटक सुरूच राहणार चित्र आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लाभशहरी भागातील काही टाइपरायटर इन्स्टिट्यूटमध्ये अजूनही मॅन्युअल टाइपिंग शिकविले जाते. तुलनेत विद्यार्थ्यांची संख्या घटलेली आहे. वाढीव मुदतीमुळे सर्वांचीच सोय होणार आहे. विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिक लाभ होईल. विजेचा प्रश्न असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी म्यॅन्युअल टाइपरायटिंग महत्त्वाचा पर्याय ठरतो.- सचिन जाधव, संचालक, अशोक कॉम्प्युटर अ‍ॅण्ड टायपरिंग.जेलरोड. नाशिकरोड.

टॅग्स :typewriterटाइपरायटरEducation Sectorशिक्षण क्षेत्र