शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

टंकलेखनाची टकटक सुरूच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 00:55 IST

नोव्हेंबरनंतर टाइपराइटरची टकटक कायमस्वरूपी बंद होणार असल्याचे बोलले जात असताना टाइपरायटरला पुन्हा एकदा जीवदान मिळाले आहे. आता मॅन्युअल टाइपरायटरचा अभ्यासक्रम सुरू ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला

नाशिक : नोव्हेंबरनंतर टाइपराइटरची टकटक कायमस्वरूपी बंद होणार असल्याचे बोलले जात असताना टाइपरायटरला पुन्हा एकदा जीवदान मिळाले आहे. आता मॅन्युअल टाइपरायटरचा अभ्यासक्रम सुरू ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला असून, संबंधित संस्थांनी आपल्याकडील संस्थांनी टाइपिंग बंद करू नये अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, अनेक टाइपरायटर संघटनांनी अभ्यासक्रम बंद न करण्याची मागणी शासनाकडे केली होती. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्वाधिक लाभ होणार आहे.राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कामकाजात संगणकाचा वापर तसेच शासनाच्या सर्व विभागांमध्ये ई-गर्व्हर्नन्स, ई-आॅफिस पद्धत अवलंबिण्याचे शासनाने धोरण स्वीकारलेले आहे. त्यामुळे २०१३ मध्ये संगणक टंकलेखनाची संकल्पना प्राधान्याने समोर आल्यामुळे मॅन्युअल टाइपरायटरच्या अस्तित्वाचाही प्रश्न निर्माण झाला. मात्र हा अभ्यासक्रम एकदम बंद न करता २०१५ पर्यंत टप्प्याटप्याने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तथापि त्यानंतरही शुद्धीपत्रक काढून मॅन्युअल टंकलेखन अभ्यासक्रमास २०१६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. दि. १३ जुलै २०१६ ला पुन्हा एकदा शुद्धीपत्रक काढण्यात आले आणि मॅन्युअल टंकलेखन अभ्यासक्रमास ३१ मे २०१७ मध्ये मुदतवाढ देण्यात आली.दि. १६ नोव्हेंबर च्या शासन निर्णयान्वये राज्यातील शाासनमान्य लघुलेखन टंकलेखन वाणिज्य संस्थांमध्ये संगणक टंकलेखनासोबत दि. ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत मॅन्युअल टंकलेखन अभ्यासक्रम सुरू ठेवण्यास शासनाने मंजुरी दिली. मात्र त्यानंतर सदर अभ्यासक्रम बंद करू नये यासाठी सातत्याने काही संघटनांनी शासनाकडे मागणी केल्यानुसार शासनमान्य लघुलेखन टंकलेखन संस्थांमध्ये मॅन्युअल टंकलेखन अभ्यासक्रम सुरू ठेवण्यास मुदतवाढ देण्यात आली. पुढील कालावधीचा उल्लेख शासनाने दिला नसला तरी निदान आणखी काही वर्षे तरी टंकलेखनाची टकटक सुरूच राहणार चित्र आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लाभशहरी भागातील काही टाइपरायटर इन्स्टिट्यूटमध्ये अजूनही मॅन्युअल टाइपिंग शिकविले जाते. तुलनेत विद्यार्थ्यांची संख्या घटलेली आहे. वाढीव मुदतीमुळे सर्वांचीच सोय होणार आहे. विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिक लाभ होईल. विजेचा प्रश्न असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी म्यॅन्युअल टाइपरायटिंग महत्त्वाचा पर्याय ठरतो.- सचिन जाधव, संचालक, अशोक कॉम्प्युटर अ‍ॅण्ड टायपरिंग.जेलरोड. नाशिकरोड.

टॅग्स :typewriterटाइपरायटरEducation Sectorशिक्षण क्षेत्र