शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
4
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
5
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
6
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
7
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा सणसणीत टोला
8
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
9
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
10
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
11
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
12
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
13
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
14
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
15
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
16
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
17
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
18
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
19
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
20
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!

नऊशे विद्यार्थ्यांना हव्यात उत्तरपत्रिका

By admin | Updated: June 26, 2014 01:04 IST

नऊशे विद्यार्थ्यांना हव्यात उत्तरपत्रिका

 

नाशिक : नुकत्याच जाहीर झालेल्या बारावी परीक्षेच्या निकालानंतर विभागातील ८८९ विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्सची मागणी केली आहे. या विद्यार्थ्यांना झेरॉक्स देण्याचे काम मंडळात सध्या युद्धपातळीवर सुरू असून, आत्तापर्यंत सुमारे ४७५ विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची झेरॉक्स उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. उत्तरपत्रिकेची झेरॉक्स प्राप्त झाल्यानंतर पाच दिवसांत काही शंका असल्यास विद्यार्र्थी मंडळाकडे तक्रार करू शकतात. दरम्यान, आत्तापर्यंत अनेक तक्रारी प्राप्त झाल्याचे समजते. गेल्या फेब्रुवारी/मार्चमध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी विभागातील ७५१ महाविद्यालयांतून एक लाख ३३ हजार १४० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी एक लाख ३२ हजार ९६१ इतक्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी एक लाख १७ हजार ९४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, विभागाच्या निकालाची एकूण टक्केवारी ८८.७१ इतकी आहे. बारावीत जे विद्यार्थी थोडक्यात अनुत्तीर्ण झाले आहेत किंवा ज्यांना आपणाला कमी गुण मिळाले किंवा गुण देताना काही त्रुटी असण्याची शक्यता वाटते, असे विद्यार्थी उत्तरपत्रिका मिळविण्यासाठी अर्ज करतात. त्यानुसार विभागातील सुमारे ८८९ विद्यार्थ्यांनी मंडळाकडे अर्ज सादर करून उत्तरपत्रिका झेरॉक्सची मागणी नोंदविली होती. २१ जून ही मागणी नोंदविण्याची अखेरची तारीख होती. तत्पूर्वी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची झेरॉक्स दिली जात आहे. झेरॉक्सप्रत मिळाल्यानंतर विद्यार्थी आपल्या विषय शिक्षकामार्फत उत्तरपत्रिकेची तपासणी करून कशा पद्धतीने उत्तरपत्रिका तपासण्यात आली, याची खात्री करून घेऊ शकतात. जर विद्यार्थ्यांना काही शंका आल्यास किंवा गुणात फरक पडत असेल किंवा काही प्रश्नांना गुण देण्याचेच राहून गेले असेल तर असे प्रकार मंडळाच्या निदर्शनास आणून दिले जाऊ शकतात. मागीलवर्षी म्हणजेच मार्च २०१३ मध्ये नाशिक विभागातून एक लाख ४७ हजार ६१३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ११७ विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी मंडळाकडे अर्ज सादर केले होते. या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे पुन्हा मूल्यांकन केल्यानंतर ९८ विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये फेरफार झाल्याचे दिसून आले. यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या गुणांच्या एकूण टक्केवारीत वाढ झाली, तर काही अनुत्तीर्ण विद्यार्थी उत्तीर्णही झाले आहेत. राज्यभरात अशा सुविधेचा लाभ घेतल्यामुळे ९३० विद्यार्थ्यांना लाभ झालेला आहे. राज्याचा विचारा करावयाचा झाल्यास १५८८ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले होते. त्यापैकी ९३० विद्यार्थ्यांच्या निकालात बदल झाला. (प्रतिनिधी)