शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

‘कश्यपी’चे पाणी सोडून देण्याचा प्रयत्न

By admin | Updated: July 13, 2016 00:29 IST

प्रकल्पग्रस्तांची धरपकड : पोलीस ठाण्याला घेराव

नाशिक : कश्यपी धरणासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना शासकीय नोकरीत सामावून घेण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला वेगळेच वळण लागून नोकरी नाही तर जमिनी परत द्या, अशी मागणी करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांनी रविवारी सायंकाळी धरणात साचणारे पाणी सोडून देण्याचा प्रयत्न केला. परिणामी पोलिसांनी आठ तरुणांना ताब्यात घेतल्यानंतर सुमारे दोनशेहून अधिक ग्रामस्थांनी हरसूल पोलीस ठाण्यात धाव घेऊन सर्वांना अटक करण्यासाठी घेराव घातला. कश्यपी धरणग्रस्तांना शासकीय नोकरीत सामावून घेण्यासाठी अनेकवेळा आंदोलने करण्यात आली असून, शासन दरबारी फक्त आश्वासने मिळत असल्यामुळे वैतागलेल्या प्रकल्पग्रस्तांनी नोकरी नसेल तर जमिनी परत द्या, अशा धोशा लावला आहे. त्याचाच भाग म्हणून रविवारी कश्यपी धरणात साचलेले पाणी सोडून देण्याचा प्रयत्न कश्यपीनगरातील काही तरुणांनी केला. पाटबंधारे खात्याचे काही अधिकारी व कर्मचारी धरणावर गेले असता, त्यांना धरणाचे दरवाजे बंद करण्यापासून रोखण्यात आले. आंदोलकांची दखल घेत, तातडीने पोलीस व नाशिक तहसीलदारांना त्याची माहिती देऊन ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु ग्रामस्थांनी आपल्या मागण्या लावून धरल्या. सोमवारी नाशिक तहसीलदारांनी कश्यपीनगरला जाऊन ग्रामस्थांची बैठक घेतली. याच दरम्यान, हरसूल पोलिसांनी सोमनाथ मोंढे, दगडू धोंडगे, प्रकाश बेंडकुळे, अंबादास खोडे, लक्ष्मण बेंडकुळे, महेंद्र बेंडकुळे, सूरज मोंढे, तुकाराम मोंढे या आठ जणांना ताब्यात घेत त्यांना अटक केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे संतप्त झालेल्या देवरगाव, धोंडेगाव, गाळोशी, कश्यपीनगर येथील शेकडो ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी आदिवासी नेते हिरामण खोसकर यांच्या नेतृत्वाखाली हरसूल पोलीस ठाण्यात धाव घेतली. प्रकल्पग्रस्त तरुणांना अटक केल्याने संपूर्ण ग्रामस्थांनाही अटक करावी, अशी मागणी करीत ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या मांडला. अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने ग्रामस्थांची समजूत घालण्यात आली. दुपारी आठही तरुणांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. (प्रतिनिधी)