शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

‘कश्यपी’चे पाणी सोडून देण्याचा प्रयत्न

By admin | Updated: July 13, 2016 00:29 IST

प्रकल्पग्रस्तांची धरपकड : पोलीस ठाण्याला घेराव

नाशिक : कश्यपी धरणासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना शासकीय नोकरीत सामावून घेण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला वेगळेच वळण लागून नोकरी नाही तर जमिनी परत द्या, अशी मागणी करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांनी रविवारी सायंकाळी धरणात साचणारे पाणी सोडून देण्याचा प्रयत्न केला. परिणामी पोलिसांनी आठ तरुणांना ताब्यात घेतल्यानंतर सुमारे दोनशेहून अधिक ग्रामस्थांनी हरसूल पोलीस ठाण्यात धाव घेऊन सर्वांना अटक करण्यासाठी घेराव घातला. कश्यपी धरणग्रस्तांना शासकीय नोकरीत सामावून घेण्यासाठी अनेकवेळा आंदोलने करण्यात आली असून, शासन दरबारी फक्त आश्वासने मिळत असल्यामुळे वैतागलेल्या प्रकल्पग्रस्तांनी नोकरी नसेल तर जमिनी परत द्या, अशा धोशा लावला आहे. त्याचाच भाग म्हणून रविवारी कश्यपी धरणात साचलेले पाणी सोडून देण्याचा प्रयत्न कश्यपीनगरातील काही तरुणांनी केला. पाटबंधारे खात्याचे काही अधिकारी व कर्मचारी धरणावर गेले असता, त्यांना धरणाचे दरवाजे बंद करण्यापासून रोखण्यात आले. आंदोलकांची दखल घेत, तातडीने पोलीस व नाशिक तहसीलदारांना त्याची माहिती देऊन ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु ग्रामस्थांनी आपल्या मागण्या लावून धरल्या. सोमवारी नाशिक तहसीलदारांनी कश्यपीनगरला जाऊन ग्रामस्थांची बैठक घेतली. याच दरम्यान, हरसूल पोलिसांनी सोमनाथ मोंढे, दगडू धोंडगे, प्रकाश बेंडकुळे, अंबादास खोडे, लक्ष्मण बेंडकुळे, महेंद्र बेंडकुळे, सूरज मोंढे, तुकाराम मोंढे या आठ जणांना ताब्यात घेत त्यांना अटक केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे संतप्त झालेल्या देवरगाव, धोंडेगाव, गाळोशी, कश्यपीनगर येथील शेकडो ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी आदिवासी नेते हिरामण खोसकर यांच्या नेतृत्वाखाली हरसूल पोलीस ठाण्यात धाव घेतली. प्रकल्पग्रस्त तरुणांना अटक केल्याने संपूर्ण ग्रामस्थांनाही अटक करावी, अशी मागणी करीत ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या मांडला. अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने ग्रामस्थांची समजूत घालण्यात आली. दुपारी आठही तरुणांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. (प्रतिनिधी)