शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

त्र्यंबकची ‘गौतमी योजना’ धोक्यात

By admin | Updated: September 3, 2014 00:33 IST

त्र्यंबकची ‘गौतमी योजना’ धोक्यात

 

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर शहर व आखाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणारी कोट्यवधी रुपयांची गौतमी योजना भविष्यात अव्यावहारिक ठरण्याची भीती व्यक्त केली जात असून, नजीकच्या काळात त्र्यंबक नगरपालिकेने पाणीपट्टी वा स्वच्छता करात वाढ न केल्यास ‘येरे माझ्या मागल्या’ची गत होऊन योजनाच गुंडाळावी लागणार आहे. अलीकडेच नगरपालिकेने केलेल्या एका पाहणीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. त्र्यंबक शहराचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता नारायण नागबली, कालसर्प यांसारख्या तत्सम धार्मिक विधींसाठी देशभरातून भाविक येत असतात, दोन ते तीन दिवस चालणाऱ्या या धार्मिक विधीसाठी मुक्कामी राहणाऱ्या पुरोहितांनी आपापली घरे, वाड्यांमध्येच खोल्या काढून व्यवस्था केली आहे. थोडक्यात राहत्या घराचा व्यावसायिक वापर सर्वाधिक त्र्यंबकेश्वरीच असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले असून, त्यासाठी मात्र पिण्याच्या व वापराच्या पाण्याचा वारेमाप वापर केला जातो, त्याचबरोबरच शहराच्या स्वच्छतेवरही अतिरिक्त ताण पडून अप्रत्यक्ष नगरपालिकेलाच त्याचा भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामानाने नगरपालिकेला या दोन्ही गोष्टींतून अगदीच अल्पसा आर्थिक मोबदला मिळत आहे. त्र्यंबकला वार्षिक नऊशे रुपये पाणीपट्टी आकारली जाते, म्हणजेच महिन्याकाठी ऐंशी व दिवसाला दोन ते अडीच रुपये दर आकारला जातो. त्यामुळे सद्यस्थितीत शहराला पाणीपुरवठा करण्याची बाबही नगरपालिकेवर आर्थिक बोझा लादणारी ठरत असताना, त्यात आता सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुमारे २८ कोटी रुपये खर्च करून राबविण्यात येणाऱ्या गौतमी योजनेची भर पडली आहे. कुंभमेळ्यात शहराला मुबलक व नियमित पाणीपुरवठा करता यावा तसेच आखाडे व खालशांनाही त्याचा लाभ व्हावा म्हणून ही योजना राबविण्यात येत असून, आंबोली धरणातून या योजनेसाठी पाणी उचलले जाणार आहे. योजना पूर्णत्वास येऊन सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत ही योजना चालविली जाणार आहे. त्यानंतर मात्र ती नगरपालिकेकडे हस्तांतरीत केली जाईल. या योजनेच्या देखभाल, दुरुस्तीसाठी येणारा खर्च लक्षात घेता, सध्या नगरपालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या पाणीपट्टीतून ते भागविणे शक्यच नसल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे येत्या काळात नगरपालिकेने करात वाढ न केल्यास ही योजना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळापुरतीच आरंभशूर ठरण्याची भीती बोलून दाखविली जात आहे.