शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकला उभारावा खत प्रकल्प

By admin | Updated: August 13, 2014 00:43 IST

गोदावरी प्रदूषण : हरित न्यायाधिकरणाने दिले आदेश

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीतील प्रदूषण टाळण्यासाठी पूजाविधीचे निरुपयोगी साहित्य तसेच निर्माल्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणारा प्रकल्प उभारावा व तोपर्यंत तेथील कचरा नाशिक महापालिकेच्या खत प्रकल्पात पाठविण्याचे आदेश पुणे येथील हरित न्यायाधिकरणाने दिले आहेत.त्र्यंबकेश्वरी गोदावरी नदीवरील कॉँक्रीटचा स्लॅब काढण्याच्या मागणीसाठी येथील ललिता शिंदे, राजेश पंडित आणि निशिकांत पगारे यांनी पुण्याच्या न्यायाधिकरणात याचिका दाखल केली असून, त्यावरील सुनावणीच्या दरम्यान हे आदेश देण्यात आले आहेत. त्र्यंबकेश्वर येथे पूजाविधीचे वापरलेले साहित्य तसेच निर्माल्य नदीपात्रात जात असल्याने त्यावर नाशिक महापालिकेच्या खत प्रकल्पात त्याची विल्हेवाट लावण्यासाठी परवानगी घ्यावी अशा सूचना यापूर्वी न्यायाधिकरणाने दिल्या होत्या; मात्र महापालिकेने त्यास नकार दिला होता. त्यानंतर मंगळवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायाधिकरणाने त्र्यंबकेश्वर येथेच कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणारा प्रकल्प राबविण्याचे आदेश दिले. कचऱ्याचे वहन आणि अन्य खर्च येथील पुरोहित संघाकडून घ्यावा आणि त्यांनी टाळल्यास त्यांना शासकीय जागेचा धार्मिक विधीसाठी वापर करण्यास मनाई करता येऊ शकते, असेही न्यायाधिकरणाने सांगितल्याचे याचिकाकर्ता पंडित यांनी सांगितले. त्र्यंबक पालिकेला प्रकल्प राबविण्यासाठी लागणाऱ्या कालावधीचा विचार करता तोपर्यंंत हा कचरा नाशिक महापालिकेच्या खत प्रकल्पावर विल्हेवाट लावण्यासाठी द्यावा, असेही न्यायाधिकरणाने आदेश दिले आहेत. यासंदर्भातील पूर्तता अहवाल सादर करण्यासही नगरपालिकेस सांगण्यात आले आहे. दरम्यान, कॉँक्रिटीकरणाचा मूळ मुद्दा अद्याप बाकी असून, त्यावर पुढील तारखेस सुनावणी होणार आहे.