शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
3
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
4
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
5
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
6
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
7
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
8
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
9
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
10
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
11
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
12
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
13
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
14
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
15
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
16
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
17
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
18
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
19
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
20
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थी गिरविणार गुणवत्तेचे धडे

By admin | Updated: March 25, 2017 22:54 IST

इगतपुरी : येथील महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीच्या कौशल्य विकास कार्यक्रमाचे कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असून त्या अंतर्गत आता आदिवासी विद्यार्थी गुणवत्तेचे धडे गिरविणार आहे.

इगतपुरी : येथील महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीच्या कौशल्य विकास कार्यक्रमाचे कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असून त्या अंतर्गत आता आदिवासी विद्यार्थी गुणवत्तेचे धडे गिरविणार आहे. यातूनच मेक इन इंडियाच्या धर्तीवर मेक इन महाराष्ट्र घडू शकतो. दर्जेदार काम करणाऱ्या गुणवत्तापूर्ण कामगारांचे निर्माण शक्य आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.पंतप्रधानांच्या कौशल्य विकास कार्यक्र माची सर्वप्रथम अंमलबजावणी इगतपुरीच्या महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीने केली. मोठा रोजगार निर्माण होण्यासाठी फडवणीस यांच्या उपस्थितीत मुंबईला शासन, कंपनी आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था इगतपुरी यांच्यात सामंजस्य करार झाला. याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राज्याच्या औद्योगिक धोरणात एकीकडे बदल होत असतानाच कामगार कायद्यात बदल होणे आवश्यक आहे. राज्याने कामगार क्षेत्रात नवनवे बदल स्वीकारण्यासाठी अभ्यास सुरू केला आहे. वाढलेल्या बेरोजगारीच्या समस्येवर मात करण्यासाठी इगतपुरी महिंद्रा कंपनीचा कौशल्य विकास कार्यक्रम दूरदृष्टीने उपयुक्त ठरेल. मंत्रालयात इगतपुरीची महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनी, महाराष्ट्र शासन आणि तंत्रशिक्षण विभाग यांच्यात या विषयावर दीर्घ बैठक झाली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अधिकारी योगेश पाटील, महिंद्रा कंपनीचे उपाध्यक्ष विजय कालरा, विजय नायर, हिरामण आहेर, इगतपुरीच्या नासीर देशमुख, नितीन देशपांडे यांच्या समवेत विविध पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)अतिदुर्गम भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणारइगतपुरीसारख्या आदिवासी दुर्गम भागातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मोठ्या प्रमाणात आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेतात. इगतपुरीच्या महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीचे तज्ज्ञ अभियंते या विद्यार्थ्यांना धडे देतील. या विद्यार्थ्यांना नवनवे तंत्र विकसित करण्यासाठी महिंद्रा कंपनीत विविध प्रात्यक्षिके करायला मिळतील. यातून गुणात्मक विद्यार्थी निर्माण होऊन मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल. आदिवासी भागात जि.प. शाळांना ई-प्रोजेक्टर देणे, शैक्षणिक साहित्य पुरविणे, रक्तदान, दंत चिकित्सा ,नेत्र तपासणी शिबिर, आदिवासी युवकांना तंत्रशिक्षण देणे, महिलांना शिवणकाम प्रशिक्षण, गरोदर महिलांना मार्गदर्शन,अतिदुर्गम भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे यांचा समावेश आहे.