शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

आदिवासी विद्यार्थी गिरविणार गुणवत्तेचे धडे

By admin | Updated: March 25, 2017 22:54 IST

इगतपुरी : येथील महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीच्या कौशल्य विकास कार्यक्रमाचे कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असून त्या अंतर्गत आता आदिवासी विद्यार्थी गुणवत्तेचे धडे गिरविणार आहे.

इगतपुरी : येथील महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीच्या कौशल्य विकास कार्यक्रमाचे कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असून त्या अंतर्गत आता आदिवासी विद्यार्थी गुणवत्तेचे धडे गिरविणार आहे. यातूनच मेक इन इंडियाच्या धर्तीवर मेक इन महाराष्ट्र घडू शकतो. दर्जेदार काम करणाऱ्या गुणवत्तापूर्ण कामगारांचे निर्माण शक्य आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.पंतप्रधानांच्या कौशल्य विकास कार्यक्र माची सर्वप्रथम अंमलबजावणी इगतपुरीच्या महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीने केली. मोठा रोजगार निर्माण होण्यासाठी फडवणीस यांच्या उपस्थितीत मुंबईला शासन, कंपनी आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था इगतपुरी यांच्यात सामंजस्य करार झाला. याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राज्याच्या औद्योगिक धोरणात एकीकडे बदल होत असतानाच कामगार कायद्यात बदल होणे आवश्यक आहे. राज्याने कामगार क्षेत्रात नवनवे बदल स्वीकारण्यासाठी अभ्यास सुरू केला आहे. वाढलेल्या बेरोजगारीच्या समस्येवर मात करण्यासाठी इगतपुरी महिंद्रा कंपनीचा कौशल्य विकास कार्यक्रम दूरदृष्टीने उपयुक्त ठरेल. मंत्रालयात इगतपुरीची महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनी, महाराष्ट्र शासन आणि तंत्रशिक्षण विभाग यांच्यात या विषयावर दीर्घ बैठक झाली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अधिकारी योगेश पाटील, महिंद्रा कंपनीचे उपाध्यक्ष विजय कालरा, विजय नायर, हिरामण आहेर, इगतपुरीच्या नासीर देशमुख, नितीन देशपांडे यांच्या समवेत विविध पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)अतिदुर्गम भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणारइगतपुरीसारख्या आदिवासी दुर्गम भागातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मोठ्या प्रमाणात आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेतात. इगतपुरीच्या महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीचे तज्ज्ञ अभियंते या विद्यार्थ्यांना धडे देतील. या विद्यार्थ्यांना नवनवे तंत्र विकसित करण्यासाठी महिंद्रा कंपनीत विविध प्रात्यक्षिके करायला मिळतील. यातून गुणात्मक विद्यार्थी निर्माण होऊन मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल. आदिवासी भागात जि.प. शाळांना ई-प्रोजेक्टर देणे, शैक्षणिक साहित्य पुरविणे, रक्तदान, दंत चिकित्सा ,नेत्र तपासणी शिबिर, आदिवासी युवकांना तंत्रशिक्षण देणे, महिलांना शिवणकाम प्रशिक्षण, गरोदर महिलांना मार्गदर्शन,अतिदुर्गम भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे यांचा समावेश आहे.