शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
4
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
5
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
6
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
7
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
8
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
9
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
10
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
11
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
12
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
13
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
14
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
15
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
16
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
17
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
18
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
19
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
20
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक

एटींच्या रूपाने आदिवासींचा नेता हरपला

By admin | Updated: May 12, 2017 01:34 IST

नाशिक : ए. टी. पवार यांच्या निधनाने आदिवासी समाज पोरका झाला असून, त्यांचे नेतृत्व हरपल्याची भावना जिल्हा परिषदेच्या सदस्य व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कसमादेचे भूमिपुत्र माजी मंत्री कै. ए. टी. पवार यांच्या निधनाने आदिवासी समाज पोरका झाला असून, त्यांचे नेतृत्व हरपल्याची भावना जिल्हा परिषदेच्या सदस्य व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि.११) नवीन प्रशासकीय इमारतीत बोलविण्यात आली होती. या सभेत कै. ए. टी. पवार यांना श्रद्धांजली वाहून सभा तहकूब करण्यात आली. त्यांच्यामुळेच पुण्याला असलेले आदिवासी विकास विभागाचे कार्यालय नाशिकला आले. बाळासाहेब क्षीरसागर यांनी सांगितले की, त्यांच्या जाण्याचे जिल्ह्णाची मोठी हानी झाली असून, शिवसेना पक्षाच्या वतीने आपण त्यांना श्रद्धांजली वाहतो. हिरामण खोसकर यांनी श्रद्धांजली वाहताना ए. टी. पवार आदिवासींचे नेते होते. त्यांच्या जाण्याने पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. महेंद्रकुमार काले यांनी सांगितले की, नाशिकच्या भूमिपुत्राने राज्यात चांगल्या कामाने मोहोर उमटवली होती. रूपांजली माळेकर यांनी सांगितले की, तळागाळात इतके प्रभावी नेतृत्व उभे राहू शकते, हे त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले. त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख उंचावत गेला. ते तापी प्रकल्पाचे प्रणेते होते. अशोक टोंगारे यांनी श्रद्धांजली वाहताना सांगितले की, पवार साहेबांच्या जाण्याने आमचा आदिवासी समाज पोरका झाला आहे. त्यांच्या रूपाने आदिवासींचा नेता हरपला आहे. अमृता पवार, सुरेखा दराडे, सिद्धार्थ वनारसे यांनीही शब्द सुमनांनी कै. ए. टी. पवार यांना श्रद्धांजली वाहिली. बांधकाम व अर्थ सभापती मनीषा पवार यांनी सांगितले की, आदिवासी समाज व बहुजन समाज त्यांचे कार्य विसरू शकत नाही. यापुढेही त्यांचे कार्य सुरूच राहील. सभापती सुनीता चारोस्कर व अर्पणा खोसकर यांनीही श्रद्धांजली वाहिली. अध्यक्ष शीतल सांगळे म्हणाल्या, ए. टी. पवार हे कसमादेचे भूषण होते. त्यांनी प्रत्येक संधीचे सोने केले.