शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

एटींच्या रूपाने आदिवासींचा नेता हरपला

By admin | Updated: May 12, 2017 01:34 IST

नाशिक : ए. टी. पवार यांच्या निधनाने आदिवासी समाज पोरका झाला असून, त्यांचे नेतृत्व हरपल्याची भावना जिल्हा परिषदेच्या सदस्य व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कसमादेचे भूमिपुत्र माजी मंत्री कै. ए. टी. पवार यांच्या निधनाने आदिवासी समाज पोरका झाला असून, त्यांचे नेतृत्व हरपल्याची भावना जिल्हा परिषदेच्या सदस्य व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि.११) नवीन प्रशासकीय इमारतीत बोलविण्यात आली होती. या सभेत कै. ए. टी. पवार यांना श्रद्धांजली वाहून सभा तहकूब करण्यात आली. त्यांच्यामुळेच पुण्याला असलेले आदिवासी विकास विभागाचे कार्यालय नाशिकला आले. बाळासाहेब क्षीरसागर यांनी सांगितले की, त्यांच्या जाण्याचे जिल्ह्णाची मोठी हानी झाली असून, शिवसेना पक्षाच्या वतीने आपण त्यांना श्रद्धांजली वाहतो. हिरामण खोसकर यांनी श्रद्धांजली वाहताना ए. टी. पवार आदिवासींचे नेते होते. त्यांच्या जाण्याने पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. महेंद्रकुमार काले यांनी सांगितले की, नाशिकच्या भूमिपुत्राने राज्यात चांगल्या कामाने मोहोर उमटवली होती. रूपांजली माळेकर यांनी सांगितले की, तळागाळात इतके प्रभावी नेतृत्व उभे राहू शकते, हे त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले. त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख उंचावत गेला. ते तापी प्रकल्पाचे प्रणेते होते. अशोक टोंगारे यांनी श्रद्धांजली वाहताना सांगितले की, पवार साहेबांच्या जाण्याने आमचा आदिवासी समाज पोरका झाला आहे. त्यांच्या रूपाने आदिवासींचा नेता हरपला आहे. अमृता पवार, सुरेखा दराडे, सिद्धार्थ वनारसे यांनीही शब्द सुमनांनी कै. ए. टी. पवार यांना श्रद्धांजली वाहिली. बांधकाम व अर्थ सभापती मनीषा पवार यांनी सांगितले की, आदिवासी समाज व बहुजन समाज त्यांचे कार्य विसरू शकत नाही. यापुढेही त्यांचे कार्य सुरूच राहील. सभापती सुनीता चारोस्कर व अर्पणा खोसकर यांनीही श्रद्धांजली वाहिली. अध्यक्ष शीतल सांगळे म्हणाल्या, ए. टी. पवार हे कसमादेचे भूषण होते. त्यांनी प्रत्येक संधीचे सोने केले.