शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
3
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
4
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
5
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
6
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
7
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
8
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
9
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
10
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
11
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
12
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
13
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
14
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
15
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
16
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
17
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
18
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
19
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
20
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या

अहिराणी बोलीभाषेत लोकसाहित्याचा खजिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:12 IST

उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ व जागतिक अहिराणी भाषा संवर्धन समितीतर्फे महाकवी कालिदासदिनी आयोजित राज्यस्तरीय अहिराणी कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते ...

उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ व जागतिक अहिराणी भाषा संवर्धन समितीतर्फे महाकवी कालिदासदिनी आयोजित राज्यस्तरीय अहिराणी कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. शिशीर हिरे उपस्थित होते. वाघ पुढे म्हणाले, केवळ चांगले लिहिणे महत्त्वाचे नसून साहित्यिक सद्गुणी व सदाचारी असले तरच सद्गुणांची पेरणी होईल, यासाठी अहिराणी लोकभाषेची ही चळवळ जिवंत ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. हिरे यांनी अहिराणीतील गोडवा विशद करून खान्देशातील समस्यांच्या निवारणासाठी सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले.

प्रारंभी परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब पिंगळे यांनी सहभागी कवी आणि कवितेतील वैविध्याचा परामर्श घेतला. मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील यांनी कविसंमेलनाचा विषय आणि उद्देश स्पष्ट करीत अहिराणीचा जागर, प्रचार, प्रसार आणि अभ्यासक्रमात समावेशासाठी होत असलेला प्रयत्न याबाबत विवेचन केले. कार्याध्यक्ष बापूसाहेब हटकर यांनी खान्देशची महती स्पष्ट करून महाकवी कालिदास यांच्या 'मेघदूत'मधील कल्पनांची अहिराणी लोकसाहित्याशी जुळणाऱ्या समान धाग्यांचा सोदाहरण ऊहापोह केला. परिषदेचे कार्यवाह प्रमोद कुवर यांनी परिचय करून दिला. तांत्रिक धुरा प्रशांत पाटील यांनी सांभाळली. यावेळी दूरदर्शन मालिका 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक, लेखक, कलाकार सचिन गोस्वामी यांचाही सत्कार करण्यात आला.

कविसंमेलनात रंगत

कविसंमेलनात 'खान्देशनं पाणी जंजाळ' या विषयावर बारा, 'माहेरनी आखाजी' या विषयावर सतरा, तर 'कानबाई माय' या विषयावर चार तसेच अन्य विषयांवर ४० कवींनी रचना सादर करून सुमारे चार तास चाललेल्या संमेलनात रंगत आणली. यात जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, औरंगाबाद, पुणे, मुंबईसह गुजरातमधील कवींनी सहभाग नोंदवला.