शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

साहित्य संमेलनाचे त्रांगडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:14 IST

अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी संमेलनाच्या आयोजनाबाबत ३१ जुलैपर्यंत निर्णय देण्याबाबतचे पत्र पाठवून इशारा देणेदेखील ...

अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी संमेलनाच्या आयोजनाबाबत ३१ जुलैपर्यंत निर्णय देण्याबाबतचे पत्र पाठवून इशारा देणेदेखील एक घोडचूकच आहे. औरंगाबाद काही महाराष्ट्राच्या किंवा जगाच्या बाहेर नाही. त्यामुळे कोरोनाची स्थिती काय आहे आणि शासनाकडून केवळ ५० व्यक्तींच्याच कार्यक्रमांना परवानगी आहे, हेदेखील त्यांना ज्ञात असावे, तसेच आरोग्य यंत्रणांनी दिलेल्या तिसऱ्या लाटेच्या इशाऱ्याबाबतही ते अनभिज्ञ असणे अशक्यच आहे. तरीदेखील त्यांनी जुलैअखेरपर्यंत निर्णय घेऊन तो कळविण्याबाबतचा इशारा दिल्याने नक्की त्यांना संमेलन नाशिकला होऊ द्यायचे आहे का? असा विचार कुणाच्याही मनात येणे साहजिकच आहे. किंबहुना असा इशारा देण्यामागे परिस्थितीवश तुम्ही नकार कळवावा म्हणजे पाहुण्याच्याच हातून साप मारुन घेण्यासारखे असल्याची सामान्य रसिकांची भावना झाल्यास त्याला तरी चुकीचे कसे म्हणता येईल. त्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा गांभिर्याने विचार करता संमेलन दिवाळीपर्यंत तरी आयोजित करताच येऊ शकणार नाही, हे स्पष्ट दिसत आहे; मात्र तसे बोलले तरी महामंडळाला हस्तक्षेप करणे सोपे जाईल, ही भीती आयोजकांच्या मनात आहे. त्यामुळे राजाचा पोपट सध्या तरी निपचीत पडलाय, तो काहीच बोलत नाहीये, तो श्वासपण घेत नाहीये, पंखदेखील फडफडवत नाहीये, असे सारे काही बोलले जात आहे; पण मुद्द्याचे, वास्तव आणि खरे, स्पष्ट बोलायची हिंमत कुणाचीच होत नाहीये.

इन्फो

‘डिजिटल’चे पडघम !

साहित्य संमेलनाच्या स्वागत समितीच्या बैठकीत सध्या तरी संमेलन आयोजित करण्याबाबत निश्चित तारीख, महिना सांगता येणार नाही, असाच निर्णय कळविण्याचे निश्चित झाले आहे. त्याचबरोबर संमेलनाचे डिजिटल आयोजन करण्याबाबतही विचार करण्याचे सुतोवाच काही मान्यवरांकडून करण्यात आले. त्यामुळे कोरोना काळातील अन्य परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रमांप्रमाणेच संमेलनाचेही ‘डिजिटल आयोजन’ करण्याचे पडघम वाजू लागल्यास नवल वाटू नये.

धनंजय रिसोडकर

----------

लोगो

साहित्य संमेलनाचा लोगो वापरावा.