शहरं
Join us  
Trending Stories
1
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
2
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
3
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
4
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
5
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
6
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
7
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
8
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
9
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
10
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
12
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
13
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
14
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
15
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
16
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
17
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
18
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
19
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
20
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं

साहित्य संमेलनाचे त्रांगडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:14 IST

अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी संमेलनाच्या आयोजनाबाबत ३१ जुलैपर्यंत निर्णय देण्याबाबतचे पत्र पाठवून इशारा देणेदेखील ...

अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी संमेलनाच्या आयोजनाबाबत ३१ जुलैपर्यंत निर्णय देण्याबाबतचे पत्र पाठवून इशारा देणेदेखील एक घोडचूकच आहे. औरंगाबाद काही महाराष्ट्राच्या किंवा जगाच्या बाहेर नाही. त्यामुळे कोरोनाची स्थिती काय आहे आणि शासनाकडून केवळ ५० व्यक्तींच्याच कार्यक्रमांना परवानगी आहे, हेदेखील त्यांना ज्ञात असावे, तसेच आरोग्य यंत्रणांनी दिलेल्या तिसऱ्या लाटेच्या इशाऱ्याबाबतही ते अनभिज्ञ असणे अशक्यच आहे. तरीदेखील त्यांनी जुलैअखेरपर्यंत निर्णय घेऊन तो कळविण्याबाबतचा इशारा दिल्याने नक्की त्यांना संमेलन नाशिकला होऊ द्यायचे आहे का? असा विचार कुणाच्याही मनात येणे साहजिकच आहे. किंबहुना असा इशारा देण्यामागे परिस्थितीवश तुम्ही नकार कळवावा म्हणजे पाहुण्याच्याच हातून साप मारुन घेण्यासारखे असल्याची सामान्य रसिकांची भावना झाल्यास त्याला तरी चुकीचे कसे म्हणता येईल. त्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा गांभिर्याने विचार करता संमेलन दिवाळीपर्यंत तरी आयोजित करताच येऊ शकणार नाही, हे स्पष्ट दिसत आहे; मात्र तसे बोलले तरी महामंडळाला हस्तक्षेप करणे सोपे जाईल, ही भीती आयोजकांच्या मनात आहे. त्यामुळे राजाचा पोपट सध्या तरी निपचीत पडलाय, तो काहीच बोलत नाहीये, तो श्वासपण घेत नाहीये, पंखदेखील फडफडवत नाहीये, असे सारे काही बोलले जात आहे; पण मुद्द्याचे, वास्तव आणि खरे, स्पष्ट बोलायची हिंमत कुणाचीच होत नाहीये.

इन्फो

‘डिजिटल’चे पडघम !

साहित्य संमेलनाच्या स्वागत समितीच्या बैठकीत सध्या तरी संमेलन आयोजित करण्याबाबत निश्चित तारीख, महिना सांगता येणार नाही, असाच निर्णय कळविण्याचे निश्चित झाले आहे. त्याचबरोबर संमेलनाचे डिजिटल आयोजन करण्याबाबतही विचार करण्याचे सुतोवाच काही मान्यवरांकडून करण्यात आले. त्यामुळे कोरोना काळातील अन्य परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रमांप्रमाणेच संमेलनाचेही ‘डिजिटल आयोजन’ करण्याचे पडघम वाजू लागल्यास नवल वाटू नये.

धनंजय रिसोडकर

----------

लोगो

साहित्य संमेलनाचा लोगो वापरावा.