शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलनाचे त्रांगडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:14 IST

अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी संमेलनाच्या आयोजनाबाबत ३१ जुलैपर्यंत निर्णय देण्याबाबतचे पत्र पाठवून इशारा देणेदेखील ...

अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी संमेलनाच्या आयोजनाबाबत ३१ जुलैपर्यंत निर्णय देण्याबाबतचे पत्र पाठवून इशारा देणेदेखील एक घोडचूकच आहे. औरंगाबाद काही महाराष्ट्राच्या किंवा जगाच्या बाहेर नाही. त्यामुळे कोरोनाची स्थिती काय आहे आणि शासनाकडून केवळ ५० व्यक्तींच्याच कार्यक्रमांना परवानगी आहे, हेदेखील त्यांना ज्ञात असावे, तसेच आरोग्य यंत्रणांनी दिलेल्या तिसऱ्या लाटेच्या इशाऱ्याबाबतही ते अनभिज्ञ असणे अशक्यच आहे. तरीदेखील त्यांनी जुलैअखेरपर्यंत निर्णय घेऊन तो कळविण्याबाबतचा इशारा दिल्याने नक्की त्यांना संमेलन नाशिकला होऊ द्यायचे आहे का? असा विचार कुणाच्याही मनात येणे साहजिकच आहे. किंबहुना असा इशारा देण्यामागे परिस्थितीवश तुम्ही नकार कळवावा म्हणजे पाहुण्याच्याच हातून साप मारुन घेण्यासारखे असल्याची सामान्य रसिकांची भावना झाल्यास त्याला तरी चुकीचे कसे म्हणता येईल. त्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा गांभिर्याने विचार करता संमेलन दिवाळीपर्यंत तरी आयोजित करताच येऊ शकणार नाही, हे स्पष्ट दिसत आहे; मात्र तसे बोलले तरी महामंडळाला हस्तक्षेप करणे सोपे जाईल, ही भीती आयोजकांच्या मनात आहे. त्यामुळे राजाचा पोपट सध्या तरी निपचीत पडलाय, तो काहीच बोलत नाहीये, तो श्वासपण घेत नाहीये, पंखदेखील फडफडवत नाहीये, असे सारे काही बोलले जात आहे; पण मुद्द्याचे, वास्तव आणि खरे, स्पष्ट बोलायची हिंमत कुणाचीच होत नाहीये.

इन्फो

‘डिजिटल’चे पडघम !

साहित्य संमेलनाच्या स्वागत समितीच्या बैठकीत सध्या तरी संमेलन आयोजित करण्याबाबत निश्चित तारीख, महिना सांगता येणार नाही, असाच निर्णय कळविण्याचे निश्चित झाले आहे. त्याचबरोबर संमेलनाचे डिजिटल आयोजन करण्याबाबतही विचार करण्याचे सुतोवाच काही मान्यवरांकडून करण्यात आले. त्यामुळे कोरोना काळातील अन्य परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रमांप्रमाणेच संमेलनाचेही ‘डिजिटल आयोजन’ करण्याचे पडघम वाजू लागल्यास नवल वाटू नये.

धनंजय रिसोडकर

----------

लोगो

साहित्य संमेलनाचा लोगो वापरावा.