शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

जिल्हाभरात चक्काजाममुळे वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:17 IST

नाशिक : राज्य सरकारने शेतकºयांना जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करतानाच सरकारचा निषेध करण्यासाठी शेतकºयांनी सुकाणू समितीच्या नेतृत्वात सरकट कर्जमाफीची मागणी करीत जिल्हाभरात ठिकठिकाणी सोमवारी (दि.१४) चक्का जाम आंदोलन केले. नाशिक-पुणे महामार्गावर पळसे येथे तसेच नाशिक-त्र्यंबकेश्वर महामार्गावर महिरावणी येथे हजारो शेतकºयांनी रस्त्यावर उतरून वाहतूक अडविल्याने सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.

महिरावणीत जनावरे रस्त्यावर: पुणे-नाशिक, त्र्यंबकेश्वर रस्त्यावर आंदोलननाशिक : राज्य सरकारने शेतकºयांना जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करतानाच सरकारचा निषेध करण्यासाठी शेतकºयांनी सुकाणू समितीच्या नेतृत्वात सरकट कर्जमाफीची मागणी करीत जिल्हाभरात ठिकठिकाणी सोमवारी (दि.१४) चक्का जाम आंदोलन केले. नाशिक-पुणे महामार्गावर पळसे येथे तसेच नाशिक-त्र्यंबकेश्वर महामार्गावर महिरावणी येथे हजारो शेतकºयांनी रस्त्यावर उतरून वाहतूक अडविल्याने सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. जिल्हाभरातील शेतकºयांनी ‘एकच नारा, सातबारा कोरा’, नरेंद्र मोदी, शेतकरी विरोधी अशा घोषणा देत सरकारचा निषेध करत शेतकºयांनी सरसकट कर्जमाफीची मागणी केली. नाशिक जिल्ह्णातील त्र्यंबकेश्वररोड, पळसे, चांदोरी, येवला, दिंडोरी, घोटी, सुरगाणा, पेठ, मनमाड, चांदवड, नांदगाव आदि ठिकाणी शेतकºयांनी रास्ता रोकोे करून आंदोलन केले. महिरावणी येथे सकाळी १२ वाजता सुमारे तीनशे ते चारशे शेतकºयांनी अचानक जमा होऊन रास्ता रोको केला. हळूहळू शेतकºयांची संख्या वाढत जाऊन नाशिक-त्र्यंबकेश्वर महामार्गावर हजारो शेतकरी उतरले. यावेळी शेतकरी सुकाणू समितीचे सदस्य कैलास खांडबहाले यांच्यासह डॉ. डी. एल. कराड, हंसराज वडघुले, दत्तू ढगे, गणपत खांडबहाले, पुरुषोत्तम कडलग, माधुरी भदाणे आदिंसह परिसरातील गावांतील तरुण, वृद्ध व महिला शेतकºयांनीही आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. नाशिक रोड भागातील पळसे येथील शेतकºयांनी नाशिक-पुणे महामार्ग रोखला. त्यामुळे दोन्ही महामार्गांवर वाहतूक ठप्प झाली होती. त्याचप्रमाणे जिल्ह्णातील वेगवेगळ्या राज्य महामार्गावरही वाहतूक विस्कळीत झाली. यावेळी संतप्त शेतकºयांनी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोेषणाबाजी करताना टॅÑक्टर, बैलगाड्या व गोठ्यातील जनावरे रस्त्यावर आणून आंदोलन केले. या प्रकारामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दोन्हीही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.शेतकºयांना निकषांसह कर्जमाफीचे आश्वासन देऊन राज्य सरकारने शेतकºयांची दिशाभूल केल्याचा आरोप शेतकºयांच्या सुकाणू समितीने केला असून, सरकारच्या या वेळकाढू धोरणाचा निषेध करण्यासाठी सुकाणू समितीने किसान क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सोमवारी (दि. १४) राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन केले. यानंतरही सरकारने शेतकºयांच्या मागण्यांवर ठोस निर्णय न घेतल्यास पालकमंत्र्यांना स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करू दिले जाणार नाही, असा इशाराही सुकाणू समितीने दिला आहे.शेतकºयांच्या मागण्याशेतकºयांना सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी.स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात.शेतकºयांना वृद्धापकाळी तीन हजार रुपये पेन्शन मिळावी.ठिबक सिंचनला शंभर टक्के अनुदान मिळावे.शेतकºयांचे संपूर्ण वीज बिल माफ करावे.शेतीला कायमस्वरूपी मोफत वीज द्यावी.शेतीमालाला उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के अधिक हमीभाव मिळावा.गायीच्या दूधाला ५० तर म्हशीच्या दूधाला ६५ रुपये हमीभाव मिळावा.पीकविम्याची रक्कम शासनाने भरावी.समृद्धी महामार्गासाठी पिकाऊ, बागायती जमीन घेऊ नये.