शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

तौक्ते चक्रीवादळाची मदत दीड महिन्यातच प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:17 IST

नाशिक : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अवघ्या दीड महिन्यातच नुकसानभरपाई मिळाली आहे. संबंधित ...

नाशिक : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अवघ्या दीड महिन्यातच नुकसानभरपाई मिळाली आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्गदेखील झाली असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्याला सुमारे नऊ कोटी ३७ लाखांची मदत शासनाने दिली आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील ८१२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. जिल्हा प्रशासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करून शासनाकडे मदतीसाठीचा प्रस्ताव सादर केला होता. १५ ते १७ मे या कालावधीत कोकण किनारपट्टीवर अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने

जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील ८१२ हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले होते. सर्वाधिक फटका पेठ, सुरगाणा तालुक्यांना बसला. यामध्ये फळबागांना सर्वाधिक फटका बसला होता, तर ७९८ हेक्टरवरील आंबा पिकाचे नुकसान झाले तसेच २४२ गावे बाधित झाली होती. सुरगाणा तालुक्यातील १३० गावे बाधित झाली, तर २५४१ शेतक‍ऱ्यांचे ५८१ हेक्टरवरील, तर पेठ तालुक्यातील ९३ गावे बाधित झाली. १४८० शेतकऱ्यांच्या २०५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. देवळा, दिंडोरी, नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी, सिन्नर तालुक्यांनाही काही प्रमाणात या वादळाचा फटका बसला.

नाशिक, सटाणा, चांदवड, दिंडोरी, इगतपुरी, कळवण, निफाड, पेठ, सिन्नर, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, देवळा या तालुक्यांमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मागीलवर्षी जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसल्याने मोठे नुकसान झाले होते. मात्र, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची भरपाई मिळण्यास चार ते पाच महिन्यांचा विलंब झाला होता. तौक्ते चक्रीवादळाची मात्र शेतकऱ्यांना दीड महिन्यात मदत प्राप्त झाली आहे.

--इन्पो--

चार हजार शेतकऱ्यांचे नुकसान

तौक्ते चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. सुमारे चार हजार ९६ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. पंचनामे पूर्ण करण्यात आल्यानंतर शासनाकडे मदतीसाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. सुमारे ९ कोटी ३७ लाखांचा हा प्रस्ताव अवघ्या दीड महिन्यात मंजूर होऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात देखील आले. शेतीपिकांचे नुकसान तसेच घर दुरुस्तीसाठी असलेल्या नियमाप्रमाणे शासनाने मदत देण्यात आलेली आहे.