शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
3
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
4
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
5
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
7
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
8
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
9
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
10
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
11
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
12
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
13
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
14
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
15
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
16
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
18
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
19
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
20
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं

टमाटा तेजित; ६० रुपये किलो

By admin | Updated: July 7, 2017 18:05 IST

गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतातील उभा टमाटा माल खराब झाल्याने बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या टमाट्याची आवक मोठ्या प्रमाणात घटलेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतातील उभा टमाटा माल खराब झाल्याने बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या टमाट्याची आवक मोठ्या प्रमाणात घटलेली आहे. आवक घटल्याने टमाट्याचे दर ५० ते ६० रुपये प्रति किलोपर्यंत पोहचलेले आहेत. किरकोळ बाजारात टमाटा ८० ते १०० रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. पावसामुळे आवक घटल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत टमाट्याचा मोजकाच माल विक्रीसाठी येत आहे. आगामी दोन महिन्यानंतर आॅगस्टमध्ये टमाट्याचा हंगाम सुरू होईल, तोपर्यंत टमाट्याचे दर तेजित राहण्याची शक्यता असल्याचे व्यापारी गोविंद कुटे यांनी सांगितले. बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या २० किलोच्या टमाटा जाळीला लिलावात ११०० ते १२०० रुपये असा बाजारभाव मिळत आहे. पावसामुळे उभे पीक नाश पावल्याने तसेच शेतात पावसाचे पाणी साचल्याने शेतकऱ्यांना तयार पिकाचा खुडा करणेही अवघड झाल्याने शेतकऱ्यांनी पिकाकडे दुर्लक्ष केले आहे. आगामी कालावधीत पावसाने दमदारपणे हजेरी लावल्यास सध्या शिल्लक असलेला शेतातील टमाटा नाश पावण्याची शक्यता आहे.