शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

टमाटा फेकला रस्त्यावर...

By admin | Updated: September 24, 2016 00:26 IST

भाताचे नुकसान होण्याची भीती

पिंपळगाव बसवंत : येथील बाजार समितीत शुक्रवारी टमाट्याला किलोमागे केवळ दोन रुपयाचा भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी टमाटा रस्त्यावरच फेकून दिला. उत्पादन खर्च अन् भाड्याचे व मजुरीचेही पैसे मिळाले नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रति २० किलोला अवघे २० रु पये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांवर कांद्यापाठोपाठ आता मोठे संकट उभे राहिले आहे. टमाट्याच्या एक एकर लागवडीसाठी नऊ हजार रुपयांचे बियाणे, रासायनिक खते, एक क्विंटल तार, बांबू, झाडे, औषधे फवारणी, बांधण्यासाठी सुतळी, मजुरी असा एकंदरीत नव्वद हजार रुपयांचा जवळपास सर्व खर्च येतो. हातात काहीच मिळाले नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.(वार्ताहर)घोटी : गेल्या दोन वर्षांपासून पाण्याअभावी नुकसान होणाऱ्या भात पिकाला ऐन कापणीच्या वेळी होत असलेल्या अवकाळी पावसामुळे फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस होऊनही परतीच्या पावसात ओंब्यावर आलेले भातपीक नुकसानीच्या संकटात सापडले असल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत.गेल्या काही वर्षांपासून इगतपुरी तालुक्यात समाधानकारक पाऊन होत नसल्याने कधी लागवडीच्या वेळी पावसाची प्रतीक्षा तर कधी खते मारण्यासाठी वाट पाहावी लागत होती. भाताची लागवड करण्यासाठी आणि भातपिके जगविण्यासाठी विहिरीतून, नदीनाल्यांमधून इंजिनाच्या साहाय्याने पाणी भरून भातपीक जगवत होते.ऐन बहरात आलेल्या भातावर निसर्ग अवकृपा करीत अवकाळीच्या रूपाने मोठे नुकसान करीत आहे. मात्र यावर्षी सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने भाताची लागवड सुलभपणे झाली आहे. पावसाच्या सातत्य मुळे भात पिके हि तालुक्यात उत्तम आली आहेत.यातील हाळी समजल्या जाणार्या भाताला ओंब्या येण्यास सुरु वात झाली आहे.मात्र तरीही पावसाने उसंत न घेतल्याने पिकावर आलेल्या या भात पिकाला हा पाऊस हानिकारक समजला जातो.यामुळे परतीचा पाऊस तालुक्यातील शेतकर्यांना डोकेदुखी देणारा ठरणार आहे.यामुळे शेतकर्यांनी नुकसानीची धास्ती घेतली आहे.----------------कशी होते नुकसानअंत्यंत अल्प दिवसात व मुबलक उत्पन्न असणारे हळी वाणाचे पीक तालुक्यातील माळराणावर मोठ्या प्रमाणात घेतले जाते.या वाणाला कमी पावसाची आण िपाण्याची आवश्यकता असते.सद्या हे पीक ओंब्यावर आले आहे.या ओंब्या कोवळ्या असल्याने यात पाणी शिरले तर आतील तांदूळ पपरिपक्व होत नाही.परिणामी पीक नष्ट होऊन उत्पादनात लक्षणीय घट होते.याकरिता पावसाने काही दिवस उसंत देणे आवश्यक असते.