शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

आज ठरणार गावचा प्रथम नागरिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:14 IST

नाशिक: जिल्ह्यातील सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानुसार शुक्रवारपासून सरपंचपद निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. दि. १२ आणि १५ अशा ...

नाशिक: जिल्ह्यातील सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानुसार शुक्रवारपासून सरपंचपद निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. दि. १२ आणि १५ अशा दोन टप्प्यात जिल्ह्यातील ३४२ ग्रामपंचायतींना गावचा प्रथम नागरिक लाभणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे दीडशे ग्रामपंचायतींची निवडणूक होण्याची शक्यता आहे. निफाड, सिन्नर, चांदवड व नांदगाव हे चार तालुकेवगळता उर्वरित ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया नियोजित कार्यक्रमानुसार पार पडणार आहे.

गेल्या महिन्यात जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता या ग्रामपंचायतींमधील सरपंचपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार येत्या १२ आणि १५ तारखेला सरपंचपदाची निवडणूक घेतली जाणार असून, याबाबतचे आदेश उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी काढले आहेत. यंदा सदस्यांमधून सरपंच निवडला जाणार असल्याने आरक्षणापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे, तर काही ग्रामपंचायतींचे चित्र स्पष्ट असल्याने केवळ औपचारिकता राहिली आहे.

सरपंचपदाच्या बोलीप्रकरणी निवडणूक आयोगाने यापूर्वीच देवळा तालुक्यातील उमराणे व येवला तालुक्यातील कातरणे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया रद्द ठरविली. आता निफाड, सिन्नर, चांदवड व नांदगाव या चार तालुक्यांमधील सरपंचपदाच्या निवडीला न्यायालयाने स्थगिती दिल्याने २७७ ग्रामपंचायतींवगळून उर्वरित ३४२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे. नाशिक, त्र्यंबक, दिंडोरी, इगतपुरी, येवला, मालेगाव, कळवण, बागलाण व देवळा या तालुक्यांमधील निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. ज्या तालुक्यांमध्ये १२ तारखेला निवडणूक होणार आहे. तेथील संपूर्ण तयारी झाली असून, त्याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आली आहे.

स्थगिती देण्यात आलेल्या चारही तालुक्यांमधील ग्रामपंचायतींची सरपंचपदाची निवडणूक ही १६ तारखेनंतर केव्हाही घेतली जाण्याची शक्यता आहे. तोवर संबंधित तहसीलदारांना आपले म्हणणे मांडावे लागणार आहे.

--इन्फो--

सुरक्षिततेचे नियम पाळावे लागणार

सरपंच निवडणूक ग्रामपंचायत सदस्यांमध्ये होणार असली तरी सुरक्षितता नियमांचे पालन करूनच प्रक्रिया राबविली जाणार आहे. याबाबतची काळजी घेण्याचे आवाहन तहसीलदारांनी केलेले आहे. काही ठिकाणी सकाळी १०, तर काही ग्रामपंचायतींमध्ये दुपारी ३ या वेळेत सरपंच निवडीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

--इन्फो--

निफाड, सिन्नर, चांदवड व नांदगाव स्थगित

सरपंचपदाचे आरक्षण काढताना तहसीलदारांकडून नियम आणि निकषांचा भंग करण्यात आल्याचा आक्षेप घेत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी न्यायालयात धाव घेतली. संवर्गनिहाय आरक्षण आणि लोकसंख्येच्या तुलनेतील तफावत व त्यानुसार प्रवर्गामध्ये तफावत असल्याची पुरावे न्यायालयात सादर केल्याने न्यायालयाने निफाड, सिन्नर, चांदवड या तीन तालुक्यांतील २१८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या निवडीला स्थगिती देण्यात आलेली आहे. आता याच कारणास्तव नांदगाव तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींनादेखील स्थगिती मिळालेली आहे. निफाड तालुक्यातील ६५, सिन्नर तालुक्यातील १०० तर चांदवड तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींना आता स्थगिती मिळाली आहे.