शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

अवजड वाहनांसाठी वेळ निश्चित करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:27 IST

पंचवटीत डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक त्रस्त नाशिक : शहरातील अनेक भागांत डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. सायंकाळच्या वेळी नागरिकांना त्याचा ...

पंचवटीत डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक त्रस्त

नाशिक : शहरातील अनेक भागांत डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. सायंकाळच्या वेळी नागरिकांना त्याचा अधिक त्रास सहन करावा लागतो. महापालिकेच्या धूरफवारणीच्या गाड्या काही भागांपर्यंत पोहोचत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असून, महापालिकेने याबाबत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नेमणुकीची मागणी

नाशिक : गंजमाळ परिसरात सिग्नल यंत्रणा बसविलेली असली तरी अनेक वाहनचालक सिग्नलवर वाहन न थांबविता सुसाट वेगाने निघून जातात. त्यामुळे अनेक वाहनचालकांचा गोंधळ उडतो. तसेच अनेकदा किरकोळ अपघात होऊन बाचाबाचीचे प्रसंग घडतात. त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मोकाट जनावरांमुळे वाहतुकीस अडथळा

नाशिक : शहरातील विविध भागांत मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला असून, रात्रीच्या वेळी ही जनावरे रस्त्यातच बसतात. त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. महापालिकेचे या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

जुने नाशिकला धूरफवारणीची मागणी

नाशिक : जुने नाशिक परिसरात डासांचा उपद्रव वाढल्याने परिसरात धूरफवारणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. परिसरात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने आणि उघडी गटारे असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिसरात प्रादुर्भाव वाढला असून, रुग्णसंख्या वाढत असल्याने या भागात दर आठवड्यात धूरफवारणी करण्याची मागणी होत आहे.

बदलत्या वातावरणामुळे घसादुखी

नाशिक : वातावरणातील उकाडा एकीकडे वाढत असताना रात्रीच्या सुमारास जाणवणारी थंडी अशा विचित्र वातावरणामुळे अनेक नागरिकांना आरोग्याचे त्रास वाढले आहेत. काही नागरिकांना घसादुखीचा त्रास होऊ लागला असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे परिसरातील डॉक्टरांकडे रुग्णांची गर्दीदेखील वाढत आहे. घसादुखीबरोबरच खोकल्याचेदेखील रुग्ण वाढत असल्याने नागरिकांमध्येदेखील चिंता वाढत आहे.

बेशिस्त नागरिकांवर कारवाईची मागणी

नाशिक : अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शहरातील विविध रस्त्यांवर बेशिस्त वाहनचालकांची वर्दळ वाढली असल्याचे दिसून येत आहे. अनेक तरुण वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहने चालवितात. तसेच मास्कदेखील न घालता रस्त्यावरून वावरत आहेत. या बेशिस्त वाहनचालकांना वाहतूक पोलिसांनी आळा घालावा, अशी नागरिकांची मागणी आहे.