शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

अवजड वाहनांसाठी वेळ निश्चित करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:27 IST

पंचवटीत डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक त्रस्त नाशिक : शहरातील अनेक भागांत डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. सायंकाळच्या वेळी नागरिकांना त्याचा ...

पंचवटीत डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक त्रस्त

नाशिक : शहरातील अनेक भागांत डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. सायंकाळच्या वेळी नागरिकांना त्याचा अधिक त्रास सहन करावा लागतो. महापालिकेच्या धूरफवारणीच्या गाड्या काही भागांपर्यंत पोहोचत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असून, महापालिकेने याबाबत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नेमणुकीची मागणी

नाशिक : गंजमाळ परिसरात सिग्नल यंत्रणा बसविलेली असली तरी अनेक वाहनचालक सिग्नलवर वाहन न थांबविता सुसाट वेगाने निघून जातात. त्यामुळे अनेक वाहनचालकांचा गोंधळ उडतो. तसेच अनेकदा किरकोळ अपघात होऊन बाचाबाचीचे प्रसंग घडतात. त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मोकाट जनावरांमुळे वाहतुकीस अडथळा

नाशिक : शहरातील विविध भागांत मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला असून, रात्रीच्या वेळी ही जनावरे रस्त्यातच बसतात. त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. महापालिकेचे या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

जुने नाशिकला धूरफवारणीची मागणी

नाशिक : जुने नाशिक परिसरात डासांचा उपद्रव वाढल्याने परिसरात धूरफवारणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. परिसरात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने आणि उघडी गटारे असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिसरात प्रादुर्भाव वाढला असून, रुग्णसंख्या वाढत असल्याने या भागात दर आठवड्यात धूरफवारणी करण्याची मागणी होत आहे.

बदलत्या वातावरणामुळे घसादुखी

नाशिक : वातावरणातील उकाडा एकीकडे वाढत असताना रात्रीच्या सुमारास जाणवणारी थंडी अशा विचित्र वातावरणामुळे अनेक नागरिकांना आरोग्याचे त्रास वाढले आहेत. काही नागरिकांना घसादुखीचा त्रास होऊ लागला असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे परिसरातील डॉक्टरांकडे रुग्णांची गर्दीदेखील वाढत आहे. घसादुखीबरोबरच खोकल्याचेदेखील रुग्ण वाढत असल्याने नागरिकांमध्येदेखील चिंता वाढत आहे.

बेशिस्त नागरिकांवर कारवाईची मागणी

नाशिक : अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शहरातील विविध रस्त्यांवर बेशिस्त वाहनचालकांची वर्दळ वाढली असल्याचे दिसून येत आहे. अनेक तरुण वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहने चालवितात. तसेच मास्कदेखील न घालता रस्त्यावरून वावरत आहेत. या बेशिस्त वाहनचालकांना वाहतूक पोलिसांनी आळा घालावा, अशी नागरिकांची मागणी आहे.