शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
3
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
4
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
5
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
6
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
7
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
8
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
9
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
10
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
11
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
12
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
13
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
14
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
15
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
16
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
17
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
18
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
19
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
20
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता

दिवसभर या धूलिकणांची चादर कायम

By admin | Updated: April 6, 2015 01:07 IST

दिवसभर या धूलिकणांची चादर कायम

नाशिक : सौदी अरेबियात झालेल्या वाळवंटातील वादळाचा परिणाम जगभरातील विविध देशांमध्ये दिसून येत असून, वादळ झाल्यानंतर तब्बल दोन दिवसांनी त्याचे पडसाद नाशिककरांना रविवारी सकाळपासून जाणवले. अतिसूक्ष्म धूलिकणांनी व्यापलेले आकाश आणि अस्पष्ट दिसणारे रस्ते यामुळे धुके नसतानाही प्रथमच वाढलेल्या आर्द्रतेचा अनुभव शहरातील नागरिकांनी घेतला.नाशिकमध्ये प्रत्येक महिन्यात पाऊस पडल्यानंतर नाशिकवर आच्छादली जाणारी धुक्याची चादर हा अनुभव नाशिककरांसाठी नवा नाही; परंतु रविवारी उजाडलेली सकाळ नाशिककरांसाठी वेगळाच अनुभव घेऊन आली. सकाळी उजाडल्यापासूनच वातावरणात काहीसे धुके जाणवत असल्याने पावसाचे वातावरण आहे की काय या शंकेने अनेकांनी आभाळाकडे पाहिले; परंतु ढग नसतानाही दाटलेले धुके बघून जो तो या विचित्र वातावरणाबद्दल एकमेकांना विचारत होते. सोशल मीडियावर तर त्याची अनेक छायाचित्रेही टाकण्यात आली होती. केवळ नाशिकच नाही तर गुजरात, राजस्थानचा काही प्रदेश आणि उत्तर महाराष्ट्रावर दिवसभर या धूलिकणांची चादर कायम होती. सौदीतील दुबई येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या वाळूच्या वादळात वाऱ्याबरोबर उडालेले धूलिकण पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्याबरोबरच प्रवास करीत आहेत. त्यामुळे ज्या वेगात आणि दिशेने वारे वाहतील त्याच दिशेने हे वादळ फिरण्याची दाट शक्यता आहे. वाऱ्याबरोबर फिरत असलेले हे धूलिकण अत्यंत सूक्ष्म असल्याने ते त्वरित जमिनीवर बसण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे हे कण वातावरणात कायम राहणार असून, आकाशकडे पाहिल्यास गुलाबी रंगाच्या छटा दिसत आहेत. सलग दोन ते तीन वर्षांपासून आखाती देशांतील वादळाचे पडसाद राज्यात दिसून येत असून, मागच्या वेळेस ते केवळ मुंबईपुरताच मर्यादित होते; परंतु यंदा या वादळाने अरबी समुद्र ओलांडून थेट गुजरात आणि मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर धडक दिली आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने हे धूलिकण रायगड, कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, नाशिक, नगर या परिसरात धूलिकरांचे अस्तित्व दिसून येत होते. या वादळामुळे दृष्यता निम्म्यावर आली होती. सामान्य वातावरणात ती ६००० मीटर इतकी असून, या वादळामुळे ती केवळ तीन हजार मीटर इतकीच राहिली होती. त्यामुळे काही अंतरावर असलेल्या वस्तूही दिसू शकत नव्हत्या. सुमारे २४ तास हे वातावरण कायम राहणार असून, वाऱ्याचा वेग ज्या दिशेने असेल त्या दिशेने हे धूलिकण प्रवास करतील. जोपर्यंत पाऊस येत नाही तोपर्यंत हे धूलिकण जमिनीशी एकरूप होणार नाहीत आणि त्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत जाईल, हवेतील हे धूलिकण नाहीसे होण्यासाठी किती दिवस लागतील त्याचा अंदाज लावता येत नसल्याचे वेधशाळेच्या सूत्रांनी सांगतले. (प्रतिनिधी)