शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती चितपट होणार? निकालाची उत्सुकता शिगेला
3
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
4
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
5
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
6
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
7
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
8
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
9
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
10
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
11
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
12
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
13
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
14
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
15
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
17
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
18
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
19
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
20
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?

दिवसभर या धूलिकणांची चादर कायम

By admin | Updated: April 6, 2015 01:07 IST

दिवसभर या धूलिकणांची चादर कायम

नाशिक : सौदी अरेबियात झालेल्या वाळवंटातील वादळाचा परिणाम जगभरातील विविध देशांमध्ये दिसून येत असून, वादळ झाल्यानंतर तब्बल दोन दिवसांनी त्याचे पडसाद नाशिककरांना रविवारी सकाळपासून जाणवले. अतिसूक्ष्म धूलिकणांनी व्यापलेले आकाश आणि अस्पष्ट दिसणारे रस्ते यामुळे धुके नसतानाही प्रथमच वाढलेल्या आर्द्रतेचा अनुभव शहरातील नागरिकांनी घेतला.नाशिकमध्ये प्रत्येक महिन्यात पाऊस पडल्यानंतर नाशिकवर आच्छादली जाणारी धुक्याची चादर हा अनुभव नाशिककरांसाठी नवा नाही; परंतु रविवारी उजाडलेली सकाळ नाशिककरांसाठी वेगळाच अनुभव घेऊन आली. सकाळी उजाडल्यापासूनच वातावरणात काहीसे धुके जाणवत असल्याने पावसाचे वातावरण आहे की काय या शंकेने अनेकांनी आभाळाकडे पाहिले; परंतु ढग नसतानाही दाटलेले धुके बघून जो तो या विचित्र वातावरणाबद्दल एकमेकांना विचारत होते. सोशल मीडियावर तर त्याची अनेक छायाचित्रेही टाकण्यात आली होती. केवळ नाशिकच नाही तर गुजरात, राजस्थानचा काही प्रदेश आणि उत्तर महाराष्ट्रावर दिवसभर या धूलिकणांची चादर कायम होती. सौदीतील दुबई येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या वाळूच्या वादळात वाऱ्याबरोबर उडालेले धूलिकण पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्याबरोबरच प्रवास करीत आहेत. त्यामुळे ज्या वेगात आणि दिशेने वारे वाहतील त्याच दिशेने हे वादळ फिरण्याची दाट शक्यता आहे. वाऱ्याबरोबर फिरत असलेले हे धूलिकण अत्यंत सूक्ष्म असल्याने ते त्वरित जमिनीवर बसण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे हे कण वातावरणात कायम राहणार असून, आकाशकडे पाहिल्यास गुलाबी रंगाच्या छटा दिसत आहेत. सलग दोन ते तीन वर्षांपासून आखाती देशांतील वादळाचे पडसाद राज्यात दिसून येत असून, मागच्या वेळेस ते केवळ मुंबईपुरताच मर्यादित होते; परंतु यंदा या वादळाने अरबी समुद्र ओलांडून थेट गुजरात आणि मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर धडक दिली आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने हे धूलिकण रायगड, कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, नाशिक, नगर या परिसरात धूलिकरांचे अस्तित्व दिसून येत होते. या वादळामुळे दृष्यता निम्म्यावर आली होती. सामान्य वातावरणात ती ६००० मीटर इतकी असून, या वादळामुळे ती केवळ तीन हजार मीटर इतकीच राहिली होती. त्यामुळे काही अंतरावर असलेल्या वस्तूही दिसू शकत नव्हत्या. सुमारे २४ तास हे वातावरण कायम राहणार असून, वाऱ्याचा वेग ज्या दिशेने असेल त्या दिशेने हे धूलिकण प्रवास करतील. जोपर्यंत पाऊस येत नाही तोपर्यंत हे धूलिकण जमिनीशी एकरूप होणार नाहीत आणि त्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत जाईल, हवेतील हे धूलिकण नाहीसे होण्यासाठी किती दिवस लागतील त्याचा अंदाज लावता येत नसल्याचे वेधशाळेच्या सूत्रांनी सांगतले. (प्रतिनिधी)