शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभर या धूलिकणांची चादर कायम

By admin | Updated: April 6, 2015 01:07 IST

दिवसभर या धूलिकणांची चादर कायम

नाशिक : सौदी अरेबियात झालेल्या वाळवंटातील वादळाचा परिणाम जगभरातील विविध देशांमध्ये दिसून येत असून, वादळ झाल्यानंतर तब्बल दोन दिवसांनी त्याचे पडसाद नाशिककरांना रविवारी सकाळपासून जाणवले. अतिसूक्ष्म धूलिकणांनी व्यापलेले आकाश आणि अस्पष्ट दिसणारे रस्ते यामुळे धुके नसतानाही प्रथमच वाढलेल्या आर्द्रतेचा अनुभव शहरातील नागरिकांनी घेतला.नाशिकमध्ये प्रत्येक महिन्यात पाऊस पडल्यानंतर नाशिकवर आच्छादली जाणारी धुक्याची चादर हा अनुभव नाशिककरांसाठी नवा नाही; परंतु रविवारी उजाडलेली सकाळ नाशिककरांसाठी वेगळाच अनुभव घेऊन आली. सकाळी उजाडल्यापासूनच वातावरणात काहीसे धुके जाणवत असल्याने पावसाचे वातावरण आहे की काय या शंकेने अनेकांनी आभाळाकडे पाहिले; परंतु ढग नसतानाही दाटलेले धुके बघून जो तो या विचित्र वातावरणाबद्दल एकमेकांना विचारत होते. सोशल मीडियावर तर त्याची अनेक छायाचित्रेही टाकण्यात आली होती. केवळ नाशिकच नाही तर गुजरात, राजस्थानचा काही प्रदेश आणि उत्तर महाराष्ट्रावर दिवसभर या धूलिकणांची चादर कायम होती. सौदीतील दुबई येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या वाळूच्या वादळात वाऱ्याबरोबर उडालेले धूलिकण पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्याबरोबरच प्रवास करीत आहेत. त्यामुळे ज्या वेगात आणि दिशेने वारे वाहतील त्याच दिशेने हे वादळ फिरण्याची दाट शक्यता आहे. वाऱ्याबरोबर फिरत असलेले हे धूलिकण अत्यंत सूक्ष्म असल्याने ते त्वरित जमिनीवर बसण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे हे कण वातावरणात कायम राहणार असून, आकाशकडे पाहिल्यास गुलाबी रंगाच्या छटा दिसत आहेत. सलग दोन ते तीन वर्षांपासून आखाती देशांतील वादळाचे पडसाद राज्यात दिसून येत असून, मागच्या वेळेस ते केवळ मुंबईपुरताच मर्यादित होते; परंतु यंदा या वादळाने अरबी समुद्र ओलांडून थेट गुजरात आणि मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर धडक दिली आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने हे धूलिकण रायगड, कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, नाशिक, नगर या परिसरात धूलिकरांचे अस्तित्व दिसून येत होते. या वादळामुळे दृष्यता निम्म्यावर आली होती. सामान्य वातावरणात ती ६००० मीटर इतकी असून, या वादळामुळे ती केवळ तीन हजार मीटर इतकीच राहिली होती. त्यामुळे काही अंतरावर असलेल्या वस्तूही दिसू शकत नव्हत्या. सुमारे २४ तास हे वातावरण कायम राहणार असून, वाऱ्याचा वेग ज्या दिशेने असेल त्या दिशेने हे धूलिकण प्रवास करतील. जोपर्यंत पाऊस येत नाही तोपर्यंत हे धूलिकण जमिनीशी एकरूप होणार नाहीत आणि त्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत जाईल, हवेतील हे धूलिकण नाहीसे होण्यासाठी किती दिवस लागतील त्याचा अंदाज लावता येत नसल्याचे वेधशाळेच्या सूत्रांनी सांगतले. (प्रतिनिधी)