शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

बंद मॉलमुळे दीड हजार युवक बेरोजगार

By admin | Updated: February 27, 2016 23:59 IST

समस्या : रिटेलर्स तेजीत, परंतु स्थानिक कारणांचा अडसर; नव्या रोजगारांचा शोध

 नाशिक : एकापाठोपाठ एक शहरात येऊ घातलेल्या मॉल्समुळे रिटेलर क्षेत्रात मिळालेल्या रोजगाराच्या संधी अचानक बंद पडणाऱ्या मॉलमुळे हिरावून गेल्या आहेत. शहरात किमान बंद पडलेल्या पाच प्रमुख मॉल्स आणि तेथील रिटेलर्सच्या शॉप्समुळे गेल्या दीड ते दोन वर्षांत दीड हजार युवक-युवती बेरोजगार झाले असून, त्यांना आता नव्या रोजगाराच्या संधी शोधाव्या लागत आहेत.नाशिक शहर तसे पहिल्या शहरांच्या किंवा मेट्रो सीटीत नाहीच तरीही नाशिकचेच उद्योजक श्रीरंग सारडा यांनी कॉलेजरोडवर बिग बाजार सुरू केल्यानंतर नाशिकच्या रिटेल बाजाराचा नूरच बदलला. मग सुभिक्षा, स्पीनॅच, रिलायन्स फ्रेश अशा अनेक एकाहून एक मॉल्स सुरू झाले. सीटीसेंटर मॉल, पाठोपाठ कॉलेजरोडवरील श्रद्धा मॉल (भारती), त्र्यंबकरोड येथे सेंट्रल आणि पिनॅकल मॉल उभा राहिला. पाठोपाठ कालिका मंदिराजवळ केवळ रिलायन्स मॉल हा स्वतंत्र मॉलही उभा राहिला. एकापाठोपाठ एक उभ्या राहिलेल्या मॉल्समुळे स्पर्धा वाढली त्याचबरोबर रोजगारही वाढला. वेगवेगळ्या मॉल्समध्ये सेल्समन, सेल्सगर्ल्स, काउंटरबॉय, सुरक्षारक्षक, हमाली काम करणारे, पार्किंग सांभाळणारे अशा अनेक लहान-मोठ्या संधी उपलब्ध झाल्या. वरिष्ठ पदावरही व्यवस्थापक, अकाउंटंट, स्टोअर किपर अशा पदांमुळे उदरनिर्वाहाचे साधन निर्माण झाले, परंतु त्यानंतर अचानक अनेक मॉल्स बंद करण्याचे निर्णय होत गेले. सुभिक्षा हा छोट्या रिटेलच्या शाखा बंद होत असताना स्पीनॅच आणि अन्य छोटे मॉल्स बंद झाले, परंतु सर्वाधिक मोठा फटका श्रद्धा मॉल (भारती रिटेलर्स) त्यानंतर पिनॅकल मॉल आणि त्यापाठोपाठ कालिका मंदिराजवळील रिलायन्स बंद पडल्याने मॉलमध्ये काम करणारे युवक-युवती मोठ्या प्रमाणात बेरोजगार झाले आहेत.बहुतांशी मॉलमध्ये थेट भरतीऐवजी एजन्सीमार्फत मनुष्यबळ घेण्यात आले होते. काही ठिकाणी मॉल्सने स्वत: उमेदवारांची भरती केली होती. उमेदवारांचा अनुभव आणि अन्य पात्रतांचा विचार करून त्यांना वेतन दिले जात असले तरी एजन्सींनी पुरेसे वेतन न दिल्याच्या तक्रारी आहेत. अर्थात, दीड हजार युवक-युवतींनी सध्या अन्य ठिकाणी नोकऱ्या पत्करल्या असल्या तरी मॉलमध्ये काम करण्याचा चांगला अनुभव असल्याने अनेक युवक-युवती तेथे नोकरी मिळावी यासाठीच प्रयत्न करतात. नाशिकमध्ये नवीन मॉल्स येण्याची चाहुल लागली तरी अनुभवाच्या जोरावर उमेदवार नोकरीसाठी अर्ज करतात. शहरात नव्यानेच सुरू झालेल्या एका मॉल्सच्या शुभारंभाची वार्ता पोहोचता क्षणीच आठवडभरात शंभरहून अधिक अर्ज नोकरीसाठी आले आहेत. मॉल्स सुरू होणे बंद पडणे हा त्यांच्या व्यवहारांचा किंवा त्यांच्या अडचणीचा भाग वेगळा असला तरी त्यातून मिळणारा रोजगार महत्त्वाचा आहे. त्यामुळेच बंद मॉलमुळे बंद पडणारा रोजगार हा विषय अधिक महत्त्वाचा ठरला आहे. (प्रतिनिधी)