शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

बंद मॉलमुळे दीड हजार युवक बेरोजगार

By admin | Updated: February 27, 2016 23:59 IST

समस्या : रिटेलर्स तेजीत, परंतु स्थानिक कारणांचा अडसर; नव्या रोजगारांचा शोध

 नाशिक : एकापाठोपाठ एक शहरात येऊ घातलेल्या मॉल्समुळे रिटेलर क्षेत्रात मिळालेल्या रोजगाराच्या संधी अचानक बंद पडणाऱ्या मॉलमुळे हिरावून गेल्या आहेत. शहरात किमान बंद पडलेल्या पाच प्रमुख मॉल्स आणि तेथील रिटेलर्सच्या शॉप्समुळे गेल्या दीड ते दोन वर्षांत दीड हजार युवक-युवती बेरोजगार झाले असून, त्यांना आता नव्या रोजगाराच्या संधी शोधाव्या लागत आहेत.नाशिक शहर तसे पहिल्या शहरांच्या किंवा मेट्रो सीटीत नाहीच तरीही नाशिकचेच उद्योजक श्रीरंग सारडा यांनी कॉलेजरोडवर बिग बाजार सुरू केल्यानंतर नाशिकच्या रिटेल बाजाराचा नूरच बदलला. मग सुभिक्षा, स्पीनॅच, रिलायन्स फ्रेश अशा अनेक एकाहून एक मॉल्स सुरू झाले. सीटीसेंटर मॉल, पाठोपाठ कॉलेजरोडवरील श्रद्धा मॉल (भारती), त्र्यंबकरोड येथे सेंट्रल आणि पिनॅकल मॉल उभा राहिला. पाठोपाठ कालिका मंदिराजवळ केवळ रिलायन्स मॉल हा स्वतंत्र मॉलही उभा राहिला. एकापाठोपाठ एक उभ्या राहिलेल्या मॉल्समुळे स्पर्धा वाढली त्याचबरोबर रोजगारही वाढला. वेगवेगळ्या मॉल्समध्ये सेल्समन, सेल्सगर्ल्स, काउंटरबॉय, सुरक्षारक्षक, हमाली काम करणारे, पार्किंग सांभाळणारे अशा अनेक लहान-मोठ्या संधी उपलब्ध झाल्या. वरिष्ठ पदावरही व्यवस्थापक, अकाउंटंट, स्टोअर किपर अशा पदांमुळे उदरनिर्वाहाचे साधन निर्माण झाले, परंतु त्यानंतर अचानक अनेक मॉल्स बंद करण्याचे निर्णय होत गेले. सुभिक्षा हा छोट्या रिटेलच्या शाखा बंद होत असताना स्पीनॅच आणि अन्य छोटे मॉल्स बंद झाले, परंतु सर्वाधिक मोठा फटका श्रद्धा मॉल (भारती रिटेलर्स) त्यानंतर पिनॅकल मॉल आणि त्यापाठोपाठ कालिका मंदिराजवळील रिलायन्स बंद पडल्याने मॉलमध्ये काम करणारे युवक-युवती मोठ्या प्रमाणात बेरोजगार झाले आहेत.बहुतांशी मॉलमध्ये थेट भरतीऐवजी एजन्सीमार्फत मनुष्यबळ घेण्यात आले होते. काही ठिकाणी मॉल्सने स्वत: उमेदवारांची भरती केली होती. उमेदवारांचा अनुभव आणि अन्य पात्रतांचा विचार करून त्यांना वेतन दिले जात असले तरी एजन्सींनी पुरेसे वेतन न दिल्याच्या तक्रारी आहेत. अर्थात, दीड हजार युवक-युवतींनी सध्या अन्य ठिकाणी नोकऱ्या पत्करल्या असल्या तरी मॉलमध्ये काम करण्याचा चांगला अनुभव असल्याने अनेक युवक-युवती तेथे नोकरी मिळावी यासाठीच प्रयत्न करतात. नाशिकमध्ये नवीन मॉल्स येण्याची चाहुल लागली तरी अनुभवाच्या जोरावर उमेदवार नोकरीसाठी अर्ज करतात. शहरात नव्यानेच सुरू झालेल्या एका मॉल्सच्या शुभारंभाची वार्ता पोहोचता क्षणीच आठवडभरात शंभरहून अधिक अर्ज नोकरीसाठी आले आहेत. मॉल्स सुरू होणे बंद पडणे हा त्यांच्या व्यवहारांचा किंवा त्यांच्या अडचणीचा भाग वेगळा असला तरी त्यातून मिळणारा रोजगार महत्त्वाचा आहे. त्यामुळेच बंद मॉलमुळे बंद पडणारा रोजगार हा विषय अधिक महत्त्वाचा ठरला आहे. (प्रतिनिधी)