शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

आली फाईल माघारी, मग पोलिसांच्या दरबारी!

By admin | Updated: May 9, 2017 02:48 IST

नाशिक : सामान्यत: एखादी वस्तू चोरीस गेली की, तिचे ‘मूल्य’ आणि ‘महत्त्व’ ओळखून सामान्य नागरिक थेट पोलीस ठाण्यात धाव घेतो...

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सामान्यत: एखादी वस्तू चोरीस गेली की, तिचे ‘मूल्य’ आणि ‘महत्त्व’ ओळखून सामान्य नागरिक थेट पोलीस ठाण्यात धाव घेतो... पोलिसांनी कितीही हाकलले तरी तक्रार घ्या यासाठी आर्जव करतो... परंतु नाशिकच्या एमआयडीसीची बातच न्यारी... एखादी फाईल गहाळ झाली म्हणून लगेचच थोडी धावपळ करायची, फाईलच ती त्यात वादग्रस्तही, मग पाय फुटणारच... येईल की परत... त्यासाठी काय एवढी घाई. अखेरीस याच श्रद्धा आणि सबुरीला यश आलेच आणि पाय फुटलेली फाईल आली परत अन् तीही कोणाच्या आधाराशिवाय... पण आता म्हणे सारेच जागृत झाले आणि मिळालेले दस्तावेज आधी कोणी चोरून नेले याचा शोध घेण्यासाठी पोलीस दरबारी धावपळ सुरू झाली.सरकारी मानसिकता दर्शवणारी ही घटना एमआयडीसीतील आहे. हा विभाग विकासकामांपेक्षा वादंगातच दंग असतो. त्यातच एक वाद मध्यंतरी झडला आणि त्याच्याशी संबंधित एक फाईल किंबहुना त्यातील महत्त्वाची १९२ पाने गहाळ झाली. आता त्याचे एमआयडीसीला तसे फार महत्त्व वाटले नाही. चालतयं की.. असे म्हणत त्याकडे खरे तर दुर्लक्षच झाले. परंतु ही सारी शांतता सहन न होणाऱ्यांनी बभ्रा केला. तरीही अंमळ सारेच शांतच होते. बहुधा ‘तू गेली असशील तेथून परत ये, तुला कोणी रागावणार नाही’ अशी वृत्तपत्रीय जाहिरात देण्याचाच संबंधितांचा इरादा होता, परंतु अधिक चर्चा नको म्हणून तो बेत रहीत केला असावा. अखेरीस संबंधित फाईलीलाच एमआयडीसीची दया आली आणि गेल्या पावली परत आली. कोणासही काही न सांगता फाईल गेली तसेच कोणासही काही न सांगता आणि आवाज न करता परत येऊन एमआयडीसीतील एका सोफ्यावर निवांत पहुडली. कोणा कर्मचाऱ्याची सोफ्यावरील ‘पाकिट’ पाहून उत्सुकता चाळवली आणि त्यात बघतो तर काय, गेलेली इभ्रतच जणू परत आली. सर्वत्र आनंदी आनंद झाला. फाईल सापडली ना, आता सारे निश्चिंत, आता चोर शोधायला हरकत नाही, असा यथावकाश विचार एमआयडीसीने केला आणि मग पोलीस ठाणे गाठले. गेल्यावर्षी १३ आॅगस्ट रोजी गहाळ झालेली फाईल की ज्यात मौल्यवान कागद नाहीत, परंतु ७१ लाख रुपयांची रक्कम नमूद आहे, अशी कागदपत्रे गहाळ होती, ती २ मेस परत आली. परंतु ज्याने कोणी तिला फूस लावली त्याचा आता शोध घ्यावा असे पत्र दिले. पोलीस बुचकळ्यात पडले. जीवित माणूस बेपत्ता झाला तरी लवकर गुन्हा नोंदवण्याची ज्यांची परंपरा नाही तेथे निर्जीव कागदांचे काय.. पण सरकारी काम म्हणून त्यांना गुन्हा दाखल करावा लागला. फाईल गहाळ ते मुद्देमाल स्वत:हून हजर या कालावधीत तब्बल ‘सहा’ महिन्यांचे कालहरण झाले आणि सरकारी काम अन् ‘सहा’ महिने थांब या एमआयडीसीच्या वृत्तीचे स्मरण झाले.