शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
चीनला पाहावलं नाही! भारतातील आयफोनच्या उत्पादनाला झटका? परत बोलावले चिनी इंजिनिअर्स
4
अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर
5
बदल्याची आग! डबल मर्डरने दिल्ली हादरली; घरातील नोकराने केली आई आणि मुलाची हत्या
6
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
7
पाकच्या नापाक कारवाया थांबेनात; आयएसआयने हेरगिरी करण्यासाठी निवडला नेपाळचा रस्ता! काय केलं बघाच...
8
सोशल मीडियावर एक पोस्ट आणि गेली २२ लाखांची नोकरी, कंपनीच्या मालकांनी स्वतः सांगितलं कारण
9
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
10
लाखो रुपयांचा IT जॉब सोडून जोडप्याचा शेती करण्याचा निर्णय; आज १ कोटींची उलाढाल; नेमकं काय करतात?
11
Bageshwar Dham: बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना! टिन शेड कोसळल्याने एका भाविकाचा मृत्यू, ८ जण जखमी
12
Chaturmas 2025: चतुर्मासात करा 'हा' संकल्प आणि व्यक्तिमत्त्वाला द्या नवीन आकार!
13
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
14
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
15
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
16
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
17
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
18
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
19
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
20
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...

मद्य दुकानांबाबत अद्यापही संभ्रम कायम

By admin | Updated: March 28, 2017 23:31 IST

नाशिक : राष्ट्रीय व राज्य महामार्गावर पाचशे मीटर अंतरातील मद्य विक्रीची दुकाने बंद करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यामुळे या मार्गावरील परमिट रूम व बिअर बार कारवाईच्या कचाट्यातून वाचले

नाशिक : राष्ट्रीय व राज्य महामार्गावर पाचशे मीटर अंतरातील मद्य विक्रीची दुकाने बंद करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यामुळे या मार्गावरील परमिट रूम व बिअर बार कारवाईच्या कचाट्यातून वाचले असले तरी, त्याबाबतचे आदेश अद्याप राज्य उत्पादन शुल्क विभागाला प्राप्त झालेले नसल्यामुळे मार्चअखेर परमिट रूम, बिअर बारचे नूतनीकरण करावे की नाही अशा पेचात यंत्रणा पडली आहे, शिवाय रस्त्यांच्या मालकीबाबतही शासनाकडून मार्गदर्शन न आल्याने मद्य विक्रीच्या दुकानांबाबत निर्णय घेणे अवघड झाले आहे.  सर्वाेच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील सहाशेहून अधिक परमिट रूम व बिअर बार तसेच वाइन शॉपच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. तथापि, केंद्र सरकारने न्यायालयाला विनंती केल्यामुळे परमिट रूम व बिअर बारला वगळण्यात आले, तर वाइन शॉप म्हणजेच मद्यविक्री करणाऱ्या दुकानांबाबत न्यायालयाचा निर्णय कायम असल्याचे सांगण्यात येत आहे. न्यायालयाच्या निर्णयाला आठ दिवस उलटले असले तरी, अद्याप त्याचा निकाल शासनापर्यंत व पर्यायाने राज्य उत्पादन शुल्क खात्यापर्यंत पोहोचलेला नाही, त्यामुळे मार्चअखेर परमिट रूम व बिअर बारच्या परवान्याचे नूतनीकरण करावे किंवा नाही, असा प्रश्न उभा राहिला आहे. न्यायालयाचा निर्णयच न मिळाल्यामुळे वृत्तपत्रातून आलेल्या वृत्ताचा आधार मानून कार्यवाही करणे गैर असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)मार्चअखेरची अडचणराज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परमिट रूम व बिअर बारचे नूतनीकरण करण्यासाठी हातात जेमतेम दिवस शिल्लक आहेत. सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे महामार्गावरील दुकानांबाबत राज्य उत्पादन शुल्क परवाना नूतनीकरण करण्याच्या तयारीत नव्हते. परंतु आता न्यायालयाचा निर्णय बदलल्याने परवाने नूतनीकरण करावे लागतील, मात्र त्यासाठी हातात दिवस शिल्लक नाहीत. मंगळवारी बॅँकांना सुटी असून, पुढील तीन दिवस मार्च अखेरमुळे बॅँकांचे व्यवहार बंद राहतील. अशा परिस्थितीत चलन भरून नूतनीकरण कसे होईल, असा प्रश्न आहे. न्यायालयात आव्हानाची शक्यताराष्ट्रीय व राज्य मार्गाच्या मालकी हक्काबाबतही संभ्रम आहे. अनेक शहरांमध्ये राज्य व राष्ट्रीय महामार्ग स्थानिक स्वराज्य संस्थांकडे देखभालीसाठी देण्यात आले असून, काही ठिकाणी शहराबाहेरून नवीन रस्ते झाल्याने अशा ठिकाणी जुन्या रस्त्यांचा निकष लावावा की नाही याबाबत शासनाकडून अद्यापही मार्गदर्शन आलेले नाही. त्यामुळे कारवाई करायची तरी कशी करणार व त्याला न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.