शहरं
Join us  
Trending Stories
1
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
2
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
3
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
4
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
5
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
6
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
7
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
8
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई
9
मुंबई: ठाकरे गटाच्या पेडणेकर, दुधवडकरांसह आठ जणांची उमेदवारी धोक्यात; प्रभाग आरक्षणाचा फटका
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
11
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
12
अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस
13
चातुर्मासाची शेवटची संकष्ट चतुर्थी: गणेश कल्याण करेल, शुभ घडेल; पाहा, व्रत विधी-चंद्रोदय वेळ
14
५ राजयोगात संकष्ट चतुर्थी: १० राशींची इच्छा पूर्ण, मान-सन्मान; यश-कीर्ती-लाभ, शुभ-वरदान काळ!
15
VIRAL : गर्लफ्रेंडच्या हातात हात घालून हॉटेल बाहेर आला; पत्नीने बघताच भर रस्त्यात धुतला! व्हिडीओ व्हायरल
16
मलायकाला झालंय तरी काय? अरबाज खानने लेकीला आणलं घरी, अभिनेत्रीने स्टोरी शेअर करत...
17
India Vs China: भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा प्रमुख विकास इंजिन, चीनची वाढ संथ; पाहा काय म्हणाल्या IMF प्रमुख
18
वर्षाला २० लाखाचं पॅकेज, ५ महिन्यापूर्वी केले लव्ह मॅरेज; २८ वर्षीय युवकानं स्वत:ला का संपवलं?
19
घरबसल्या महिन्याला ₹९२५० ची कमाई करुन देणारी पोस्टाची स्कीम! पण एक चूक पडेल भारी, बसू शकतो ३० हजारांचा फटका
20
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टी २५ हजारांच्या वर; Cipla, Zomato, Dr Reddy's मध्ये खरेदी

कवितेसाठी शब्दात चमक असावी लागते

By admin | Updated: September 25, 2016 01:49 IST

अशोक बागवे : ‘प्रतिभासंगम’च्या दुसऱ्या दिवशी मुलाखत रंगली

नाशिक : कविता लिहिण्यासाठी यमक नव्हे तर शब्दात चमक असावी लागते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. अशोक बागवे यांनी केले. ‘प्रतिभासंगम’च्या दुसऱ्या दिवशी आनंद क्षेमकल्याणी व सतीश सोळांकुरकर यांनी शनिवारी निसर्गकवी नलेश पाटील व्यासपीठावर प्रा. अशोक बागवे यांची प्रकट मुलाखत घेतली. रावसाहेब थोरात सभागृहात बागवे यांच्याशी संवाद साधताना शालेय व महाविद्यालयीन जीवन, त्यांचा काव्यप्रवास व कविता, नाटक सादरीकरण आदि विविध विषयांवर विचारलेल्या प्रश्नांनी मुलाखत उत्तरोत्तर रंगत गेली. मुलाखतकार क्षेमकल्याणी आणि सोळांकुरकर यांच्या प्रश्नांना उत्तर देताना बागवे म्हणाले, दहावीला असताच पहिली कविता लिहिली. मुंबई टेलिफोनमध्ये नोकरी करून महाविद्यालयीन शिक्षण घेताना कवयित्री शांता शेळके शिक्षिका म्हणून लाभल्या. त्यांचा साहित्यमनावर प्रभाव झाला. तसचे त्यांनी ‘आलम’ या पहिल्या काव्यसंग्रहाचा प्रवास उलगडून सांगितला. नाट्य साहित्याविषयी बागवे म्हणाले, नाटक एक रचना असून संघर्ष नाटकाचा आत्मा आहे. कलाकार व प्रेक्षकांच्या संवादातून नाटक घडत असून, दिग्दर्शक नाटकाची दिशा ठरवत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी ‘सावलीच्या टोपलीत उन्हाचे गजरे’ स्वरचित कविता सादर केली. दरम्यान, कथाकथन व काव्यवाचन स्पर्धाही पार पडल्या. संध्याकाळी शहरातील अशोकस्तंभ, मॅरेथॉन चौक व गंगापूर नाका परिसरात पथनाट्यांचे सादरीकरण करण्यात आले. (प्रतिनिधी) कवितेला व्यासपीठ मिळणे आवश्यक कवितासंग्रह काढलाच गेला पाहिजे हे कवीसाठी महत्त्वाचे नसते, तर सभोवतालचे वर्णन करताना त्याने शब्दबद्ध केलेल्या भावभावना, कल्पना आणि विचारांना व्यासपीठ मिळणे आवश्यक असते, असे मत बागवे यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी त्यांची प्रतिभा विकसित कशी होऊ शकते याविषयी विचार करणे आवश्यक असून, विद्यार्थ्यांनी अर्जुनाप्रमाणे लक्ष केंद्रित करून निरीक्षण शक्ती वाढवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.