शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
3
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
4
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
5
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
6
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
7
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
8
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
9
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
10
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
11
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
12
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
13
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
14
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
15
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
16
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
17
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
18
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
19
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
20
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!

कवितेसाठी शब्दात चमक असावी लागते

By admin | Updated: September 25, 2016 01:49 IST

अशोक बागवे : ‘प्रतिभासंगम’च्या दुसऱ्या दिवशी मुलाखत रंगली

नाशिक : कविता लिहिण्यासाठी यमक नव्हे तर शब्दात चमक असावी लागते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. अशोक बागवे यांनी केले. ‘प्रतिभासंगम’च्या दुसऱ्या दिवशी आनंद क्षेमकल्याणी व सतीश सोळांकुरकर यांनी शनिवारी निसर्गकवी नलेश पाटील व्यासपीठावर प्रा. अशोक बागवे यांची प्रकट मुलाखत घेतली. रावसाहेब थोरात सभागृहात बागवे यांच्याशी संवाद साधताना शालेय व महाविद्यालयीन जीवन, त्यांचा काव्यप्रवास व कविता, नाटक सादरीकरण आदि विविध विषयांवर विचारलेल्या प्रश्नांनी मुलाखत उत्तरोत्तर रंगत गेली. मुलाखतकार क्षेमकल्याणी आणि सोळांकुरकर यांच्या प्रश्नांना उत्तर देताना बागवे म्हणाले, दहावीला असताच पहिली कविता लिहिली. मुंबई टेलिफोनमध्ये नोकरी करून महाविद्यालयीन शिक्षण घेताना कवयित्री शांता शेळके शिक्षिका म्हणून लाभल्या. त्यांचा साहित्यमनावर प्रभाव झाला. तसचे त्यांनी ‘आलम’ या पहिल्या काव्यसंग्रहाचा प्रवास उलगडून सांगितला. नाट्य साहित्याविषयी बागवे म्हणाले, नाटक एक रचना असून संघर्ष नाटकाचा आत्मा आहे. कलाकार व प्रेक्षकांच्या संवादातून नाटक घडत असून, दिग्दर्शक नाटकाची दिशा ठरवत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी ‘सावलीच्या टोपलीत उन्हाचे गजरे’ स्वरचित कविता सादर केली. दरम्यान, कथाकथन व काव्यवाचन स्पर्धाही पार पडल्या. संध्याकाळी शहरातील अशोकस्तंभ, मॅरेथॉन चौक व गंगापूर नाका परिसरात पथनाट्यांचे सादरीकरण करण्यात आले. (प्रतिनिधी) कवितेला व्यासपीठ मिळणे आवश्यक कवितासंग्रह काढलाच गेला पाहिजे हे कवीसाठी महत्त्वाचे नसते, तर सभोवतालचे वर्णन करताना त्याने शब्दबद्ध केलेल्या भावभावना, कल्पना आणि विचारांना व्यासपीठ मिळणे आवश्यक असते, असे मत बागवे यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी त्यांची प्रतिभा विकसित कशी होऊ शकते याविषयी विचार करणे आवश्यक असून, विद्यार्थ्यांनी अर्जुनाप्रमाणे लक्ष केंद्रित करून निरीक्षण शक्ती वाढवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.