शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

...तर ‘अ‍ॅप्टीट्यूड टेस्ट’ होणार सक्तीची

By admin | Updated: August 13, 2014 00:42 IST

विनोद तावडे : विद्यार्थी गुणगौरव सोहळा

सिडको : शालेय शिक्षण पद्धतीत गेल्या अनेक वर्षांपासून बदल झालेला नाही. यापुढील काळात महाराष्ट्रात जर भाजपाची सत्ता आल्यास मुलींची अभ्यासाची क्षमता तपासण्यासाठी इयत्ता दहावी व बारावीनंतर काय याबाबत सर्व शाळांमध्ये अ‍ॅप्टीट्यूड टेस्ट घेण्याचे सक्तीचे करणार असल्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार विनोद तावडे यांनी सांगितले.भोळे मंगल कार्यालयात भारतीय जनता पार्टीचे सिडको मंडल अध्यक्ष जगन पाटील यांनी आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थी गौरव व प्रवेश सोहळ्याप्रसंगी मार्गदर्शन करताना तावडे बोलत होते. यावेळी तावडे म्हणाले की, सिडको-सातपूर या नाशिक पश्चिम मतदारसंघात विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ व ज्येष्ठ नागरिकांचा गौरव हा उपक्रम राबविणे आजच्या काळात गरजेचे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात बदल झालेला नाही. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान दिले जाते, परंतु त्यामागील घटना स्पष्ट केली जात नाही. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसण झाले पाहिजे. विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी माहिती न कळता त्यातील जिज्ञासा समजली पाहिजे. आजचे युग हे इंटरनेटचे आहे. यामुळे घरातील प्रत्येकास इंटरनेट येणे गरजेचे आहे. आपला मुलगा इंटरनेटमध्ये काय करतो याबाबतची सखोल माहिती घरातल्यांना असणे गरजेचे आहे.आज विद्यार्थ्यांचा गुणगौरव तर झालाच पाहिजे परंतु यापलीकडे जाऊन दहावी व बारावीनंतर विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे यासाठी भाजपा सत्तेवर आल्यानंतर सर्वप्रथम सर्व शाळांमध्ये अ‍ॅप्टीट्यूड टेस्ट सक्तीची करणार असल्याचेही तावडे यांनी सांगितले. याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळावा, त्यांना अधिक सुविधा मिळाव्यात यासाठी नवीन धोरण अंमलात आणणार असल्याचेही तावडे यांनी सांगितले.प्रास्ताविकात आयोजक जगन पाटील म्हणाले की, सिडको व सातपूर या पश्चिम मतदारसंघात सर्वसामान्य नागरिक राहतात. त्यांच्या मुला-मुलींचा गौरव व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्याची गरज असल्यानेच हा उपक्रम घेतल्याचे सांगितले. आमदार गिरीश महाजन, माजी मंत्री डॉ. दौलतराव अहेर, भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी आदिंनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपीठावर उपमहापौर सतीश कुलकर्णी, देवयानी फरांदे, गोपाळ पाटील, प्रदीप पेशकार, बाळासाहेब पाटील, सुहास फरांदे, कैलास अहिरे, सुरेखा पाटील, ललिता भावसार, विक्रम नागरे, प्रकाश अमृतकर, रवि पाटील, हेमंत अहेर, प्रकाश बागुल, आर. आर. पाटील, रामहरी संभेराव, साहेबराव आव्हाड, यशवंत नेरकर आदि उपस्थित होते. (वार्ताहर)