शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

...तर ‘अ‍ॅप्टीट्यूड टेस्ट’ होणार सक्तीची

By admin | Updated: August 13, 2014 00:42 IST

विनोद तावडे : विद्यार्थी गुणगौरव सोहळा

सिडको : शालेय शिक्षण पद्धतीत गेल्या अनेक वर्षांपासून बदल झालेला नाही. यापुढील काळात महाराष्ट्रात जर भाजपाची सत्ता आल्यास मुलींची अभ्यासाची क्षमता तपासण्यासाठी इयत्ता दहावी व बारावीनंतर काय याबाबत सर्व शाळांमध्ये अ‍ॅप्टीट्यूड टेस्ट घेण्याचे सक्तीचे करणार असल्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार विनोद तावडे यांनी सांगितले.भोळे मंगल कार्यालयात भारतीय जनता पार्टीचे सिडको मंडल अध्यक्ष जगन पाटील यांनी आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थी गौरव व प्रवेश सोहळ्याप्रसंगी मार्गदर्शन करताना तावडे बोलत होते. यावेळी तावडे म्हणाले की, सिडको-सातपूर या नाशिक पश्चिम मतदारसंघात विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ व ज्येष्ठ नागरिकांचा गौरव हा उपक्रम राबविणे आजच्या काळात गरजेचे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात बदल झालेला नाही. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान दिले जाते, परंतु त्यामागील घटना स्पष्ट केली जात नाही. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसण झाले पाहिजे. विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी माहिती न कळता त्यातील जिज्ञासा समजली पाहिजे. आजचे युग हे इंटरनेटचे आहे. यामुळे घरातील प्रत्येकास इंटरनेट येणे गरजेचे आहे. आपला मुलगा इंटरनेटमध्ये काय करतो याबाबतची सखोल माहिती घरातल्यांना असणे गरजेचे आहे.आज विद्यार्थ्यांचा गुणगौरव तर झालाच पाहिजे परंतु यापलीकडे जाऊन दहावी व बारावीनंतर विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे यासाठी भाजपा सत्तेवर आल्यानंतर सर्वप्रथम सर्व शाळांमध्ये अ‍ॅप्टीट्यूड टेस्ट सक्तीची करणार असल्याचेही तावडे यांनी सांगितले. याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळावा, त्यांना अधिक सुविधा मिळाव्यात यासाठी नवीन धोरण अंमलात आणणार असल्याचेही तावडे यांनी सांगितले.प्रास्ताविकात आयोजक जगन पाटील म्हणाले की, सिडको व सातपूर या पश्चिम मतदारसंघात सर्वसामान्य नागरिक राहतात. त्यांच्या मुला-मुलींचा गौरव व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्याची गरज असल्यानेच हा उपक्रम घेतल्याचे सांगितले. आमदार गिरीश महाजन, माजी मंत्री डॉ. दौलतराव अहेर, भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी आदिंनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपीठावर उपमहापौर सतीश कुलकर्णी, देवयानी फरांदे, गोपाळ पाटील, प्रदीप पेशकार, बाळासाहेब पाटील, सुहास फरांदे, कैलास अहिरे, सुरेखा पाटील, ललिता भावसार, विक्रम नागरे, प्रकाश अमृतकर, रवि पाटील, हेमंत अहेर, प्रकाश बागुल, आर. आर. पाटील, रामहरी संभेराव, साहेबराव आव्हाड, यशवंत नेरकर आदि उपस्थित होते. (वार्ताहर)