शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

आॅक्टोबर हीटच्या तडाख्याने शहर-तालुक्यातील तपमान वाढले

By admin | Updated: October 8, 2014 01:13 IST

आॅक्टोबर हीटच्या तडाख्याने शहर-तालुक्यातील तपमान वाढले

संगमेश्वर : आॅक्टोबर हीटच्या तडाख्याने शहर-तालुक्यातील तपमान वाढले असताना विजेच्या भारनियमनामुळे ग्रामीण जनतेसोबत शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. भारनियमनामुळे शेतपिकांना पाणी देण्यास अडचणी निर्माण होऊन कांदा, डाळिंबाला त्याचा फटका बसत आहे.गेल्या आठ-दहा दिवसांपासून मालेगाव परिसरात उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. तपमानाचा आकडा ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. त्यामुळे शहर-तालुक्यातील जनता हैराण झाले आहेत. महिला वर्गाकडून उन्हापासून बचाव करण्यासाठी स्कार्फ, गॉगलचा वापर केला जात आहे. विद्यार्थी-कष्टकरी वर्गास टोपी-हातरूमालचा आधार घ्यावा लागत आहे. उष्णता मोठ्या प्रमाणावर वाढून उकाडा जाणवत असल्यामुळे पंखे, कुलर, वातानुकूलित यंत्रांचा वापर वाढला आहे. त्याशिवाय घरे, दुकान, कार्यालयात कामकाज करणे अशक्य झाले आहे. त्यातच विजेच्या भारनियमनाने नागरिकांच्या त्रासात भरच पडली आहे. थंडपेयांना पुन्हा मागणी वाढली आहे. पावसाळ्यानंतर हीट आणि वातावरणातील बदलामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तापाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढीव उष्णतेमुळे कांदा-डाळिंबाच्या पिकाला त्याचा तडाखा बसला आहे. आधीच कांदा, डाळिंबाचे भाव पडल्याने शेतकरीवर्ग आॅक्टोबर हीट-विजेचे भारनियमन व परिणामी पाणीटंचाई यामुळे परिस्थितीशी झुंज देत आहे. (वार्ताहर)