शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

शिक्षक मेटाकुटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2016 00:22 IST

दहिवड : २११६ आंदोलने करूनही कायम विनाअनुदानितच

दहिवड : पावसाने झोडपले, नवऱ्याने मारले आणि राजानेच नागवले तर दाद मागायची कुणाकडे? अशीच स्थिती सध्या महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांची आणि गेल्या १५ वर्षांपासून बिनपगारी अध्यापन कार्य करणाऱ्या ६५ हजार शिक्षकांची झालेली आहे.महाराष्ट्रात विदर्भ-मराठवाड्यात गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी स्थिती आहे. गुरांना वैरण नाही, शेतात पीक नाही, घरात खायला अन्न नाही आणि कर्ज देणाऱ्या बँका-पतपेढ्या-सावकारांचा ससेमिरा काही चुकत नाही, अशा दुष्टचक्रात शेतकरी भरडला जातो आहे.या दुष्काळावर उपाययोजना करण्याच्या नावावर चर्चा जेवढ्या झाल्या त्याहून जास्त राजकारण झालेलं अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं. त्यामुळे हा दुष्काळ पावसाचा म्हणावा की, संवेदनाचा अशी शंका येते. बरं शेतकऱ्याच्या या भीषण स्थितीकडे राज्यकर्त्यांचं लक्ष तरी केव्हा गेलं? जेव्हा दिवसागणिक शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या वाढू लागल्या तेव्हा. म्हणजे तुम्ही आत्महत्त्या कराल तेव्हाच आम्हाला पाझर फुटेल, असंच तर मायबाप सरकारला सांगायचं नाही ना, असाच प्रश्न आता सर्वसामान्यांना पडू लागला आह. देशाच्या गुणवंत पिढ्या घडविणारा कायम विनाअनुदानित शाळेतला शिक्षकही गेल्या दहा वर्षांच्या संघर्षानंतर आता आत्महत्त्येच्या विचारापर्यंत येऊन ठेपला आहे.शिक्षणाची गंगा गावोगावी पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने २४ नोव्हेंबर २००१ रोजी यापुढे राज्यात ‘कायम विनाअनुदान’ तत्त्वावर नव्या शाळांना मान्यता देण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रभर २००० प्राथमिक व २००० माध्यमिक शिक्षकांनी किती वर्षे बिनपगारी काम करायचे? हा साधा विचारही राज्यकर्त्यांच्या मनाला शिवला नाही. पण म्हणतात ना आझाद मैदानात तर कधी नागपुरात विधानभवनासमोर आंदोलन करून या कायम विनाअनुदान धोरणाला विरोध ंंकेला. शाळाबंद आंदोलन, भीक मांगो, मुंडन, चप्पल मारो, अंत्ययात्रा, लाक्षणिक उपोषण, मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न अशा अनेक माध्यमातून शिक्षकांनी आठ वर्षे लढा दिल्यावर कुठे सरकारला जाग आली. शेवटी आघाडी सरकारने २० जुलै २००९च्या निर्णयाने या शाळांच्या मान्यतेच्या नावातील ‘कायम’ हा शब्द काढला आणि अनुदान देण्याचा मार्ग मोकळा झाला. दीड हजार शाळा मूल्यांकनात पात्र ठरल्या. अनुशेष, सेवासुविधा, विद्यार्थीसंख्या अशा समस्यांमध्ये अडकलेल्या आणि त्यामुळे अपात्र ठरलेल्या हजारो शाळांचा लढा सुरू आहे. मूल्यांकनास पात्र ठरण्यासाठी आणि पात्र ठरलेल्यांचा संघर्ष सुरू आहे. हजारांच्या पुढे आहे. (वार्ताहर)