शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

टॅँकरच्या पाण्यामुळे कोट्यवधीची झळ !

By admin | Updated: June 13, 2014 00:22 IST

सिन्नर तालुक्यासाठी दररोज सुमारे पाच लाख ८७ हजार रुपये खर्च येतो.

 

शैलेश कर्पे

सिन्नरगेल्या अनेक वर्षांपासून सिन्नरकरांचे टॅँकरसोबत निर्माण झालेले नाते दिवसेंदिवस अधिक गहिरे होत असल्याचे चित्र आहे. सिन्नर तालुक्यात ४० गावे व २१६ वाड्या-वस्त्यांना ६६ टॅँकरद्वारे दररोज सुमारे २४० फेऱ्या सुरू आहेत. या टॅँकरच्या खर्चापोटी शासनाला फक्त सिन्नर तालुक्यासाठी दररोज सुमारे पाच लाख ८७ हजार रुपये खर्च येतो. तीन वर्षांत सिन्नर तालुक्यातील टॅँकरच्या खर्चापोटी शासनाला ११ कोटी २० लाख रुपये मोजावे लागल्याचे आकडेवारीहून दिसून येते. सिन्नर तालुका अवर्षणग्रस्त म्हणून ओळखला जातो. दरवर्षी उन्हाळ्यात येथील जनतेची तहान भागविण्यासाठी टॅँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येते. विशेषत: तालुक्याच्या पूर्वभागातील काही गावांना तर पावसाळ्यातही टॅँकरच्या फेऱ्या सुरूठेवण्याची वेळ येते. इतकी पाणीटंचाईची तीव्रता भयानक आहे. गेल्या चार वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाल्याने तालुक्यातील काही गावांना तर अक्षरश: सलग तीन वर्षांपासून टॅँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. ५ मे २०११ पासून ते आजपर्यंत काही गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. ६६ टॅँकरमध्ये २१ शासकीय टॅँकर असून, ४५ खासगी टॅँकर आहेत. दररोज या टॅँकरच्या इंधन, पाणीपट्टी, टॅँकरभाडे, चालकांचा प्रवासभत्ता, विहीर अधिग्रहण यापोटी दररोज पाच लाख ८७ हजार ९२० रुपये खर्च येतो. तीन वर्षांत टॅँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी करण्यात आलेला ११ कोटी २० लाख रुपयांची आकडेवारी पाहिल्यानंतर मती गुंग होते. दरवर्षी उन्हाळ्यात टॅँकरसाठी कोट्यवधी रुपये खर्च होतो. त्यापेक्षा टंचाईग्रस्त गावांमध्ये कायमस्वरूपी पाणीयोजना राबविल्यास टॅँकरवरचा खर्च बंद होईल व ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी भटंकती बंद होईल.सिन्नर तालुका ‘टॅँकरमुक्त’ करण्याचा घोषणा अनेक लोकप्रतिनिधींनी केल्या. मात्र दरवर्षी टॅँकरची संख्या व टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. फक्त टॅँकरने पाणी पुरविण्यासाठी दरवर्षी सरासरी साडेतीन कोटी रुपये खर्च होतो. तालुका खऱ्या अर्थाने टॅँकरमुक्त करण्यासाठी शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींना तळमळीने काम करून कायमस्वरूपी पाणीयोजना राबविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.