शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

तलाठी भरतीत जागरूकता, पोलीसपाटीलकडे दुर्लक्ष

By admin | Updated: September 11, 2016 01:21 IST

अन्यायग्रस्तांचा सवाल : दोषींवर कारवाईबाबत साशंकता

 नाशिक : रविवारी होणाऱ्या तलाठी लेखी परीक्षा व त्यानंतरच्या भरती प्रकियेत पैसे देण्या-घेण्याच्या तक्रारी आल्यास थेट फौजदारी कारवाई करण्याची तयारी दर्शविणाऱ्या जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्ण यांनी दोन महिन्यांपूर्वी झालेल्या पोलीस भरतीतील गैरप्रकाराचे पुरावे देऊनही साधलेल्या चुप्पीबाबत अन्यायग्रस्तांनी आश्चर्य व्यक्त केले असून, तलाठी भरतीत जर गैरप्रकार झालाच तर दोषींवर कारवाई होईलच, याविषयी शंका घेतली आहे. तलाठी भरतीत कोणी पैसे देऊन काम करून देण्याचे सांगत असेल तर तक्रार करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केल्यामुळे या भरतीत असा काही प्रकार घडण्याची शक्यता प्रशासन बाळगून असल्याचा अर्थ त्यातून काढला जात असून, तसे झाल्यास थेट फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या तयारीत असलेल्यांवर वचक निर्माण होण्यास मदत होईल असे मानावयास हरकत नसली तरी, असे प्रकारचे इशारे पोकळच असतात हे वेळोवेळीच्या घटनेवर स्पष्ट झाले आहेत. जिल्ह्यात गाजलेल्या पोलीस पाटील भरतीत ही बाब प्रकर्षाने समोर आली असून, निफाड व सिन्नर तालुक्यात पात्र उमेदवारांना डावलून अपात्रांना मौखिक परीक्षेत मनमर्जीने गुणदान केल्याचे उघडकीस येऊनही प्रशासन व पर्यायाने जिल्हाधिकाऱ्यांनी बदललेली भूमिका अजूनही अन्यायग्रस्त उमेदवार विसरलेले नाहीत. विशेष म्हणजे पोलीसपाटील भरतीत अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याने चौकशी करून काढलेल्या निष्कर्षाची पूर्तता करण्यासही प्रशासन अकार्यक्षम ठरले तर प्रांत अधिकाऱ्यांनी सहा उमेदवारांच्या फेरमुलाखती घेण्याच्या केलेल्या शिफारशीकडे महिना उलटूनही दुर्लक्ष करण्यात आल्याने तलाठी भरतीत होणाऱ्या गैरप्रकाराची तक्रार केल्यास त्याची दखल घेतली जाईल वा दोषींवर कारवाई होईलच याची खात्री कोण देईल ? शिवाय अशा प्रकारची तक्रार कोणाकडे व कशी करायची याबाबतही खुलासा व्हावा, अशी मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)