शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेसाठी गहाण ठेवला ‘स्वाभिमान’

By admin | Updated: July 1, 2017 01:22 IST

नाशिक : राज्यभरात शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीसाठी केलेल्या आंदोलनानंतर सरकारने घेतलेला कर्जमाफीचा निर्णय शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा असून, यामुळे शेतकरी कदापि कर्जमुक्त होणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राज्यभरात शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीसाठी केलेल्या आंदोलनानंतर सरकारने घेतलेला कर्जमाफीचा निर्णय शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा असून, यामुळे शेतकरी कदापि कर्जमुक्त होणार नाही. त्यामुळे शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेने सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी त्यांचा स्वाभिमान गहाण ठेवला असून, एकीकडे त्यांचे प्रतिनिधी सरकारमध्ये असताना दुसरीकडे राजू शेट्टी शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचा आव आणत असल्याची बोचरी टीका शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. सूकाणू समितीलाही संघटनेने टीकेचे लक्ष्य करीत समितीच्या सदस्यांच्या राजकीय श्रेयवादाच्या लढाईत शेतकऱ्यांच्या मूळ प्रशांकडेच दुर्लक्ष झाल्याचा आरोप शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेने शुक्रवारी (दि.३०) केला आहे. नाशिक येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित शेतकरी संघनेच्या राज्यस्तरीय बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन संघटनेची कर्जमाफीविषयी भूमिका स्पष्ट केली. यावेळी शेतकरी नेते शंकर धोंडगे म्हणाले, एकीकडे सरकारने फसव्या स्वरूपाच्या कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्यांचे आंदोलन संपविण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मागण्या मांडणाऱ्या समन्वय समितीत राजकीय हेतूने प्रेरित लोकांची घुसखोरी दिसून आल्यानंतरही सुकाणू समितीत शेतकऱ्यांपेक्षा कामगारांच्या नेत्यांचाच अधिक भरणा असल्याचे दिसून आले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी आखडते हात घेणाऱ्या सरकारच्या हस्तक्षेपामुळेच शेतीमालेचे भाव कोसळून शेतकरी कर्जबाजारी झाला असून, सरकाने कर्जवसुलीला स्थगिती देऊन शेतीमालाला हमीभाव दिला तरी शेतकरी सर्व कर्ज भरतील. परंतु, एक दीड रुपये कांदा आणि ३०-३५ रुपये तूर विकली जात असेल तर शेतकऱ्यांनी कर्ज कसे भरायचे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शेतकरी आंदोलनात कर्जमुक्ती आणि हमीभावासाठी उतरलेल्या शेतकऱ्यांची घोर निराशा झाली असून, शेतकरी लढ्याला पुनरुजीवित करण्यासाठी शेतकरी संघटना पुन्हा नव्याने लढा उभारणार असल्याचे धोंडगे यांनी सांगितले. यावेळी रामचंद्र पाटील, गिरीधर पाटील, खेमराज कौर, सुनील पवार,भगवान बोराडे, शेखर पवार, अर्जून बोराडे, रामनाथ ढिकले, शंकर पूरकर, अनील धनवट आदि उपस्थित होते.  शेतकरी संघटनेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणाऱ्या लोकांचा समावेश असून, हे सर्व शरद जोशींच्या विचारांतून तयार झाले आहे. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती सुधरविण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत शेतमालाला रास्त भाव मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकरी संघटना एकत्रित आली आहे.- डॉ. गिरीधर पाटील, कृषितज्ज्ञ