शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
2
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
3
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
4
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
5
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
6
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
7
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
8
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
9
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
10
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
11
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
12
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
13
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
14
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
15
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
16
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
17
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
18
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
19
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
20
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस

भूदान चळवळीतील जमिनीचे संशयास्पद वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 00:20 IST

नाशिक : आचार्य विनोबा भावे यांनी भूमिहिनांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी देशभर पदयात्रा काढून गोळा केलेली भूदान चळवळीत मिळालेली कोट्यवधी रुपये किमतीची सुमारे २८ एकर जमीन तब्बल ७० वर्षांनंतर एका व्यावसायिकाच्या ताब्यात देण्याचा संशयास्पद प्रकार उघडकीस आला असून, महसूल विभागाच्या अधिकाºयांनी निव्वळ एका साध्या पत्राच्या आधारे या जमिनीच्या लावलेल्या विल्हेवाटीतून सरकारच्या महसुलाचेही नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देकोट्यवधी किंमत : इगतपुरी तालुक्यातील प्रकारशासनाच्या महसुलाचेही नुकसान

नाशिक : आचार्य विनोबा भावे यांनी भूमिहिनांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी देशभर पदयात्रा काढून गोळा केलेली भूदान चळवळीत मिळालेली कोट्यवधी रुपये किमतीची सुमारे २८ एकर जमीन तब्बल ७० वर्षांनंतर एका व्यावसायिकाच्या ताब्यात देण्याचा संशयास्पद प्रकार उघडकीस आला असून, महसूल विभागाच्या अधिकाºयांनी निव्वळ एका साध्या पत्राच्या आधारे या जमिनीच्या लावलेल्या विल्हेवाटीतून सरकारच्या महसुलाचेही नुकसान झाले आहे.नाशिक-मुंबई महामार्गावरील इगतपुरी शहराला लागून असलेल्या तळवाडे बुद्रूक येथील ही जागा आहे. एकीकडे मूठभर जमीनदारांच्या ताब्यात असलेली हजारो एकर जमीन व दुसरीकडे भूमिहीन मजुरांची होणारी उपासमार पाहून आचार्य विनोबा भावे यांनी १९५१ मध्ये देशपातळीवर पदयात्रा काढून जमीनदारांना आपल्या ताब्यातील काही जमीन भूदान चळवळीला द्यावी, असे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्टÑ, बिहार अशा विविध राज्यातून प्रतिसाद मिळाला व सुमारे ४७ लाख हेक्टर जागा भूदान चळवळीला मिळाली होती. त्यातील २५ लाख हेक्टर जागा भूमिहिनांना वाटप करण्यात आली व उर्वरित जागा चळवळीच्या ताब्यात होती, नंतर मात्र ती सरकारने ताब्यात घेतली आहे. भूदान चळवळीत मिळालेली जागा निव्वळ ज्याच्याकडे एक गुंठाही जागा नाही, असा भूमिहिनाला त्या जागेचा शेतीसाठी उपयोग करून कुटुंबीयाचा उदरनिर्वाह करता यावा अशांनाच वाटप करण्याची अट होती. परंतु ही चळवळ नामशेष झाल्यानंतर भूदान समितीच्या ताब्यात गेलेल्या या जमिनीच्या वाटपाबाबत शासन पातळीवर संदिग्धता निर्माण झाली. नेमका त्याचाच आधार घेत इगतपुरीच्या तत्कालीन तहसीलदाराने महाराष्टÑ ग्रामदान नव निर्माण समिती (भूदान यज्ञ समिती)च्या साध्या पत्रान्वये तळेगाव बुद्रूक येथील सर्व्हे नंबर ३१७ मधील ६.४० हेक्टर व सर्व्हे नंबर ३१६ मधील ४.३८ अशी सुमारे १२.१० हेक्टर जमीन सुरिंदरपाल सिंग ब्राइट यांच्या नावे करण्याचे आदेश सन २०१४ मध्ये दिले आहेत.राष्टÑीय महामार्गाला लागून असलेल्या तळेगाव येथे सध्या जमिनींचे दर एकरी ३५ लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत असून, भूदान समितीच्या पत्राद्वारे ब्राइट यांच्या नावे केलेल्या जमिनीची किंमत कोट्यवधीच्या घरात असून, तहसीलदारांनी ज्या समितीच्या पत्रावरून जमिनीचे वाटप केले ती समिती सध्या अस्तित्वात आहे किंवा नाही याची खात्री केलेली नाही, शिवाय भूदान चळवळ कायद्याची पडताळणीही उपलब्ध कागदपत्रांवरून केलेली दिसत नाही.विशेष म्हणजे भूदान समितीच्या ताब्यात तब्बल ७० वर्षे असलेली जमीन पडीक असल्याचे दाखविण्यात आले असून, महाराष्टÑ जमीन महसूल कायद्यान्वये तीन वर्षांपेक्षा अधिक काळ पडीक असलेली जमीन शासन जमा करण्याची तरतूद असताना इतकी वर्षे या जमिनीचा शोध का लागला नाही, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.कुठल्याही कराची आकारणी नाही जाणकारांच्या मते भूदान चळवळीतील जमीन आता तो कायदा रद्द झाल्याने अन्य व्यक्तीला वाटप करता येत नाही, असे असतानाही सातबारा उताºयावर सुरिंदरसिंग पालसिंग ब्राइट यांचे नाव कसे काय लागू शकते, असा प्रश्न केला जात आहे. शिवाय जमिनीवर नाव लावताना कोणत्याही कराची आकारणी करण्यात आली नाही की, स्टॅम्पड्युटी भरण्यात आलेली नसल्याने शासनाच्या महसुलाचेही नुकसान झाल्याचे मानले जात आहे.