शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
3
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
4
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
5
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
6
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
7
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
8
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
9
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
10
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
11
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
12
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
13
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
14
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
15
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
16
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
17
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
18
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
19
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
20
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?

आउटसोर्सिंगद्वारे साफसफाई ठरली वादग्रस्त : साधुग्राममधील ठेक्याचे अद्यापही कवित्व सुरू

By admin | Updated: October 3, 2015 00:18 IST

पर्वकाळातील स्वच्छतेवरून महापालिकेची दमछाक

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यातील पर्वणीकाळात स्वच्छता व आरोग्यविषयक आव्हान महापालिकेने पूर्णपणे पेलले, असा छातीठोकपणे दावा पालिका प्रशासनही करू शकणार नाही. महापालिकेने रामकुंड-गोदाघाट परिसर, भाविकमार्ग आणि साधुग्राममध्ये आउटसोर्सिंगच्या माध्यमातून स्वच्छताविषयक कामांना प्राधान्य दिले, परंतु सर्वांत संवेदनशील भाग बनलेल्या ‘साधुग्राम’ परिसरातून घाण-कचऱ्याची होणारी ओरड पालिकेच्या आरोग्य विभागाची नेहमीच दमछाक करत राहिली. पर्वणीच्या दिवशी पोलिसांच्या अतिरेकी बंदोबस्तामुळे घंटागाड्यांचे केलेले नियोजन फसले. गावभर रस्त्यालगत उभ्या केलेल्या शौचालय आणि मुताऱ्यांना अनेक ठिकाणी आउटलेटच नसल्याने भाविकांना दुर्गंधीचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे, कुंभमेळ्यात स्वच्छता व तत्सम कामांमुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल, अशी जी दवंडी पिटवली गेली ती हवेतच विरली. साधुग्रामच्या ठेक्यावरून तर कुंभपर्वणी संपूनही प्रशासन आणि स्थायी समिती यांच्यातील विस्तव अजूनही विझलेला नाही. सिंहस्थ कुंभमेळ्यातील पर्वकाळ हा नाशिककरांच्या दृष्टीने नेहमीच आव्हानात्मक राहिलेला आहे. पर्वकाळात लाखोंच्या संख्येने येणारे भाविक, त्यातून शहरातील स्वच्छतेच्या कामावर पडणारा ताण आणि नंतर उद्भवणारे साथीचे आजार यामुळे नाशिककर धास्तावलेले असतात. मागील सिंहस्थ कुंभपर्वणीनंतर शहरात मोठ्या प्रमाणावर डोळ्यांची साथ पसरली होती. यंदा प्रशासनाकडून कोट्यवधी भाविकांचा अंदाज व्यक्त केला गेल्याने शहराच्या आरोग्याविषयी चिंता होतीच. सुदैवाने, शहरात कुंभपर्वणीनंतर आरोग्यविषयक आणीबाणीची स्थिती उद्भवली नाही. मुळात एक कोटीहून अधिक भाविक येण्याचा अंदाजच फोल ठरला. पहिल्या पर्वणीला पोलीस प्रशासनाच्या पराक्रमामुळे भाविकांनी पाठ फिरविली तर पहिल्या पर्वणीच्या दिवशी इतरांना आलेल्या अनुभवांच्या आधारे भाविकांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्वणीला गर्दीचा अंदाज घेत हजेरी लावली. महापालिकेने रामकुंड-गोदाघाट परिसर, भाविकमार्गासाठी स्वच्छतेचा ठेका दिला होता, तर साधुग्रामच्या स्वच्छतेच्या ठेक्याचा वाद थेट न्यायालयात जाऊन पोहोचल्याने प्रशासनाने अन्य कंत्राटदारांच्या मदतीने साधुग्रामच्या साफसफाईवर भर दिला. साधुग्राममधील स्वच्छता हे सर्वांत मोठे आव्हान महापालिका प्रशासनापुढे होते. साधुग्राममध्ये प्रत्येक खालशांमध्ये भोजनावळी उठत असल्याने उष्टी-खरकटी, पत्रावळ्यांचा ढीग साचत होता. याशिवाय रस्त्यावर पडणाऱ्या कचऱ्याची समस्या होतीच. महापालिकेने साधुग्राम व रामकुंड परिसरात २६ घंटागाड्यांची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती, तरीही साधुग्राममधून घाण-कचरा उचलला जात नसल्याच्या तक्रारींचा पाढा साधू-महंतांकडून वाचला जात होता. महापालिकेने साधुग्राममध्ये आखाडे व खालशांसाठी सुमारे नऊ हजार शौचालये व स्नानगृहांची व्यवस्था उभारली होती, परंतु सुरुवातीपासूनच या शौचालये-स्नानगृहांच्या कामाबाबत तक्रारींचा सूर निघत राहिला. खुद्द पालकमंत्र्यांनीही वारंवार केलेल्या पाहणीत त्याविषयी नाराजी व्यक्त केलेली होती. १९ आॅगस्टला साधुग्राममध्ये आखाड्यांच्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर अनेक खालशांचे आगमन होऊ लागले आणि शौचालयांची स्थिती बिकट बनत गेली. महापालिकेमार्फत आउटसोर्सिंगद्वारे जे परप्रांतीय कामगार स्वच्छतेचे काम करत होते त्याच मंडळींची उघड्यावरची ‘डबापरेड’ही साधूंच्या रोषाला कारणीभूत ठरली. महापालिकेने भाविकमार्गावर ठिकठिकाणी शौचालय व मुताऱ्यांची सुविधा उपलब्ध करून दिली होती, परंतु अनेक ठिकाणी त्यांना आउटलेटच नसल्याचे उघडकीस आले. तिसऱ्या आणि अखेरच्या पर्वणीला तर पावसामुळे महापालिकेच्या या व्यवस्थेची अगदीच दैना झाली. तीनही पर्वणी मिळून सुमारे १४०० टन कचरा खतप्रकल्पावर नेण्यात आला, परंतु खतप्रकल्पावर कचऱ्याचे ढीग साचत असताना पूर्ण क्षमतेने खतप्रकल्प चालविणे महापालिकेला शक्य होऊ शकले नाही. कुंभकाळात आरोग्य व स्वच्छताविषयक तक्रारी वाढत असताना आरोग्याधिकारी अश्रू ढाळत हतबलता व्यक्त करत होते. प्रशासनातील मुखंड आख्खी दुनिया मुठीत असल्यासारखे वावरत होते आणि टिवटिवाटातूनच आपले कर्तृत्व दाखवत होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पर्यावरणपूरक हरित कुंभ साजरा करण्यासाठी नाशिककरांनी दिलेली साथ आणि सेवाभावी संस्थांनीही रस्त्यावर उतरत स्वच्छतेसाठी लावलेला हातभार यामुळे शहरात स्वच्छता राखल्याचे उसने का होईना श्रेय महापालिका घेत आहे.