शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

‘ग्रीन फिल्ड’मुळे सुरत-नाशिक अंतर दोन तासांत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:26 IST

नाशिक : ग्रीन फिल्ड महामार्ग संकल्पनेनुसार होणाऱ्या सुरत-हैदराबाद व्हाया नाशिक या महामार्गामुळे नाशिक ते सुरत अंतर केवळ २ तासात ...

नाशिक : ग्रीन फिल्ड महामार्ग संकल्पनेनुसार होणाऱ्या सुरत-हैदराबाद व्हाया नाशिक या महामार्गामुळे नाशिक ते सुरत अंतर केवळ २ तासात कापणे शक्य होणार आहे. या महामार्गामुळे भविष्यात नाशिक - सुरत अंतर केवळ १७६ किलोमीटरवर येणार असल्याने दोन्ही शहरांची कनेक्टिव्हिटी प्रचंड वेगवान होऊ शकणार आहे. नाशिक जिल्ह्यातील ६ तालुके आणि ६९ गावांमधून जाणाऱ्या या प्रस्तावित महामार्गामुळे या सहाही तालुक्यांच्या विकासाच्या प्रक्रियेला वेग येऊ शकणार असल्याचे नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंंडियाचे (न्हाई) प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे यांनी सांगितले.

नाशिक सिटिझन फोरमतर्फे उंटवाडी येथील द इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स नाशिक शाखेच्या हॉलमध्ये ‘सुरत-हैदराबाद’ या महामार्गाबाबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (न्हाई) प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे, प्रकल्प सल्लागार राजू, व्यवस्थापक दिलीप पाटील तसेच ज्येष्ठ उद्योजक हेमंत राठी आणि आशिष कटारिया मंचावर उपस्थित होते. यावेळी प्रस्ताविक प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. हा प्रस्तावित महामार्ग सहापदरी असणार आहे. या महामार्गामुळे जिल्ह्यातील दोनशे हेक्टर क्षेत्रातून हा महामार्ग ‘ग्रीन फिल्ड महामार्ग’ संकल्पनेनुसार तयार होणार असल्याने पर्यावरणाची फारशी हानी होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यातील ६९ गावांमधून हा महामार्ग जाणार असून, फुड क्लब, लॉजेस्टिकसह इतर सुविधांमुळे रोजगारवृद्धीसही मदत होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प नाशिकच्या दृष्टिकोनातून अत्यंत फायदेशीर ठरणार असल्याचेही साळुंखे यांनी नमूद केले.

सध्या सुरत ते चेन्नईसाठी देशात तीन महामार्ग आहेत. ते महामार्ग सुमारे १६०४, १६१४ आणि १५६७ किलोमीटर या महामार्गांची लांबी आहे. मात्र, सुरत ते हैदराबाद या महामार्गामुळे सुरत-चेन्नई हे अंतर सुमारे १२५० किलोमीटरपर्यंत येणार आहे. या संपूर्ण अंतरासाठी त्यासाठी दहा तासांचा अवधी लागेल, तर नाशिकहून चेन्नईपर्यंत आठ तासांत पोहोचणे शक्य होईल. ग्रीन फिल्ड अंतर्गत सुरत-नाशिक-अहमदनगर-करमाळा-सोलापूर-कर्नल-हैदराबाद- कडप्पा-चेन्नई असा मार्ग तयार करण्यात येणार असल्याचेही साळुंखे यांनी नमूद केले.

इन्फो

जिल्ह्यातील ६ तालुके कक्षेत

जिल्ह्यातील सहा तालुके या महामार्गाच्या कक्षेत आहेत. त्यात सुरगाण्यातील १२ गावे (१७ किमी), पेठमधील ५ गावे (६ किमी), दिंडोरीतील २३ गावे ( ४३किमी), नाशिक ४ गावे (१२ किमी), निफाडच्या ९ गावांचा (१३ किमी), तसेच सिन्नरच्या १६ गावांचा (३२ किमी) त्यात समावेश आहे. नाशिकमधून हा महामार्ग आडगाव, ओढा, विंचूर गवळी, लाखलगाव या भागातून जाणार आहे.