शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

सुपल्याची मेट ग्रामस्थांचा तात्पुरत्या स्थलांतराला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:15 IST

वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : रायगडमधील तळीये गावच्या घटनेनंतर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी असलेल्या मेटघर किल्ला ग्रामपंचायतीच्या सुपल्याची ...

वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : रायगडमधील तळीये गावच्या घटनेनंतर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी असलेल्या मेटघर किल्ला ग्रामपंचायतीच्या सुपल्याची मेट व इतर सात वाड्या यांचे पुनर्वसन करण्याबाबत प्रांताधिकारी व तहसीलदार दीपक गिरासे यांच्यामार्फत रहिवाशांमध्ये चर्चा घडवून आणली आहे. यावेळी ग्रामस्थांनी तात्पुरत्या स्थलांतराला विरोध केला आहे.

प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरण करावे का? असे, विचारले असता नागरिकांनी त्यास नकार दिला.

आजपर्यंत आम्ही सुरक्षित आहोत, आमची शेती इथे आहे, अजून तरी आम्हाला काही धोका निर्माण झाला नाही, अजून तरी पुनर्वसन करण्याची गरज नसल्याचे भिकन बदादे, संतोष आचारी, पोलीस पाटील किसन झोले यांनी चर्चेत सांगितले.

यावर यापुढे या भागात उत्खनावर प्रशासन लक्ष ठेवून आहे, तुमचे योग्य जागी व तुमची शेती व व्यवसाय याबाबत योग्य तो विचार करून, तसेच रोजगाराच्या साधनेवर कुठलीही गदा येणार नाही याचा विचार करून पुनर्वसन होईल, याची शाश्वती प्रांत अधिकारी तेजस चव्हाण यांनी दिली, तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ब्रह्मगिरीचे सीमांकन करण्याच्या प्रोसेसला सुरुवात झाली आहे. थोड्याच दिवसांत किल्ले ब्रह्मगिरीच्या सीमा निश्चित होतील, असे ते म्हणाले.

यावेळी तहसीलदारांनी अतिवृष्टीमुळे या भागात काही अनुचित प्रकार घडला, तर पोलीस पाटील, सरपंच व ग्रामस्थांनी तात्काळ संपर्क करावा, असे आवाहन केले. यावेळी प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार दीपक गिरासे, पोलीस निरीक्षक रणदिवे, सहायक गटविकास अधिकारी एस.जी. पाठक, विस्तार अधिकारी बी.एस. पवार, मंडळ अधिकारी हेमंत कुलकर्णी, तलाठी जोशी, ग्रामसेवक विलास पवार, सरपंच जगन झोले, भिकन बदादे, शंकर बदादे, हिरामण जाधव, हरी झोले, विष्णू बदादे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

---------------------

आम्हाला काही त्रास नाही...

अजून तरी सुपल्याच्या मेटला धोका नसून आमची शेती, गुरे, वासरे, इथेच आहेत. तुम्ही आम्हाला तात्पुरत्या स्वरूपात कुठेही जरी नेले तरी आम्हाला दररोज इथेच यावे लागेल. आमचे सर्वच इथे आहे. ब्रह्मगिरीला भेट देणाऱ्या भाविकांमुळे आम्हाला रोजगार मिळत असतो, आमचा बारा महिने रोजगार बुडेल, पूर्वजांपासून आम्ही इथेच राहतो, आम्हाला काही त्रास नाही, ब्रह्मगिरीवरून दगड पडल्याच्या बातम्या येत आहेत. दगड पडला खरा; परंतु तो दगड पुढच्या बाजूने पडला, सुपल्याच्या मेटचा आणि त्यातील अंतर खूप आहे, आजपर्यंत सुपल्याच्या मेटमध्ये कुठलाही दगड पडलेला नाही. आम्हाला आता तरी पुनर्वसन करण्याची गरज नाही, इथे ब्रह्मगिरीकडे जे भाविक येतात त्यांच्यामुळे येथील नागरिकांना रोजगार मिळत आहे, अशा भावना सरपंच जगन झोले यांनी व्यक्त केली.

(३० वेळुंजे)

300721\30nsk_30_30072021_13.jpg

३० वेळूंजे