शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता करारासाठी कोणीही जिवंत राहणार नाही, युरोपला युद्ध हवे असेल तर रशिया तयार'; पुतिन यांचा युरोपला थेट इशारा
2
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
3
Mumbai Crime: पोटच्या मुलीचा ब्लेडने गळा चिरला, वाचवायला गेलेल्या पत्नीवरही हल्ला; कशामुळे घडलं?
4
फ्लॅट सुरुवातीनंतर शेअर बाजार 'धडाम'! सेन्सेक्स १६० अंकांनी आपटला; निफ्टीही २५,९५८ च्या खाली
5
कोण आहे देवव्रत रेखे? अवघ्या १९ व्या वर्षी पूर्ण केलं दंडक्रम पारायण; मोदी-योगींनीही नावाजलं
6
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
7
पलाश मुच्छल प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात, स्मृती मंधानासोबतच्या लग्नावर अजूनही मौनच
8
Ola-Uber ला टक्कर देण्यासाठी आली 'भारत टॅक्सी'; 'या' ठिकाणी ट्रायल सुरू, १० दिवसांत ५१ हजार चालकही जोडले
9
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
10
भाजपानं सोनिया गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं; काँग्रेस उमेदवारासमोर उभं केलं आव्हान
11
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
12
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
13
'एका हॉटेलचे बिल दुसऱ्या हॉटेलमध्ये देता का?', कर्तव्यनिष्ठ महिला पोलिसाच्या कामगिरीची वरिष्ठांकडून दखल
14
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
15
‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा
16
"आगाऊ मेंटेनन्स घेणे हे बेकायदा कृत्य; वसुली थांबवण्याचे निर्देश ‘महारेरा’ने बिल्डरांना द्यावेत"
17
‘दुबार’ निकाल टळला; फैसला २१ डिसेंबरलाच; नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
18
महाड, रोह्यामध्ये महायुतीचे कार्यकर्ते भिडले, रायगड जिल्ह्यात मतदानादरम्यान तुंबळ हाणामारी
19
अग्रलेख: डिजिटल टोळ्या जेरबंद होतील? सर्वोच्च न्यायालयाची सजगता स्वागतार्ह
20
आजचे राशीभविष्य, ३ डिसेंबर २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

सुपल्याची मेट ग्रामस्थांचा तात्पुरत्या स्थलांतराला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:15 IST

वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : रायगडमधील तळीये गावच्या घटनेनंतर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी असलेल्या मेटघर किल्ला ग्रामपंचायतीच्या सुपल्याची ...

वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : रायगडमधील तळीये गावच्या घटनेनंतर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी असलेल्या मेटघर किल्ला ग्रामपंचायतीच्या सुपल्याची मेट व इतर सात वाड्या यांचे पुनर्वसन करण्याबाबत प्रांताधिकारी व तहसीलदार दीपक गिरासे यांच्यामार्फत रहिवाशांमध्ये चर्चा घडवून आणली आहे. यावेळी ग्रामस्थांनी तात्पुरत्या स्थलांतराला विरोध केला आहे.

प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरण करावे का? असे, विचारले असता नागरिकांनी त्यास नकार दिला.

आजपर्यंत आम्ही सुरक्षित आहोत, आमची शेती इथे आहे, अजून तरी आम्हाला काही धोका निर्माण झाला नाही, अजून तरी पुनर्वसन करण्याची गरज नसल्याचे भिकन बदादे, संतोष आचारी, पोलीस पाटील किसन झोले यांनी चर्चेत सांगितले.

यावर यापुढे या भागात उत्खनावर प्रशासन लक्ष ठेवून आहे, तुमचे योग्य जागी व तुमची शेती व व्यवसाय याबाबत योग्य तो विचार करून, तसेच रोजगाराच्या साधनेवर कुठलीही गदा येणार नाही याचा विचार करून पुनर्वसन होईल, याची शाश्वती प्रांत अधिकारी तेजस चव्हाण यांनी दिली, तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ब्रह्मगिरीचे सीमांकन करण्याच्या प्रोसेसला सुरुवात झाली आहे. थोड्याच दिवसांत किल्ले ब्रह्मगिरीच्या सीमा निश्चित होतील, असे ते म्हणाले.

यावेळी तहसीलदारांनी अतिवृष्टीमुळे या भागात काही अनुचित प्रकार घडला, तर पोलीस पाटील, सरपंच व ग्रामस्थांनी तात्काळ संपर्क करावा, असे आवाहन केले. यावेळी प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार दीपक गिरासे, पोलीस निरीक्षक रणदिवे, सहायक गटविकास अधिकारी एस.जी. पाठक, विस्तार अधिकारी बी.एस. पवार, मंडळ अधिकारी हेमंत कुलकर्णी, तलाठी जोशी, ग्रामसेवक विलास पवार, सरपंच जगन झोले, भिकन बदादे, शंकर बदादे, हिरामण जाधव, हरी झोले, विष्णू बदादे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

---------------------

आम्हाला काही त्रास नाही...

अजून तरी सुपल्याच्या मेटला धोका नसून आमची शेती, गुरे, वासरे, इथेच आहेत. तुम्ही आम्हाला तात्पुरत्या स्वरूपात कुठेही जरी नेले तरी आम्हाला दररोज इथेच यावे लागेल. आमचे सर्वच इथे आहे. ब्रह्मगिरीला भेट देणाऱ्या भाविकांमुळे आम्हाला रोजगार मिळत असतो, आमचा बारा महिने रोजगार बुडेल, पूर्वजांपासून आम्ही इथेच राहतो, आम्हाला काही त्रास नाही, ब्रह्मगिरीवरून दगड पडल्याच्या बातम्या येत आहेत. दगड पडला खरा; परंतु तो दगड पुढच्या बाजूने पडला, सुपल्याच्या मेटचा आणि त्यातील अंतर खूप आहे, आजपर्यंत सुपल्याच्या मेटमध्ये कुठलाही दगड पडलेला नाही. आम्हाला आता तरी पुनर्वसन करण्याची गरज नाही, इथे ब्रह्मगिरीकडे जे भाविक येतात त्यांच्यामुळे येथील नागरिकांना रोजगार मिळत आहे, अशा भावना सरपंच जगन झोले यांनी व्यक्त केली.

(३० वेळुंजे)

300721\30nsk_30_30072021_13.jpg

३० वेळूंजे