शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

सुपल्याची मेट ग्रामस्थांचा तात्पुरत्या स्थलांतराला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:15 IST

वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : रायगडमधील तळीये गावच्या घटनेनंतर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी असलेल्या मेटघर किल्ला ग्रामपंचायतीच्या सुपल्याची ...

वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : रायगडमधील तळीये गावच्या घटनेनंतर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी असलेल्या मेटघर किल्ला ग्रामपंचायतीच्या सुपल्याची मेट व इतर सात वाड्या यांचे पुनर्वसन करण्याबाबत प्रांताधिकारी व तहसीलदार दीपक गिरासे यांच्यामार्फत रहिवाशांमध्ये चर्चा घडवून आणली आहे. यावेळी ग्रामस्थांनी तात्पुरत्या स्थलांतराला विरोध केला आहे.

प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरण करावे का? असे, विचारले असता नागरिकांनी त्यास नकार दिला.

आजपर्यंत आम्ही सुरक्षित आहोत, आमची शेती इथे आहे, अजून तरी आम्हाला काही धोका निर्माण झाला नाही, अजून तरी पुनर्वसन करण्याची गरज नसल्याचे भिकन बदादे, संतोष आचारी, पोलीस पाटील किसन झोले यांनी चर्चेत सांगितले.

यावर यापुढे या भागात उत्खनावर प्रशासन लक्ष ठेवून आहे, तुमचे योग्य जागी व तुमची शेती व व्यवसाय याबाबत योग्य तो विचार करून, तसेच रोजगाराच्या साधनेवर कुठलीही गदा येणार नाही याचा विचार करून पुनर्वसन होईल, याची शाश्वती प्रांत अधिकारी तेजस चव्हाण यांनी दिली, तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ब्रह्मगिरीचे सीमांकन करण्याच्या प्रोसेसला सुरुवात झाली आहे. थोड्याच दिवसांत किल्ले ब्रह्मगिरीच्या सीमा निश्चित होतील, असे ते म्हणाले.

यावेळी तहसीलदारांनी अतिवृष्टीमुळे या भागात काही अनुचित प्रकार घडला, तर पोलीस पाटील, सरपंच व ग्रामस्थांनी तात्काळ संपर्क करावा, असे आवाहन केले. यावेळी प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार दीपक गिरासे, पोलीस निरीक्षक रणदिवे, सहायक गटविकास अधिकारी एस.जी. पाठक, विस्तार अधिकारी बी.एस. पवार, मंडळ अधिकारी हेमंत कुलकर्णी, तलाठी जोशी, ग्रामसेवक विलास पवार, सरपंच जगन झोले, भिकन बदादे, शंकर बदादे, हिरामण जाधव, हरी झोले, विष्णू बदादे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

---------------------

आम्हाला काही त्रास नाही...

अजून तरी सुपल्याच्या मेटला धोका नसून आमची शेती, गुरे, वासरे, इथेच आहेत. तुम्ही आम्हाला तात्पुरत्या स्वरूपात कुठेही जरी नेले तरी आम्हाला दररोज इथेच यावे लागेल. आमचे सर्वच इथे आहे. ब्रह्मगिरीला भेट देणाऱ्या भाविकांमुळे आम्हाला रोजगार मिळत असतो, आमचा बारा महिने रोजगार बुडेल, पूर्वजांपासून आम्ही इथेच राहतो, आम्हाला काही त्रास नाही, ब्रह्मगिरीवरून दगड पडल्याच्या बातम्या येत आहेत. दगड पडला खरा; परंतु तो दगड पुढच्या बाजूने पडला, सुपल्याच्या मेटचा आणि त्यातील अंतर खूप आहे, आजपर्यंत सुपल्याच्या मेटमध्ये कुठलाही दगड पडलेला नाही. आम्हाला आता तरी पुनर्वसन करण्याची गरज नाही, इथे ब्रह्मगिरीकडे जे भाविक येतात त्यांच्यामुळे येथील नागरिकांना रोजगार मिळत आहे, अशा भावना सरपंच जगन झोले यांनी व्यक्त केली.

(३० वेळुंजे)

300721\30nsk_30_30072021_13.jpg

३० वेळूंजे