शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

मालेगाव परिसरात उन्हाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:26 IST

------------------- मोकाट श्वानांचा वाढता उपद्रव मालेगाव : शहर परिसरात मोकाट श्वानांच्या संख्येत वाढ झाली आहे. रस्त्यांवर झुंडीझुंडी फिरत आहेत. ...

-------------------

मोकाट श्वानांचा वाढता उपद्रव

मालेगाव : शहर परिसरात मोकाट श्वानांच्या संख्येत वाढ झाली आहे. रस्त्यांवर झुंडीझुंडी फिरत आहेत. मोकाट श्वानांच्या हल्ल्यात बालके व नागरिक जखमी होत आहेत. मोकाट श्वान रस्त्यांवरून धावत असल्याने दुचाकींमध्ये अडकून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

-----------------------------

विजेच्या लपंडावामुळे शेतकरी हैराण

मालेगाव : यंदा रब्बी हंगाम चांगला आला असताना व शेतीशिवारातील विहिरींना बऱ्यापैकी पाणी असताना वीज वितरण कंपनीकडून भारनियमन केले जात आहे. यामुळे शेती पिकांना पाणी देता येत नाही. वीज उपकेंद्रामधील बिघाड, कमी दाबाने वीजपुरवठा, थकबाकीमुळे वीज जोडणी खंडित करण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

---------------------------------

महिलांची वाळवणासाठी लगबग

मालेगाव : तालुक्यातील ग्रामीण भागात वाळवणासाठी महिलांची लगबग दिसून येत आहे. कुरडई, पापड, शेवाळ्या, मसाल्याचे पदार्थ करण्यासाठी महिलांची धावपळ होत आहे. सावलीचा आधार घेऊन वाळवण केले जात आहे. वाळवणासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या दरात वाढ झाल्याने आर्थिक बजेट सांभाळत महिला वाळवण करीत आहेत.

----

तालुका सचिवपदी अमोल अहिरे

मालेगाव : येथील पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या सचिवपदी अमोल राजाराम अहिरे यांची तर मालेगाव उपतालुका अध्यक्षपदी सिद्धार्थ रोहिदास अहिरे यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष भगवान आढाव यांनी तसे नियुक्तीपत्र अहिरे यांना दिले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष नितीन बोराळे व पदाधिकारी उपस्थित हाेते.

----

कांद्याच्या दरात घसरण

मालेगाव : कांद्याच्या दरात तब्बल दीड हजाराने घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कसमादे परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादित केला जातो. जिल्ह्यातील बाजार समिती तसेच उपबाजार समित्यांमध्ये गेल्या आठवड्यात कांद्याचे दर कोसळले आहेत. लाल व उन्हाळी कांद्याची आवक वाढली असताना कांद्याचे दर एकदम कमी झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.