शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

मालेगाव तालुक्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या

By admin | Updated: March 24, 2017 00:43 IST

नाशिक : मालेगाव तालुक्यातील दोघा शेतकऱ्यांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे.

 नाशिक : केंद्र व राज्य सरकारकडून कर्जमाफी होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्जदार शेतकऱ्यांचा हिरमोड झाल्याने जिल्ह्णात शेतकरी आत्महत्त्येचे प्रमाण वाढले असून, सिन्नर तालुक्यात दोघा शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येनंतर बुधवारी मालेगाव तालुक्यातील दोघा शेतकऱ्यांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे. नवीन वर्षापासून जिल्ह्णात चौदा शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या असून, त्यातील सहा शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. महादू कारभारी पवार (५५) रा. सौंदाणे व जगन विठ्ठल अहिरे (५०) रा. डोंगरगाव असे या दोघा शेतकऱ्यांची नावे आहेत. राहत्या घरातच या दोघांनी विषारी औषध सेवन करून जीवनयात्रा संपविल्याचा प्राथमिक अहवाल मालेगाव तहसील कार्यालयाने कळविला आहे. दोन दिवसांपूर्वी सिन्नर तालुक्यातील शिवाजी बोडके रा. सोनगिरी व अरुण सोनकांबळे रा. शिवडे या दोन्ही शेतकऱ्यांनी विष प्राशन करून आत्महत्त्या केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येने जिल्ह्णात आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत चौदा शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून शासनाकडून कर्जमाफी होण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत होते. परंतु राज्याच्या व केंद्राच्या अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद ठेवलेली नसल्याने शेतकरी वर्ग निराश झाला व त्यातून आत्महत्त्येच्या घटना वाढल्या असाव्यात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी आत्महत्त्या समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांची नऊ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यावर आलेल्या चौकशी अहवालाचा विचार करता सहा शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला, तर तीन प्रकरणे नामंजूर करण्यात आली.