शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

नांदगावी शेतकऱ्याची आत्महत्त्या

By admin | Updated: January 4, 2017 00:25 IST

नांदगावी शेतकऱ्याची आत्महत्त्या

नाशिक : नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्त्येचे दुष्टचक्र नवीन वर्षातही कायम असून, नांदगाव तालुक्यातील तरुण शेतकऱ्याने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतात गळफास घेऊन आत्महत्त्या केली आहे. शांताराम तानाजी बच्छाव (३५) रा. हिंगणदेहरे, ता. नांदगाव असे या शेतकऱ्याचे नाव असून, १ जानेवारी रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास कुटुंबातील व्यक्ती झोपेत असल्याचे पाहून त्यांनी शेतातच गळफास घेतला आहे. नापिकी, कर्जबाजारी-पणाबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नोटाबंदीमुळे शेतमालाचे भाव कोसळल्याने बच्छाव यांनी आत्महत्त्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत. गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबर २०१६ या संपूर्ण वर्षात जिल्ह्यात ८५ शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या आहेत, तर २०१५ मध्येदेखील तितक्याच शेतकऱ्यांनी नापिकीला कंटाळून आत्महत्त्या केल्या होत्या. शेतकरी आत्महत्त्येचे प्रमाण दोन्ही वर्षे कायम राहिल्याने प्रशासनही विचारात पडले आहे. गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्त्या पाहता शासनाने अनेक योजना जाहीर केल्या त्याचबरोबर प्रशासकीय पातळीवरही प्रयत्न करण्यात आले, परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. साधारणत: महिन्याला सात ते आठ शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या व विशेष म्हणजे निफाडसारख्या सधन तालुक्यातील शेतकऱ्यांचे आत्महत्त्येचे प्रमाण अधिक आहे.