शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

अध्यक्षांनी सुचविले उत्पन्नवाढीचे पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 00:59 IST

नाशिक : जिल्हा परिषदांचे उत्पन्न मर्यादित असतानाच शासनाकडून अनेक करांबाबतचे अधिकार काढून घेतल्यामुळे जिल्हा परिषदांपुढे आर्थिक प्रश्न निर्माण झालेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर मर्यादा आणतांनाच अत्यंत तुटपुंजी भरपाई दिली जाते. यातून जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीला फारसा लाभ होत नसल्यामुळे जिल्हा परिषदांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने शासनाच्या काही निर्णयात सुधारणा करण्याची मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांकडे केली आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : सांगळे यांनी घेतली वित्त आयोग अध्यक्षांची भेट

नाशिक : जिल्हा परिषदांचे उत्पन्न मर्यादित असतानाच शासनाकडून अनेक करांबाबतचे अधिकार काढून घेतल्यामुळे जिल्हा परिषदांपुढे आर्थिक प्रश्न निर्माण झालेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर मर्यादा आणतांनाच अत्यंत तुटपुंजी भरपाई दिली जाते. यातून जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीला फारसा लाभ होत नसल्यामुळे जिल्हा परिषदांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने शासनाच्या काही निर्णयात सुधारणा करण्याची मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांकडे केली आहे.जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी पाचव्या महाराष्टÑ राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही. गिरीराज यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. १९७५ पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्या कार्यक्षेत्रात व्यवसाय कराची आकारणी करीत होते तसेच त्यात वाढ करण्याचा अधिकारदेखील त्यांना होता, परंतु शासनाने कालांतराने या कराचा अधिकारच जिल्हा परिषदेकडून काढून घेतला. या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाकडून दरवर्षी १,८३,५७० इतकी रक्कम दिली जाते. यात १९७५ नंतर वाढच झालेली नाही. अशीच परिस्थिती वाहन कराच्यादेखील बाबतीत आहे.स्थानिक स्वराज्य संस्था मुंबई सार्वजनिक वाहने १९२० नुसार कराची आकारणी करीत होते. १९३५ पासून स्थानिक स्वराज्य संस्थांचा हा अधिकारच काढून घेण्यात आलेला आहे. त्यातील नुकसानभरपाईच्या रकमेतदेखील आजतागायत वाढ करण्यात आलेली नसल्याची बाब सांगळे यांनी गिरीराज यांच्या निदर्शनास आणून दिली.मुद्रांक शुल्क शासन वसूल करते आणि केवळ १ टक्का रक्कम जिल्हा परिषदेला मिळते तर ५० टक्के रक्कम ग्रामपंचायतीला मिळते. शासनाकडून १ टक्का दिला जाणारा दर हा १५ वर्षांपूर्वीचा आहे. विक्रीकरातून् देखील जिल्हा परिषदेला शासन काहीच देत नाही. खरेतर जीएसटीच्या रूपाने शासनाला ग्रामीण भागातून कोट्यवधी रुपये मिळतात त्यातून किमान १० टक्के रक्कम जिल्हा परिषदेला मिळणे अपेक्षित आहे. उत्पादन शुल्कातही अनुदान न मिळणे, गौण खनिजावरील अनुदान थेट जिल्हा परिषदेला न मिळणे, विविध करांच्या बाबतीत जिल्हा परिषदेच्या उत्पनांना मर्यादा आणल्या आहेत.पंचायतराज व्यवस्थेमध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण विकासासाठी जिल्हापातळीवर जिल्हा परिषदांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. तथापि, ग्रामीण भागाचा अद्यापही सर्वांगीण विकास होऊ शकलेला नाही. कारण जिल्हा परिषदांचे उत्पन्न अतिशय मर्यादित असून, या उत्पन्नात ग्रामीण समस्यांचे निराकरण करणे अशक्य असल्याने जिल्हा परिषदांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची अपेक्षा आहे.- शीतल सांगळे, अध्यक्ष, जिल्हा परिषद