शहरं
Join us  
Trending Stories
1
"नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
2
"भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
3
“नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
4
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
5
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
6
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
7
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
8
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
9
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
10
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
11
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
12
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
13
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
14
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
15
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
16
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
17
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
18
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
19
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
20
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...

अध्यक्षांनी सुचविले उत्पन्नवाढीचे पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 00:59 IST

नाशिक : जिल्हा परिषदांचे उत्पन्न मर्यादित असतानाच शासनाकडून अनेक करांबाबतचे अधिकार काढून घेतल्यामुळे जिल्हा परिषदांपुढे आर्थिक प्रश्न निर्माण झालेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर मर्यादा आणतांनाच अत्यंत तुटपुंजी भरपाई दिली जाते. यातून जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीला फारसा लाभ होत नसल्यामुळे जिल्हा परिषदांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने शासनाच्या काही निर्णयात सुधारणा करण्याची मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांकडे केली आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : सांगळे यांनी घेतली वित्त आयोग अध्यक्षांची भेट

नाशिक : जिल्हा परिषदांचे उत्पन्न मर्यादित असतानाच शासनाकडून अनेक करांबाबतचे अधिकार काढून घेतल्यामुळे जिल्हा परिषदांपुढे आर्थिक प्रश्न निर्माण झालेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर मर्यादा आणतांनाच अत्यंत तुटपुंजी भरपाई दिली जाते. यातून जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीला फारसा लाभ होत नसल्यामुळे जिल्हा परिषदांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने शासनाच्या काही निर्णयात सुधारणा करण्याची मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांकडे केली आहे.जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी पाचव्या महाराष्टÑ राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही. गिरीराज यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. १९७५ पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्या कार्यक्षेत्रात व्यवसाय कराची आकारणी करीत होते तसेच त्यात वाढ करण्याचा अधिकारदेखील त्यांना होता, परंतु शासनाने कालांतराने या कराचा अधिकारच जिल्हा परिषदेकडून काढून घेतला. या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाकडून दरवर्षी १,८३,५७० इतकी रक्कम दिली जाते. यात १९७५ नंतर वाढच झालेली नाही. अशीच परिस्थिती वाहन कराच्यादेखील बाबतीत आहे.स्थानिक स्वराज्य संस्था मुंबई सार्वजनिक वाहने १९२० नुसार कराची आकारणी करीत होते. १९३५ पासून स्थानिक स्वराज्य संस्थांचा हा अधिकारच काढून घेण्यात आलेला आहे. त्यातील नुकसानभरपाईच्या रकमेतदेखील आजतागायत वाढ करण्यात आलेली नसल्याची बाब सांगळे यांनी गिरीराज यांच्या निदर्शनास आणून दिली.मुद्रांक शुल्क शासन वसूल करते आणि केवळ १ टक्का रक्कम जिल्हा परिषदेला मिळते तर ५० टक्के रक्कम ग्रामपंचायतीला मिळते. शासनाकडून १ टक्का दिला जाणारा दर हा १५ वर्षांपूर्वीचा आहे. विक्रीकरातून् देखील जिल्हा परिषदेला शासन काहीच देत नाही. खरेतर जीएसटीच्या रूपाने शासनाला ग्रामीण भागातून कोट्यवधी रुपये मिळतात त्यातून किमान १० टक्के रक्कम जिल्हा परिषदेला मिळणे अपेक्षित आहे. उत्पादन शुल्कातही अनुदान न मिळणे, गौण खनिजावरील अनुदान थेट जिल्हा परिषदेला न मिळणे, विविध करांच्या बाबतीत जिल्हा परिषदेच्या उत्पनांना मर्यादा आणल्या आहेत.पंचायतराज व्यवस्थेमध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण विकासासाठी जिल्हापातळीवर जिल्हा परिषदांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. तथापि, ग्रामीण भागाचा अद्यापही सर्वांगीण विकास होऊ शकलेला नाही. कारण जिल्हा परिषदांचे उत्पन्न अतिशय मर्यादित असून, या उत्पन्नात ग्रामीण समस्यांचे निराकरण करणे अशक्य असल्याने जिल्हा परिषदांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची अपेक्षा आहे.- शीतल सांगळे, अध्यक्ष, जिल्हा परिषद