शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षांनी सुचविले उत्पन्नवाढीचे पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 00:59 IST

नाशिक : जिल्हा परिषदांचे उत्पन्न मर्यादित असतानाच शासनाकडून अनेक करांबाबतचे अधिकार काढून घेतल्यामुळे जिल्हा परिषदांपुढे आर्थिक प्रश्न निर्माण झालेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर मर्यादा आणतांनाच अत्यंत तुटपुंजी भरपाई दिली जाते. यातून जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीला फारसा लाभ होत नसल्यामुळे जिल्हा परिषदांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने शासनाच्या काही निर्णयात सुधारणा करण्याची मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांकडे केली आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : सांगळे यांनी घेतली वित्त आयोग अध्यक्षांची भेट

नाशिक : जिल्हा परिषदांचे उत्पन्न मर्यादित असतानाच शासनाकडून अनेक करांबाबतचे अधिकार काढून घेतल्यामुळे जिल्हा परिषदांपुढे आर्थिक प्रश्न निर्माण झालेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर मर्यादा आणतांनाच अत्यंत तुटपुंजी भरपाई दिली जाते. यातून जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीला फारसा लाभ होत नसल्यामुळे जिल्हा परिषदांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने शासनाच्या काही निर्णयात सुधारणा करण्याची मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांकडे केली आहे.जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी पाचव्या महाराष्टÑ राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही. गिरीराज यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. १९७५ पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्या कार्यक्षेत्रात व्यवसाय कराची आकारणी करीत होते तसेच त्यात वाढ करण्याचा अधिकारदेखील त्यांना होता, परंतु शासनाने कालांतराने या कराचा अधिकारच जिल्हा परिषदेकडून काढून घेतला. या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाकडून दरवर्षी १,८३,५७० इतकी रक्कम दिली जाते. यात १९७५ नंतर वाढच झालेली नाही. अशीच परिस्थिती वाहन कराच्यादेखील बाबतीत आहे.स्थानिक स्वराज्य संस्था मुंबई सार्वजनिक वाहने १९२० नुसार कराची आकारणी करीत होते. १९३५ पासून स्थानिक स्वराज्य संस्थांचा हा अधिकारच काढून घेण्यात आलेला आहे. त्यातील नुकसानभरपाईच्या रकमेतदेखील आजतागायत वाढ करण्यात आलेली नसल्याची बाब सांगळे यांनी गिरीराज यांच्या निदर्शनास आणून दिली.मुद्रांक शुल्क शासन वसूल करते आणि केवळ १ टक्का रक्कम जिल्हा परिषदेला मिळते तर ५० टक्के रक्कम ग्रामपंचायतीला मिळते. शासनाकडून १ टक्का दिला जाणारा दर हा १५ वर्षांपूर्वीचा आहे. विक्रीकरातून् देखील जिल्हा परिषदेला शासन काहीच देत नाही. खरेतर जीएसटीच्या रूपाने शासनाला ग्रामीण भागातून कोट्यवधी रुपये मिळतात त्यातून किमान १० टक्के रक्कम जिल्हा परिषदेला मिळणे अपेक्षित आहे. उत्पादन शुल्कातही अनुदान न मिळणे, गौण खनिजावरील अनुदान थेट जिल्हा परिषदेला न मिळणे, विविध करांच्या बाबतीत जिल्हा परिषदेच्या उत्पनांना मर्यादा आणल्या आहेत.पंचायतराज व्यवस्थेमध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण विकासासाठी जिल्हापातळीवर जिल्हा परिषदांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. तथापि, ग्रामीण भागाचा अद्यापही सर्वांगीण विकास होऊ शकलेला नाही. कारण जिल्हा परिषदांचे उत्पन्न अतिशय मर्यादित असून, या उत्पन्नात ग्रामीण समस्यांचे निराकरण करणे अशक्य असल्याने जिल्हा परिषदांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची अपेक्षा आहे.- शीतल सांगळे, अध्यक्ष, जिल्हा परिषद