शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी गारपिटीने दहा हजार हेक्टर पिकांचे नुकसान कृषी विभागाचा अंदाज,

By admin | Updated: December 13, 2014 01:54 IST

नऊ तालुक्यांना फटका, वडनेरला गारपीट

  नाशिक : जिल्'ात अवकाळी पावसाचे व गारपिटीचे थैमान सुरूच असून, गुरुवारी (दि.११) जिल्'ात सात तालुक्यांत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे तब्बल १० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती केदा अहेर यांनी कृषी विभागाला दिला आहेत. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास जिल्'ात काही तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे तब्बल १० हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष, कांदा, डाळींब, गहू, हरबरा पिकांना जबरदस्त फटका बसला आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीने प्राथमिक नुकसान झालेल्या गावांची नावे तालुकानिहाय पुढीलप्रमाणे- कंसात झालेल्या पिकांचे नुकसान- बागलाण- ब्राह्मणगाव, लखमापूर, यशवंतनगर,धांद्री, (कांदा, द्राक्ष, डाळींब), चांदवड- मंगरूळ, सोग्रस, चिंचोले, भरवीर, साळसाने (कांदा व द्राक्ष) निफाड-रूई, सारोळेथडी, धारणगाव वीर, खेडलेझुंगे, नांदूरमधमेश्वर,महादेवनगर, विंचूर, देवगाव, मानूर (द्राक्ष, कांदा, गहू, हरभरा) सुमारे एक हजार हेक्टर, मालेगाव- रावळगाव, तळवाडे, दुधे, सातमाने, वडनेर (खा), मोडदर, निमशेवडी, वडेल, अजंग, खायदे (डाळींब, गहू व हरभरा), येवला- मानुरी, मुखेड, देवगाव, एरंडगाव (द्राक्ष, कांदा), देवळा-वासूळपाडा, महालपाटणे, निंबोळा, वाखारी, डोंगरगाव, पिंपळगाव, उमराणे (कांदा, डाळींब) सिन्नर- मुसळगाव, खोपडी, कुंदेवाडी (कांदा, हरभरा, गहू), नांदगाव-जळगाव(बु.) चिंचविहीर (कांदा, हरभरा, गहू) आदि गावांमध्ये सुमारे १० हजार हेक्टर क्षेत्रांवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.